Thursday, December 25, 2014

बाबा आमटेंच्या कविता

माणूस माझे नाव, माणूस माझे नाव 
दहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव...
बिंदु मात्र मी क्षुद्र खरोखर
परी जिंकले सातहि सागर
उंच गाठला गौरीशंकर
अग्नीयान मम घेत चालले आकाशाचा ठाव...
मीच इथे ओसाडावरती
नांगर धरुनी दुबळ्या हाती
कणकण ही जागवली माती
दुर्भिक्ष्याच्या छाताडावर हसत घातला घाव...
ही शेते अन् ही सुखसदने
घुमते यातून माझे गाणे
रोज आळवित नवे तराणे
मी दैन्याच्या विरुद्ध करतो क्षण क्षण नवा उठाव...
सुखेच माझी मला बोचती
साहसास मम सीमा नसती
नवीन क्षितिजे सदा खुणवती
दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव...
                        
---

वाल्मिकीच्या करुणेच्या काठाने वाटचाल करीत
निर्वेदाचे टोक गाठले.
कालिदासाने गिरिशिखरांवर वाकलेली शृंगार - मेघांची दाटी पाहिली
भूपालांच्या विजयवाहिनीसह युद्धघोष करीत
वीररसांच्या भाटांचे बेभान तांडेही निघाले
भाबड्या भक्तीचे पानमळेही अमाप फुलले
पण श्रम - सरितेच्या तीरावर आपल्या गीतांचे कलश भरण्यासाठी
कोणीच कसे आले नाही?
सांदीपनीच्या आश्रमात सुगंधाचे अद्भुत फुललेले ज्याने पाहिले
त्याला स्वेद - रसाची पुसट जाण असल्याची नोंद मात्र आहे.

निळ्या नदीच्या किनार्‍यावरील वाळूच्या अफाट सपाटीवर
पाषाणांचे उत्तुंग त्रिकोन उभारता उभारता
लक्षावधी छात्या रक्तबंबाळ झाल्या
मरणासाठी बादशाही बिळे बांधता बांधता
असंख्य जीवनांचा अंत झाला
ज्यांनी चिरे मस्तकावर वाहिले
ते चिर्‍यांच्या फटीफटीतून निःशब्द चिनले गेले
पण मृत्यूच्या वस्तीतही आपल्या वासनांची लक्तरे वाहून नेणारे
त्या बिळात अजून कायम आहेत!

चौदा प्रेमांचा चोथा करणार्‍या समआटाचे तकलूपी अश्रू
ज्यांनी पत्^थरांतून चिरंतन केले
त्यांच्या आटलेल्या रक्ताची दखल
दरबारी भाटांनी घेतल्याचे ऐकिवात नाही!
बिगारीत बांधलेले मनोरे छातीवर जे घेऊन कोसळले
त्यांचे मृत्यू लेख अजून इतिहासाने वाचलेले नाहीत!
कलेचे वस्त्र बिनदिक्कत फेडणार्‍या
आणि प्रतिभेच्या हाटात रसांचा घाऊक सौदा करणार्‍या
भूपालांचा आणि सुलतानांचा काळ संपला!
आणि जिची वाट पाहिली जात होती ती पहाट
आज उंबरठ्यावर आहे
श्रमपालांच्या युगांतील स्वेद - रसांच्या साधनेसाठी
प्रज्ञेच्या पुत्रांनी आता सज्ज व्हावे!

संथ नाजुक पावलासह हिंदकळणारे
रसांचे टंच घट उत्तररात्रीच वाहून झाले
आता हवी आहे
मस्तकावर पाट्या वाहणार्‍या स्वेदगंधेcया डगमगत्या चालीची
धुळीत लिहिलेली कविता
स्वेद - रसाने न्हालेल्या ओलेतीचे
माथा झुकवणारे चित्र आणि मन उंचावाणारे शिल्प आता हवे आहे
भूमिकन्यांचे वार्‍याचा वेग पिऊन धावणारे गाणे
त्याला शब्द देणारा कालिदास आता हवा आहे

भुईचे हिरवे हास्य फुलविण्यासाठी
नांगराच्या फाळांनी तिला कुरवाळणारा
स्वर्गातल्या अश्रूंची कोसळणारी झड
भरलेल्या डोळ्यांनी पाहणारा
असे संपन्^न जीवन बेहोषपणे जगणारा तो हलधर
त्याच्या मस्तीची स्तोत्^रे गाणारे वाल्मिकी आता हवे आहेत!
आणि तो नौकेवरून आशेचे जाळे फेकणारे कोळी
समुद्राचे उसासे त्याला अजाणताच जाणवतात
त्या ओळखीला तारांची थरथर देणारे तानसेन आता हवे आहेत

भूमीच्या गर्भातून काळे सोने वर काढणारे श्रम - पुत्र
त्यांच्या सर्वांगावर काळीच झळाळी उधळलेली
भूगर्भातल्या गर्मीने भाजलेले
आणि ओझे वाहून मोडण्याच्या सीमेपर्यंत वाकलेले
त्यांच्या कण्यांचे मणके
त्यांना ताठ करण्यासाठी प्रतिभेच्या पुत्रांनी आता सज्ज व्हावे
षोडशींच्या शरीरावरील रेशमी वस्त्रांची सळ्सळणारी वळणे पाहून
आता फक्त चांदण्यांचा चावटपणा त्यांना आठवू नये
अथवा उकळत्या पाण्यात शिजणार्‍या
कोषातील किड्यांची प्रेते आठवून
केवळ त्यांची अहिंसा व्याकूळ होऊ नये
तर आसामच्या अरण्यातील ते अर्श्सनग्न मजूर आठवून
त्यांच्या रक्तात उकळीही उठावी!
आणि मुलास अफू पाजून कोश गोळा करण्यास निघणार्‍या
मजुरणींचे आटलेले डोळे आठवून
त्या ज्वालारंगी वस्त्रांनी त्यांचेही डोळे जळावे
काश्मिरी कलाबतूंचे गालिचे पाहून
काश्मिरी माणसाच्या देहावरील
ठिगळांची कलाकुसरही त्यांना आठवावी
आणि मग त्यांच्यासाठी गालिच्याची ती मखमल कातेरी व्हावी!

खपणार्‍यांच्या तपोभूमीवर
श्रम - रसाचे सुगंधी गुत्ते
झिंगलेल्यांनी आता गजबजून जावेत
त्याची चटक लागली तर
जगणे हरवून बसलेली कलेवरेही तेथे गर्दी करतील
प्रज्ञेच्या पुत्रांनी तेथे स्वप्नांना अर्थ शब्द द्यावेत
श्रमाचे पुत्र त्या शब्दांना अर्थ देतील
स्वेद - रसाच्या मद्यशालेत त्या स्वप्नांना आकार येईल
स्वेद - रसाची ही मद्यशाला अल्पावधीत आटून जाईल
अथवा खपणार्‍यांच्या तपोभूमीवर
स्वप्नेच बंदिस्त होतील
म्हणून असे बिचकू नका
कारण, जीवनाचे मेघ नेहमीच तुडुंब असतात
आणि प्रज्ञा - पुत्रांच्या स्वप्नांनी बंदिस्तपणा स्वीकारल्याचा
इतिहास नाही!
 
-----

शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई
दुःख उधळायास आता, आसवांना वेळ नाही
ओस आडोशात केले, पापण्यांचे रिक्त प्याले
मीच या वेडावणार्‍या माझिया छायेस भ्याले
भोवती होते घृणेचे ते थवे घोंघावणारे
संपले होते निवारे बंद होती सर्व दारे
वाडगे घेऊन हाती, जिद्द प्राणांची निघाली
घाबरी करुणा जगाची, लांबुनी चतकोर घाली
माझिया रक्तासवे अन चालली माझी लढाई
दुःख उधळायास आता, आसवांना वेळ नाही
त्या तिथे वळणावरी पण वेगळा क्षण एक आला
एकटे एकत्र आले आणि हा जत्^था निघाला
घोर रात्री श्वापदांच्या, माजलेले रान होते
पांगळ्यांना पत्^थरांचे ते खडे आव्हान होते
टाकलेली माणसे अन् त्यक्त ती लाचार माती
त्यातुनी आले ऋतूंचे भाग्य या घायाळ हाती
पेटती प्रत्येक पेशी मी असा अंगार झाले
आसवे अन् घाम यांचा आगळा शृंगार चाले
वेदनेच्या गर्द रानी गर्जली आनंद द्वाही
दुःख उधळायास आता, आसवांना वेळ नाही
कोंडलेल्या वादळांच्या ह्या पहा अनिवार लाटा
माणसांसाठी उद्याच्या, येथुनी निघतील वाटा
पांगळ्यांच्या सोबतीला, येऊ द्या बलदंड बाहू
निर्मितीची मुक्त गंगा, द्या इथे मातीत वाहू
नांगरू स्वप्ने उद्याची, येथली फुलतील शेते
घाम गाळील ज्ञान येथे, येथुनी उठतील नेते
ह्याचसाठी वाहिली ही सर्व निढळाची कमाई
दुःख उधळायास आता, आसवांना वेळ नाही

----

पुराणांनी माणसांची उंची मापली 
तेव्हा हिमालय मोठा होता 
पण आता माणूस हिमालयाहून 
किमान साडेपाच फूट उंच झाला आहे! 

आणि कलियुगाचा धिक्कार करणार्‍या युगांनी 
ज्यातून कली शिरला ते धर्मराजाचे 
सडलेले बोटच तेवढे पाहिले होते 
आणि त्यांच्या घोडदौडीला 
अटकेवरच अटक बसली होती 
अटकेवर ज्यांचे घोडे थांबतात 
त्यांच्या पराक्रमाचे अखेर पानिपत होते 
भूतकालाच्या स्मृती आणि भविष्याच्या भीती 
यांनी ज्यांच्या मनात गर्दी केली होती 
वर्तमानातून वाट काढता येत नव्हती 
म्हणून जीवनाचा नकाशा ज्यांना समजला नव्हता 
आणि म्हणून भूतकाळाला जे माहीत नव्हते 
आणि भविष्य ज्याबद्दल मौन होते 
ते ज्यांना कळत नव्हते 
आणि त्या मौनातील कर्तृत्व साठवायला 
ज्यांच्याजवळ जागा नव्हती 
त्या धर्माच्या जो - जो गोळ्यांनी 
झापडलेल्या युगांना ज्याचे आकलन झाले नाही 
ते हे माझे कलियुग! 

ती युगे आपल्या प्राचीन प्रेतांचे पूजन करीत 
पळीपंचपात्रात सागराची आचमने देत बसली 
आणि जग कोठल्या कोठे निघून आले! 



त्यांचे लांड्या सोवळ्यातले अध्यात्म 
जीर्ण गंजलेल्या शिव धनुष्याचाच 
महिमा गात बसले 
पण शिवधनुष्याचा महिमा गाणारे 
ते उचलू शकत नाहीत 
आणि इतिहासात रेंगाळणारे 
इतिहास घडवू शकत नाहीत! 

माझे कलियुग आता त्या षड्दर्शनांच्या 
रेशमी गुंतावळी उलगडत बसणार नाही 
प्रत्यक्ष सत्यांच्या धारदार पात्यांनी 
त्या चराचरा कापीत ते जाईल 

कलियुगाला आरोपीच्या पिजर्‍यात 
ज्यांनी उभे केले 
त्यांनीच त्या पुरातन युगांचे कबुलीजबाब 
घेऊन ठेवले आहेत. 
सत्ययुगाने अमृत वाटताना 
असत्याशी केलेली तडजोड 
त्याला नाकारता येणार आहे काय? 
गुरुपत्नीशी संभोगापर्यंतची पापे करणारे ते युग 
त्याच्या शवावर शापाची क्षते अजून कायम आहेत 
गर्भवती पतिव्रतेचा परित्याग 
आणि शूद्राच्या साधनेचा शिरच्छेद करणार्‍या 
त्या त्रेता युगालाही त्रिवार वंदन असो! 

अर्धांगिनीचा जुगार खेळणारे 
आणि माणूस की हत्ती म्हणून वेळ मारुन नेणारे 
द्वापारातील त्या धर्मात्म्यांचे वारसदार 
अजून आपल्या भाकड गाईंचे 
रक्षण करीत बसले आहेत 
अरे, अशी कोणती पापे आहेत 
जी कलियुगाने केली 
आणि त्या युगात झाली नाहीत? 
असे कोणते दैन्य आहे जे कलियुगाने पाहिले 
पण त्या युगांनी भोगले नाही? 

अश्वमेधाच्या थंड वेदीत लोळलेला मुंगुस 
ती सारीच युगे तुडवीत आला नव्हता काय?
माझे कलियुग हे त्या उद्याच्या 'महामानवाचे सागरतीर' 
ज्याला धीरे धीरे जाग येत आहे 
विराटाची पाने कधी संपत नाहीत 
धुळीतील बाराखडी गिरवता गिरवताच 
ती पुरातन युगे उलथून पडली 
कलियुग आता आकाशाची पाने वाचू लागले आहे 
त्या पुरातन कल्पांच्या कल्पनेतही न मावलेले 

लक्ष लक्ष प्रकाशवर्षांच्या पलिकडल्या महाविस्तारापर्यंत 
त्याच्या दुर्बिणीचा डोळा जाऊन भिडला आहे 
आणि ते नासदियाचे आदिरहस्य 
त्याच्या प्रयोगशाळेच्या परीक्षणनळीत 
केव्हा तरी पकडले जाणार आहे 
शूद्रांच्या समूहांना मिठीत घेऊन 
कलियुग लिहीत आहे आता 'मनुष्यायन' 
आणि ते पहा लोहपंख्यांचे साहसी थवे 
आकाशाचे अग्निचुंबन घेण्यासाठी 
त्रेत्यातल्या वायुपुत्राहून उंच झेपावले आहेत 
अणूच्या घोड्यावर बसून 
आकाशगंगेला पालाण घालीत 
माझे कलियुग अटकेपार जाऊन पोचले आहे तेथे 
जेथे त्या तमाम प्राचीन युगांना प्रकाश देणारा सूर्य 
हा फक्त एक पिग्मी आहे!
   

Thursday, December 18, 2014

मराठवाडा दुष्काळ :- शेतकरी जगला तरच हा देश जगेल !!!



आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना सहकार्य आणि गावातील शेतकर्‍यांना असल्या विचारांपासून दूर नेण्यासाठी समजतील सर्वांनी एकत्र येऊन आपल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीर पाने उभे राहिले पाहिजे. शेती आणि शेतकरी वाचवण्यासाठी कार्य करणार्‍या प्रत्येकाला आमचा सलाम.
या कामामध्ये प्रतींनिधिक स्वरुपात आम्ही असलो तरी अनेकांचे पाठबळ या कामाला असल्यामुळे हे शक्य होणार आहे.
मेडिया ने आपल्या छोट्याश्या प्रयत्नांची दाखल घेतली त्याबद्दल एबीपी माझा ( ABP Majha ) चे आम्ही आभार मानतो.

Tuesday, December 16, 2014

तुझ्या येणाऱ्या सगळ्या पिढ्या फक्त शेतकरी होवोत हा श्राप

लोकसत्तेत आज कुणा मुर्खाने आपले भोकाड उघडले आणि "बळीराजाची बोगस बोंब" हा लेख लिहिलाय. बऱ्याच वेळेस काही घटनांचा नुसता निषेध व्यक्त करून काही होत नाही. अशा ठिकाणी दगडफेक आणि नैसर्गिक प्रकारे राग व्यक्त करणे ठीक असते. तरी कायद्याच्या भीतीने ते श्याक्या नाही. असो. भयंकर राग आलेला आहे.

लेखक नक्कीच शेती या व्यवसायापासून कोसो दूर असावा किवा त्याचे पोट शेती या व्यवसायावर कधीच आधारलेले नसेल. जगात जितके व्यवसाय आहेत त्या पैकी शेती हा सगळ्यात जुना. अन्न ही मुलभूत गरज म्हणून त्यावर आणि त्याच्या भावावर अनेक बंधने. तशी ती इतर अनेक व्यवसायात नाहीत. शेती कशी तोट्याची आहे हे सांगण्यासाठी मी पुन्हा अजून काही लिहायची गरज नाही. हजारो चालवली आणि अभ्यासकांनी ते केलेय. कुणाला ते वाचण्याची तसदी घ्यावीशी वाटली नसावी इतकेच.

अनेक शेतकऱ्यांच्या गळ्यातील सोने दिसते. ते शेतकरी नसतात. मुर्ख ते भूखंड किंग असतात. ते तुला नव्याने सांगायची गरज नाही. शेवटी तुझ्या सारख्याच्या हाती लेखणी म्हणजे दारू पिलेल्या माकडाच्या हाती आगकाडी. इतकेच हा लेख वाचल्यावर सुचले. कुणाला ही श्राप देवू नये असे म्हणतात. पण नापिकीने हैराण झालेल्या सगळ्या कुटुंबांकडून ज्याच्या परिस्थितीची आणि अश्रूंची तू बोंब म्हणून खिल्ली उडवलीस, त्या सगळ्यांकडून तुझ्या येणाऱ्या सगळ्या पिढ्या फक्त शेतकरी होवोत हा श्राप!   

Tuesday, December 2, 2014

दुष्काळात सगळ्यात आधी मारते ती माणुसकी

Need your Help!
----
शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या रोज येणाऱ्या बातम्यांनी मन अगदीच निराश होते. अगदी ५० हजारांच्या अडचणी मुळे जीव द्यावासा वाटणाऱ्या शेतकऱ्याच्या मनाचे दुख इतक्या दूर राहून समजणे अशक्य. पण नक्कीच जीवन भयंकर असह्य झाल्या शिवाय कुणीच ती स्टेप घेत नसणार. ती असह्यत्ता आणि ते दुख: किती असेल हे त्रयस्थ हुवून समजले जाऊच शकत नाही.
मुला-बाळांनी भरलेला संवसार असा अर्ध्यावर तोही मागे पुढे काहीच ठेवून न जाता सोडून जाने ही अतिशय क्रूर गोष्ट आहे. आत्महत्या करणाराला यासाठी माफी नकोच. तो गुन्हेगारच असतो सबंध माणुसकीचा. पण कदाचित, चूक कळत असूनही टोकाचे पाऊल उचलणारा व्यवस्थेकडून इतका छळला गेलेला असावा की या जाणीवा हि त्याच्या बोथट झालेल्या असाव्यात.
पण आता सत्य स्वीकारावे लागणारच. मारणारे मेलेत. अर्ध्यावर सगळ टाकून मेलेत. मागे मुल-मुली आहेत. हिरमुसल्या चेहऱ्यांनी जग न्याहाळणारी आपल्या बापाला शोधत. तो भेटणार नाही हे सत्य.
अस म्हणतात दुष्काळात सगळ्यात आधी मारते ती माणुसकी. पण त्यातही तुम्ही आम्ही ठरवलंच आणि अशा कठीण काळी घास वाटून खायचे ठरवले तर दुष्काळ आणि कठीण काटणे थोडे का होईना सुसह्य होते. म्हणूनच या सगळ्या परीस्थित आपण सगळे जे जे सुस्थितीत आहोत त्यांनी असा निश्चय करू की घरातल्या कर्त्याने आत्महत्या केलेल्या घरातील मुलांचे शिक्षण बंद पडू नये आणि अशा कठीण प्रसंगात कमीत कमी आता तरी काही काळ पैशाची चन-चन भाषु नये.
म्हणून यातल्या (किमान) ५० शेतकर्यांच्या मुला-मुलींच्या पुढील वर्षापासून शिक्षणाची संपूर्ण मदत Kartavya: A Duty Towards Society आणि www.jijau.com मार्फत करणार आहोत.
पण सध्या त्यांच्या विधवा पत्नीला तातपुरता प्राथमिक हातभार म्हणून प्रत्येकी रु. १०,०००/- तत्काळ मदत करण्याचा विचार आम्ही करतोय.
हे तुमच्या मदतीनेच होणार आहेत. या वेळी अगदी हक्काने मगतोय. ज्यांना शक्य असेल त्यांनी कृपया Rs. 5000/- (or 100 USD) या कामी मदत करावी. ज्यांना मदत करतोयेत त्यांची नावे आणि इतर माहिती तुम्हाला काही दिवसात देऊच. तरीही २ (तारीख २० डिसे. २०१४ आधी) आठवड्यांच्या आत त्यांना ही मदत पोहचल्यास त्यांचा माणुसकीवरचा विश्वास कायम राहील.
For Account details: drop me an e-mail: pbpimpale@gmail.com

Friday, November 28, 2014

जबरदस्त भालचंद्र नेमाडे : जोतीबा फुले आणि इतर विषयांवर

नक्की ऐकावे. पुन्हा पुन्हा. देशीवाद. मुसलमान आणि  तिहास. ईतिहासाची सर्वसमावेशकता. तसेच इतर विषय! 

Thursday, November 27, 2014

सामाजिक समतेचा संदेश देणारे आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खरं खुरं स्वतंत्र मिळवून देणारे महात्मा


आज २८ नोव्हेंबर महात्मा जोतीबा  फुले यांचा स्मृतिदिन!

खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले , भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य, भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती ...
सामान्य माणसांसाठी .. दुर्लक्षित समाजासाठी लढणारे एक असामान्य व्यक्तिमत्व. केवळ आपल्या कर्माने ज्यांनी महात्मा हि पदवी मिळवली असे महात्मा ज्योतिबा फुले.

याच महात्म्याने रायगडावर शिवरायांच्या समाधीचा शोध लावला, त्या समाधीची रीतसर पूजा करून शिव जयंतीची सुरुवात केली. हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना "कुळवाडी भूषण" म्हणून संबोधिले . त्यांनी "शेतकऱ्यांचा आसूड " या पुस्तकातून आमच्या बळीराजाचा आवाज उठवला. समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा यांच्या विरुद्ध त्यांनी उभारलेला लढा हा खरोखरच जगासाठी एक प्रेरणा आहे. शिक्षणाची गंगा सामान्य अति-सामन्यांच्या पर्यंत पोचवणारा हा भगीरथ .. ज्याने केवळ आणि केवळ सत्याची कास धरून आपल्या या महाराष्ट्राचा वैचारिक, सामाजिक कायापालट केला.

सामाजिक समतेचा संदेश देणारे आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खर खुरा स्वतंत्र मिळवून देणारा हा महात्मा.

ज्यांचा वैचारिक वारसा घेउन अगदी कणखर पणे आपली वाटचाल करणार्या महाराष्ट्राचा त्यांच्या त्या अफाट कर्तुत्वास कोटी कोटी प्रणाम! आणि महाराष्ट्रातील तरुण पिढीकडून त्यांचा वसा चालवला जावा ही अपेक्षा!

त्यांच्या स्मृतीस अभिवादन!

Wednesday, November 26, 2014

ज्यांची इच्छा वेद शिकण्याची आहे त्यांनी मदरशासारख्या विशेष वेद शाळा काढाव्यात

संघ बेरकी आहे. हे राष्ट्र सेकुलर आहे. यात शंका नाही. आणि कुणी घेऊही नये. संविधानाच्या पहिल्या पानावर तसे लिहिलेय. उलटे जे सेकुलर नाहीत त्यांनी सेकुलर व्हावे! 
जातीय द्वेषातून संघाकडे बघितले जात नाही. संघाच्या इतर जातीबद्दलच्या द्वेषामुळे/दुर्लक्षामुळे/अतेरिकी विचारांमुळे संघाचा द्वेष होतो. तो योग्यच आहे. संस्कृत एक चांगली भाषा आहे. ती एक भारतीय भाषा आहे. हिंदू धर्मातील सगळे जुने ( 'जुनाट'ही म्हणता येईल. ग्रंथ याच भाषेत लिहिलेत). पण सगळ्या भारतीय भाषांचा उगम संस्कृत मधून झाला हा इतर भाषांचा अपमान असेल आणि शास्त्रीय दृष्ट्या ते चूकही असेल. उर्दू/संस्कृत दोन्हीही इथे मेनस्ट्रीम मध्ये लोप पावलेल्या भाषा आहेत. त्या दोन्हीचा बावू करू नये. संस्कृत अनेक वर्षांपासून वैकल्पिक विषय आहेच. असायलाच हवी. राहील ही. वेद वगैरे काही समाज उपयोगी असतेच तर त्यांच्या अस्तित्वा पासून आता पर्यंत काही तरी मोठे घडलेच असते! ज्यांची ज्यांची इच्छा वेद शिकण्याची आहे त्यांनी मदरशासारख्या विशेष वेद शाळा काढाव्यात. मेनस्ट्रीम मध्ये वेदांची लुडबुड नको. याच निमित्याने मदरशात शिकानारांसाठी धार्मिक शिक्षण घ्याचे असेल तर घ्या. पण मेन स्ट्रीममध्ये प्रगती पाहिजे असेल तर पोरांना मेन स्ट्रीमच्याच शाळेत घाला! बाकी नरेंद्र मोदी संख्येने जास्त म्हणजे बहुजन समाजातील आहेत तरीही ते पंतप्रधान झालेत याचे कारण लोकशाही! नसता शक्य नव्हते. आज संविधान दिवस त्याच्या तुम्हाला शुभेच्छा!

Monday, November 24, 2014

पुरोगामी महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी



अवघ्या ७० वर्षांच्या आयुष्यात साहेबांनी जे काम केले आणि महाराष्ट्राची आणि देशाची जी सेवा केली ती स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळातील काहीच एकमेवाद्वितीयांपैकी एक. साहेबांनी संतांची आणि समाज सुधाकारांची पार्श्वभूमी असणाऱ्या महाराष्ट्रात पुढे त्याच पायावर शिवाजी महाराज-फुले-टिळक या आणि अशा अनेकांच्या विचारांच्या प्रेरणेने नव्या महाराष्ट्राचा कळस उभा केला. महाराष्ट्रातील राजकारणाला अतिशय आदर्श असे मापदंड घालून दिले. व्यक्तिगत आणि क्षेत्रीय विचारांच्या पलीकडे राष्ट्रहितासाठी राजकारण हा जो पायंडा महाराष्ट्रातील राजकीय चळवळीला लाभलाय तो म्हणजे यशवंतरावांचीच देन. 

आजच्या दिनी त्यांचे विचार पुन्हा मरगळ आलेल्या मनांना राष्ट्र उभारणीची प्रेरणा देवो ही प्रार्थना!

साहेबांबद्दल अधिक : http://www.mukhyamantri.com/2012/03/blog-post_11.html

Friday, November 14, 2014

मराठा समाज आरक्षण

मित्रानो मराठा समाज आरक्षण ला न्यायालयाने स्तगीति दिली हे खरोखरच दुर्दैवी आहे. आता सरकार त्याचा पाठपुरावा करेल आणि आदरणीय न्यायालय पुन्हा विच्यार करेल हीच अपेक्षा करतो .
  पण मित्रहो माला इथं खरच सांगायचं आहे की  आपला समाज मागे पडन्या मागे बऱ्याच कारणं पैकी एक  कारन म्हणजे आपला समाज हेच आहे . होय मला आसां वाटतं की मराठा समाज मागे पडण्या मागे मराठा समाज पण एक कारन आहे. मराठा समाज मोठेपना, हुज्जतपना , मीपना ह्यतच मागे पडला , मराठा समाज स्वतःचा बढेपना हयात मागे पढला. मराठा समाज एकमेकांचे पाय खेचन्या मधे मागे पडला  आणि  एक मेकांना कमी लेखण्या मधे मागे पडला. आपल्या  समाजाच्ं झालं आसं की समाजाला वर नेने समाजाला सुधारने तर सोढाच आपल्या समाजाचा सगळ्यात पक्का वैरी कोण तर आपलिच भावकी
      आपल्या तालुक्यात आणि जिल्ह्यात तर ह्याची प्रचिती ज्यास्तच दिसून येईल. तुम्ही बरकायिने विच्यार करा , आपल्या तालुख्या मधे आणि जिल्ह्या मधे मराठा समाज एक मेकांचे लांग्या (खेकदयाच्या) खेचन्या मधे मग्न आहे.  त्यामुळे झालं आसं की एकमेकांच्या लांग्या खेचन्या मधे आज काही अपवाद वगळता सगळेच अपंग बिना लांघी बिना पयाचे लंगड़े झाले आहेत. एकूणच मराठा समाजाच्या ह्या सगळ्या गोष्टी मुळे आज समाजाची परिस्तिथि खीळ्खीळ झाली आणि आपल्या समाजाच्या ह्या पाय खेचने खेलामुळे दूसरे कधी दूर पुढे निघुन गेले काही कललेच नाही.
    मित्रांनो ह्या गोष्टी चा विच्यार करने गरजेचे आहे . राजकारण असो(मुख्य तर आपल्या समाजाला तेच आहे ) , शिक्षण असो , व्यवसाय असो की शेती सगळी कड़े आपल्या समाजाला कशी मदत करता येईल ते पहावे लागेल. एखादा कुणी व्यवसाय सुरु करत असेल तर ते कधी बंद पडेल आसा विच्यार करण्यापेक्षा त्याला कशी मदत करता येईल , एखादा शिक्षण घेत असेल तर नोकरी साठी कोंडी निर्माण करण्या पेक्षा त्याला कशी मदत करता येईल , आज आपल्या समाजाचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती ,शेतीला कशे पुढे नेता येईल शेती करणार्याला कसं प्रोत्सान देता येईल ह्याचा सगल्यांनी विच्यार करायला पाहिजे.
    मित्रहो आता आपल्यालाच ठरवायच आहे की आपल्या पूर्वजां च्या महान कार्या मुळे मीळालेली शुर मराठा मर्द मराठा पदव्या ....आपण शुर मराठे , मर्द मराठे  नुस्तं भाषाणां पुरते, मेसेज पुरते, लेख पुरते सिमित ठेवायचे आहे की कृतितुन दखवायचं आहे
    आरक्षण मिळणार की नाही हे मी नाही नाही सांगू शकत पण एवढं नक्की सांगेन की मराठ्यांच्या मनात जर आलं तर नक्कीच आशी परिस्तिथि बनवतील समाजाची की पुढच्या सात पिढ्या आरक्षणा ची गरज वाटनार नाही आणि खरच आरक्ष मीळाल्यावर मी जेवढा आनंदी होईल त्या पेक्षा मी त्या दिवशी आनंदी होईल ज्या दिवशी आपला समाज आरक्षण ची गरज नाही आशी परिस्तिथि निर्माण करेल.
जय भवानी जय जिजाऊ जय शिवजी
सुधाकर पाटिल
15 नवेम्बर 2014

Wednesday, November 12, 2014

ह्यलाच म्हणतात राजकारण

वाह ...ह्यलाच म्हणतात राजकारण , आज खरी जीत नेमकी कुणाची झाली हे खऱ्या खर्यांना नाही कळले. सिंगल लार्जेस्ट पार्टी असून सुधा अल्प मत्तांच सरकार ते पण आवाजावरनं स्थापन केलेली भाजपा , की स्वाभिमान दखवानारी शिवसेना की फक्त 41 आमदार घेऊन चौथ्या क्रमांकावर जावून सुधा एकदम महत्व प्राप्त करुण घेतलेली राष्ट्रवादी ...खरच नेमका विजय झाला कुणाचा .
   आसं पण म्हणतायत की आज जर गुपित मतदान झलं आसतं तर कदाचित सरकार पडलं पण असतं पण काही केल्या राष्ट्रवादी ला सरकार पाडायचं (आत्ता)नहिये . कारन आत्ता सरकार पडलं आणि फेर निवडणूक झाल्या तर भाजपा निवडून येईल मग 6 12 महीने भाजपा सरकारला खेळ खेळु द्यायचा , सरकारच्या प्रत्येक घडामोडी वर शिवसेना नजर ठेऊन राहील आणि शिवसेना आक्रामक होईल आणि सरकार ला धरेवर घरेल. मग जनता महाराष्ट्र भाजपा वर नक्कीच नाराज होईल लोकांना महाराष्ट्र भाजपा चा राग एययला लागेल (जसा आता माला राग येत आहे ) मग जनतरचा कौल पाहून सरकार ला पड़ायाचं .
   मित्रानो मला जर विच्यारलात तर, सगळे नाट्यमय घडामोडी पाहून माला तरी आसं दिसून आलं की एवढा महान नेता लभलेला असताना सुधा आणि त्या नेत्यांच्या मुख्या नारा "सबका साथ सबका विकास " "सबको साथ लेके चलना है" असतांना सुधा महाराष्ट भाजपा ला शिवसेनेला शेवट पर्यन्त सोबत घेता आलं नहिये हयात महाराष्ट्र भाजपा मधे अनुभव ची उणीव नक्कीच दिसून आली . सत्ते मधे न जावून शिवसेना आपला महत्व वाढून घेतली तर सत्तेचे दोर आपल्या हाती ठेऊन राष्ट्रवादी जिंकली . तर मला तरी वाटते जिंकून सुधा आज महाराष्ट्र भाजपा नाही जिंकली तर राष्ट्रवादी आणि शिवसेने चा आज नक्कीच विजय झाला.
सुधाकर पाटिल
12 नव्हेम्बर 2014

दिवस गेले.....

हे असे असतात. ते तसे असतात. असे विश्लेषण करण्याचे दिवस गेले.... कोण कसे वागेल काही अंदाजा नाही!

Friday, October 31, 2014

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हार्दिक अभिनंदन



महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नव्या शासनाचे हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या तडफदार नेतृत्वाने महाराष्ट्र अजून उंचस्थानी जावो या शुभेच्छा. प्रामाणिक आणि स्वच्छ अशी प्रतिमा असणारे देवेंद्र फडणवीस पृथ्वीराज चव्हाण यांच्या सारखाच स्वच्छ आणि प्रगतीचा कारभार करतील असा विश्वास आहे. 

महाराष्ट्राच्या जनतेने टाकलेला विश्वास हा विकास आणि स्वच्छ कारभार यासाठी आहे हे सगळेच नवनिर्वाचित आमदार लक्षात ठेवून महाराष्ट्राच्या आणि आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी तत्पर राहतील या शुभेच्छा!

विरोधी पक्षही आपली जबाबदारी न विसरता या विकास प्रक्रियेत सहभागी राहील अशी सदिच्छा!

जय महाराष्ट्र!    

Run for Unity!

I have not yet walked for unity! But I am for Unity. I believe more in unity of hearts than just the unity of lands. I think it will be more meaningful if we walk to those who are underprivileged, out caste (as per the elites definitions). I hate all this as it's an opportunity for 'most' to take the selfie and 'just' show how much they love the nation. I bet, offer them a permanent visa to a dollar or pound paying country and 'many' will run for 'getting out of this nation as soon as possible'!

It's not because I wasn't able to take the selfie and post. It's because 'events' like these keep the real concerns neglected. I hope everybody who is running today also remembers that the country has farmers who feed them and the same farmers are facing 'lowest prices for goods' in recent times. I hope they also remember the caste system here has recently chopped a family into pieces. Shankaracharya here has asked to ban Temple entry to Dalits.

I hope we run to connect and meet to these hearts who live with us!

Saturday, October 18, 2014

निकाल … पथारी-परभणी आणि जिंतूर विशेष

Updating with every Update
>पाथरी : फड आघाडी, त्यानंतर वरपूडकर. - 6% (Ph) and 4%(Wa) vote share - updates to 8.4 and 5.7 - Fad tejit  - ९.३४ आणि ८.१३ - टोटल मतदार ३३३५२६ - गणती झाली १०९५४७(३२. ८४)
>जिंतूर भाम्बले आघाडीवर. नव्या चेहऱ्यांना हास्य  - जवळपास विजयांचा विजय! - 7%(Vi) and 5.5%(Bo) vote share - updates to - 8.5% and 6.2% - update 9.80 and 7.2 - ११.०१ आणि ८.३३ विजय तेजीत - टोटल मतदार 324012 - गणती झाली ७६४८६(२३.६०) - 12.15 and 9.05 till now 25.79 counted - 13.45 and 10.25 counted 28.65% - 14.38 and 10.95 counted 30.75
>परभणीत सेना आल्या सारखीच आहे! - shivsena and BJP - 5.5%(Dr) and 2.5%(bh) vote share - updates to 8.72 and 4.26 - update 9.72 and 4.8 - आता अपडेट देणार नाही. सेनेचा विजय निस्चित. - tarihi 11.5 and 5.7 total counted 26%
>औरंगाबादमधील एम आय एम चा विजय निश्चित. राष्ट्रवादी आधीच मानेज झाली होती  भाजपने धर्माचे महत्व इतके वाढवले कि, धर्मन्धाच हवे तर आपलेच का नको 
>गंगाखेड चुरस - पैसे कुठे गेले ?
>माजलगाव, बीड चुरस
Stopped Updating - Please get updates here

DATA:


FAD MOHAN MADHAVRAO Independent 31158 109547 9.3420003238 Votes Counted % PATHRI
ABDULLAH KHAN A .LATIF KHAN DURRANI Nationalist Congress Party 27123
8.1321995886 32.8451155232 Total Voters 333526
WARPUDKAR SURESH AMBADASRAO Indian National Congress 22709
6.8087645341


MEERA KALYANRAO RENGE Shivsena 15997
4.7963277226


HARIBHAU VITTHALRAO LAHANE Maharashtra Navnirman sena 2871
0.8608024562


COM. VILAS SAHEBRAO BABAR Communist Party of India (Marxist) 1499
0.4494402236


SITAFALE VIJAYKUMAR TULSHIRAM Swabhimani Paksha 1419
0.4254540875


ARJUN RAMRAO SABLE BHOGAOKAR Bharipa Bahujan Mahasangh 1288
0.3861767898


RAMESH YAMAJI GHAGARE Independent 771
0.2311663858


GUJAR SUBHASH YELAPPA Bahujan Samaj Party 724
0.2170745309


RUMALE TUKARAM DHONDIBA Prabuddha Republican Party 531
0.1592079778


PATHAN TALEWARKHAN PATHAN SHERKHAN Independent 448
0.1343223617


ASHOK GANPATRAO GAIKWAD Independent 427
0.128026001


JANARDHAN SAMBHAJI HATAGALE Independent 373
0.1118353592


KALE BAJIRAO SHANKARRAO Independent 334
0.1001421179


MRS. SHANTABAI MANOHARRAO SHAMKUWAR Independent 277
0.0830519959


JADHAV NARAYAN GULABRAO Independent 232
0.0695597944


CHAVAN REVA HARI Independent 227
0.0680606609


None of the Above None of the Above 774
0.2320658659


None of the Above None of the Above 365
0.1094367456






JINTUR 



BHAMALE VIJAY MANIKRAO Nationalist Congress Party 46593 99666 14.3800229621
30.7599718529
KADAM RAMPRASAD WAMANRAO (BORDIKAR) Indian National Congress 35483 324012 10.9511376122


SANJAY NARAYAN SADEGAONKAR Bharatiya Janata Party 9109
2.8113156303


PATIL (KHARABE) RAM SUKHDEV Shivsena 1663
0.5132525956


BHAGWAN PRABHUAPPA GUNJKAR Bahujan Samaj Party 1144
0.353073343


COMRADE RAJAN KSHIRSAGAR Communist Party of India 895
0.2762243374


S. RAIS S. IDRIS Independent 660
0.2036961594


AD. LAXMANRAO PUNJAJI BANSODE Independent 659
0.2033875289


KAILASH DIGAMBARRAO PARWE DUDHGAONKAR Independent 567
0.1749935188


A. HARUN A. KHUDDUS Independent 356
0.1098724739


CHAVAN VITTHAL CHANDU Independent 319
0.0984531437


ARJUN DADARAO DARADE Independent 239
0.0737627001


SY. DILAWAR SY. JAMAL SAHAB Independent 201
0.0620347395


ANIL GANGADHAR WATODE Bahujan Mukti Party 179
0.0552448675


THITE MANOJ MUNJABHAU Independent 168
0.0518499315


AD. VISHNU DAGADU DHOLE Independent 164
0.0506154093


SANDIP GULABRAO CHAVAN Peasants And Workers Party of India 148
0.0456773206


YAHIYA KHAN ZAFAR KHAN Majlis Bachao Tahreek 109
0.0336407294


UMRAO GHANSHAM SALVE Republican Party of India 58
0.0179005716


None of the Above None of the Above 952
0.2938162784


Friday, October 17, 2014

धर्म आणि जात संघाच्या रक्तात भिनलिये

नुकत्याच झालेल्या निवडणुका आणि येणारे अंदाज बघता निकालाची दिशा कळतिये. तसेही, निवडणुकांपूर्वीच आघाडीची सत्ता येणार नाही हे सांगायला फार कुणा महान व्यक्तीची गरज नव्हती. फक्त आघाडी नाही तर कोण? पुढे, लोकसभेतील निकालाने त्याची झलक दिसल्याने अंदाज बंधने अधिकच सोपे झाले. शिवसेनेसोबतची तोडलेली युती हा कुणालाही समजणारा "कमीत कमी पक्ष तरी बांधून घेऊ" चा भाजपचा उदेश्या काहीका होईना सफल झाला.

प्रचाराच्या धुळीत सेनेने भाजपचा पार "कमळाबाई पासून दिल्लीहून आलेल्या फौजा" इथवर उल्लेख केला. आरोप झाले. फेका फेकी झाली. भाजप ने नरेंद्र मोदी या 'प्रचार प्रमुखाच्या' (पंतप्रधानाच्या नाही) जीवावर इथली सतत हातात घेण्याचा जो व्यावहारिक प्रयत्न केलाय त्याला वाखानावे लागेल. ज्या प्रकारे भाजपने महाराष्ट्रातील सरकार कसे अतिशय नाकर्ते होते आणि विकासाच्या नावाने इथे काहीच नाही ही भावना गोबेल्सच्या नीतीने, जाहिरातबाजीच्या साह्याने जनमाणसावर बिंबवली ते भाजपच्या व्यापारीकातेचे उदाहरण.

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस ने केलेला कारभार अप टू द मार्क नसला तर महराष्ट्र कुठे नेवून ठेवलाय ? असे विचारण्यासारखा तरी नाही. हे समजून घ्यायला पाहिजे. ते का? तर लबाडीच्या जोरावर कुणी महाराष्ट्र काबीज करू इच्छित असेल तर ते चूक. भाजपला वेगळ्या प्रकारची जाहिरात करता आली असती. चांगला जाहीरनामा देता आला असता. पण विकासाच्या नावावर मते मागण्या ऐवजी, त्यांनी दादा काय म्हणाला आणि आबा काय म्हंटला, अमेरिकेत आजपर्यंत डंका वाजला होता का? वाजला होता का? असले प्रश्न विचारले.

माझ्या आजच्या लिखाणाचा उदेश्या तसा कुणाची सत्ता येणार आणि काय होईल हा नाही. भाजपच्या दुटप्पी आणि बेगडी भूमिकेचा चेहरा फक्त चित्रित करायाचाय. तशी या चित्राची सुरवात आणि अंत "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" नावाच्या रेषेनेच करावी लागेल. भाजपची जादू ओसरायला लागलीकी संघातून त्याला रसद पुरवली जाते. आता संघ ही काही अतेरिकी संघटना नाही. देशभरात अनेक ठिकाणी समाज उपयोगी कामे ही संघाच्या माध्यमातून केली जातात. शाळा आणि इतर माध्यमांद्वारे संघ विचारसरणी देशात अनेक वर्षां पासून टिकून आहे.

तर संघाच्या चांगल्या स्वरुपासोबतच संघाचा "हिंदू अजेंडा" ही भारतातील धार्मिक अशांततेला कारणीभूत आणि अप्रगातीला कारणीभूत असणारी एक दुर्दैवी गोष्ट. गेल्या अनेक वर्षात संघ प्रेरित हिंदुत्ववादी संघटना उभ्या राहिल्या. धार्मिक तेढ निर्माण झाली. राजकारणातील विकास आणि भ्रष्टाचार विरोध या गोष्टी बाजूला पडल्या गेल्या. कदाचित ही धार्मिक तेढ नसती तर भारताचे स्वातंत्र्य पासूनचे राजकारण वेगळे राहिले असते आणि हा देशही कदाचित वेगळ्या उंचीवर राहिला असता.

अगदी आजचे, आज म्हणजे आज रोजी १७ ऑक्टो २०१४ चे, संघाचे विचार :

"राम मंदिर हा देशाचाच अजेंडा आहे. त्यासाठी आजवर झालेल्या आंदोलनांना संघाने कायमच पाठिंबा दिला आहे. भाजपच्या जाहीरनाम्यातही राम मंदिर उभारणीचा उल्लेख आहे. मात्र, त्यासाठी सरकारकडे २०१९पर्यंत वेळ आहे. सरकारचे स्वत:चे काही प्राधान्यक्रम आहेत. सरकारला आधी सामान्य माणसाशी संबंधित समस्यांकडे लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे आम्ही आताच सरकारकडे मंदिराबाबत काहीही मागणी करणार नाही" - (संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, )
राम मंदिर हा हिंदुत्ववाद्यांच्या 'हातचा' मुद्दा, कुठे बेरीज कमी पडली कि घेतलाच 'हातचा' ! विकासाच्या नावावर मते मागत असतांना हे असले "छुपे अजेंडे काखेत सुरीसारखे बाळगणे" ही जनतेची फसवणूक होय. तर बरं अयोध्येत राम मंदिर होणे चूक का ? तर नाही. पण विवादित जागेवरच ते व्हावे हा, प्रभूरामांपेक्षाही यांचा असलेला अस्मितेचा प्रश्न, तो चूक! काही युगापूर्वीची रामजन्मभूमी जर अस्मिता होत असेल, तर मग त्याच गणिताने काही अनेक शतकांपूर्वी पासून इथे राहत असलेला आणि इथच्या समाजाचा भाग झालेला आणि झालेले धर्म का म्हणून आपली अस्मिता विसरतील? त्याच गणिताने आजही जातिभेदाच्या जखमा सहन करणारे समाज अस्मिता म्हणून उभे राहिले तुमच्या विरोधात तर, का म्हणून त्याची ऍलर्जी ? या प्रश्नांची उत्तरे देतांना "आम्ही नाही त्यातले" असा आव संघ सदैव अनत आलाय, तोच त्याचा बेगडीपणा. मुखात राम बगलेत सुरा. किंवा मग अतिशय सोप्पा मार्ग म्हणजे स्वतः साठी एक नियम आणि इतरांसाठी दुसरा.

त्यांच्या भूतकाळापासून आजवरची संघाची विचारसरणी बघितल्यास साचेबद्ध आखणी दिसेल आणि धर्म आणि जात संघाच्या किती रक्तात भिनलिये ते समजेल. हा सगळा अट्टाहास या साठीच की शाहू फुले आंबेडकर आणि गांधी यांचा द्वेष करणारे त्यांच्या नावे मते मागून त्यांना हवे ते 'अजेंडे' समोर आणणार असेल तर त्याचा विरोध प्रत्येक नागरिकाने करावा. लोकशाहीत मते मागायला बंधन नाही. तुमच्या विचारसरणीची लोके इथे असतील तर बिलकुल तुम्ही निवडून याल. पण मते मागतांना तोंडावर एक आणि सत्ता गाजवतांना काखेत एक असे करणे म्हणजे शुद्ध फसवणूक!
  
संघाच्या वेबसाईट वरील हा मजकूर -

यह भारतीय राष्ट्रजीवन, अर्थात हिंदूराष्ट्र है | ‘हिंदू’ शब्द जातिवाचक नहीं है | अनादि काल से यहाँ का यह समाज अनेक संप्रदायों को उत्पन्न कर, परंतु एक मूल से जीवन ग्रहण करता आया है | उसके व्‍दारा यहाँ जो समाज स्वरूप निर्माण हुआ है, वह हिंदू है |-परम पूज्य श्री गुरूजी
      

संघ सुरु होत असतांना -




पुढे -

श्री गुरुजी को संघ का सरकार्यवाह घोषित किया।
हिंदी और मराठी प्रार्थना के स्थान पर संस्कृत प्रार्थना स्वीकृत।
संस्कृत में संपूर्ण आज्ञाएँ देना प्रारम्भ।

संपूर्ण व्यवस्था नव्हे तर त्यातील 'हिंदूच फक्त' 'राष्ट्रीय' नाव धारण करणाऱ्या या संघटनेचे मूळ आहे. असण्याला हरकत नाही. पण राष्ट्रीयत्वाच्या नावाने सूर आळवू नये असे वाटते -



Swyamsevaks Participated in 'Bhaganagar Mukti Sangram' satyagraha, [Hydrabad freedom movement] a movement against the Nizam rule and its Hindu repressive policies.




वीर सावरकर ने पुणे प्रांतिक बैठक को संबोधित किया।
श्यामा प्रसाद मुखर्जी ने डॉक्टरजी से मिलकर बंगाल के हिंदुओं  की दुर्दशा पर चिंता व्यक्त की।


3 जून काँग्रेस ने विभाजन का प्रस्ताव स्वीकार किया। हिंदू समाज तथा स्वयंसेवकों को यह जबरदस्त आघात लगा। विभाजन की अपरिहार्यता देखकर संघ ने हिंदुओं को मुस्लिम अत्याचारों से बचाने पर लक्ष्य केंद्रित किया। 300 से भी अधिक सहायता शिबिर हिंदू शरणार्थियों के लिए चलाए।



आणि १९९० ते २००० ला ते हे म्हणतात -

The decade of Ram-Janmabhoomi movement. A great Hindu upsurge of unity. 

तर हा काही नवीन शोध नाही की संघ हा हिंदुत्व वाढी आहे. तो आहेच हिंदुत्ववादी आणि ज्याला सत्ता स्थापनायासाठी संघाने मदत केलीये तो पक्षही हिंदुत्वादी आहे, इतकेच काय ते पुन्हा सांगायचे. तुम्ही म्हणाल आहे हिंदुत्ववादी, त्याने काय फरक पडतो? तर, भूतकाळात पुन्हा एकदा डोकावून बघा. यांना अपेक्षित असणारा हिंदुत्ववाद हा संघाला पुळका असलेले लोक म्हणतील त्या दिशेला इतरांनी पूर्व म्हणावे असा आहे. मानसिक गुलामगिरी सहन करून जगल्याने देशाचे इतके वाटोळे झालेय कि पुन्हा ते दिवस नकोत. इतकेच.

अजूनच संघाच्या इतर साचेबद्ध गोष्टींकडे आजच लोकसत्तेतून  कोरडेंनी प्रकाश टाकलाय. http://www.loksatta.com/vishesh-news/rss-and-other-fundamental-hindu-organisation-ever-ridicule-mahatma-gandhi-1032194/?nopagi=1.

असो. इथे तरी आम्हाला पुन्हा धर्माच्या नावाने दंगली नकोयेत!

Monday, October 13, 2014

तुम्ही सरकार निवडण्यासाठी मतदान करत नाही आहात.....



१५ ऑक्टो २०१४ ला होणारी विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रासाठी एक अतिशय महत्वाची अशी संधी आहे. सर्व पक्ष यावेळी आपली ताकत अजमावत आहेत. माजलेले सत्ताधारी आणि आम्हीही आल्यावर सत्तेचा आणि धर्माचा मज दाखवू हे जाणू न देता 'आम्ही आता बदलोय' असा बोम्बलत सांगणारे विरोधी.

या सगळ्या गोंधळात मतदार भांबावलेला आहे. विधानसभेला शक्यतो अतिशय लोकल अशा विषयांवर निवडणूक होत असते. पण शेवटी सरकार कुणाची येईल किंवा बहुमत कुणाला मिळेल हे शक्यतो एकंदर मागील कारकीर्दीवर आणि घोषनापत्रावर ठरते.

यावेळी सगळेच पक्ष आप-आपल्या चुली मांडून बसल्याने मागील वेळी करपलेली भाकर ही युती किंवा आघाडील इतर घटक पक्षामुळे, असे आरोप होत आहेत. एकंदर पाहता थंड असलेले विरोधक अचानक निवडणुकीलाच जागे झालेत. आघाडीचा कारभार हवा तसा झालेला नाहीच, पण त्याच मानाने विरोधक ही याला जबादार. शासन चालवणे म्हणजे फक्त सत्तेतील पक्षाची जबाबदारी असते असे धरून चालणारे राजकारण इथे निपाजाल्याने सत्ते साठीच हे लोक राजकारण करतात यात शंका नाही.

आज प्रचार थांबतोय. शेवटी प्रचारांती असे दिसते कि जाहिरातबाजी ही लोकमन वळवण्यासाठी अतिशय खमके साधन आहे आणि त्याच्या अतिशय चांगला उपयोग या वेळी केला गेला. तोही इतकाकी 'निरमाची पावडर विकणाऱ्या हेमा, रेशमा … गायबच झाल्या!' एकंदर प्रचारात कॉंग्रेसची जाहिरात ही कॉंग्रेस सारखी शांत काही अंशी सुस्त, तर राष्ट्रवादीची त्या सारखीच 'प्रचंड आशावादी'. पण या वेळी आशावादी राहून फायदा होईल कि नाही माहित नाही! भाजप वर्षभर शाळेत न येता अचानक परीक्षेला सगळा 'थेअरी' अभ्यास करून  येणाऱ्या विध्यार्थ्या सारखा जाहिरात तंत्रातील सगळे हथखंडे वापरून जाहिरातींच्या बाबतीत आपले 'व्यापारी' तंत्र चांगले आजमावून गेला. त्यांच्या जाहिराती ह्या निश्चितच त्या क्षेत्रातील जबरदस्त लोकांनी चांगल्या मोबदल्याच्या अपेक्षेने बनवल्यात यात शंका नाही. पण जाहिराती खर्या मराठी वाटल्या त्या शिवसेनेच्या. लोकगीतांचा अतिशय चांगला वापर आणि आपण अस्सल मराठी आहोत याचे दर्शन यातून झाले. पण शिवसेनेतील सगळा राडेबाजपणा किंवा येन केन प्रकारे जनतेच्या प्रश्नाबाद्दलची तळमळ दिसली नाही. मनसेने शेवटच्या काही दिवसात सरकारी जाहिराती सारखी जाहिरात करून आपणही टीव्हीवर जाहिरात देऊ शकतो हे दाखवले. असो. जाहिरातीवर इतका लिहिण्याच कारण म्हणजे, जाहिरात बाजी या वेळची सत्ता ठरवणार आहे!

कोट्यावधी रुपये खर्चून त्यांनी जाहिराती केल्या असल्या तरी, स्वतःचे डोके स्वतःच्या शरीवारच असल्याने मतदारराजा भुलणार नाही अशी भाबडी अशा. तर आज एक प्रयत्न करा. सगळ्या जाहिराती विसरा. महाराष्ट्र इथेच आहे आणि फक्त आशावादी असूनच काहीच होत नाही, मराठी अस्मिता महत्वाची पण पोट भारत नाही आणि फक्त स्वच्छ प्रशासनाने प्रश्न सुटत नाहीत, त्या स्वच्छतेचा सामान्य माणसाच्या आयुषावर जाहिराती बाहेर हि परिणाम झाला पाहिजे; हे लक्षात ठेवा.

मतदान करण्यापूर्वी एकदा आपल्या मतदारसंघातील सगळे उमेदवार कोण आहेत हे समजून घ्या. सार्वजनिक, व्यक्तिगत नव्हे, प्रश्नाला कुणी आपला वेळ दिलाय आणि लोकांच्या नव्या प्रश्नाची आणि नव्या जगाची कुणाला जाणीव आहे असे नेतृत्व शोधा. तो निवडून येईल की नाही याचा विचार करू नका. निर्वाचन आयोग त्यासाठीच नेमालेय. परत एकदा लक्षात ठेवा तुम्ही सरकार निवडण्यासाठी मतदान करत नाही आहात. ते करत आहात तुम्ही तुमचा प्रतिनिधी निवडण्यासाठी. नसता वरती वेगळे सरकार असल्याने आम्ही काम करू शकत नाही असे म्हणारे सरकार आले तरी काहीच करू शकत नाहीत, ते मुळातच षंढ असतात. कार्यकुशल आमदार कार्य कुशलच असतात.  ते इतरांच्या नावे बोंबा मारत नसतात. पैसे घेउन मतदान करणार असाल तर, पैसे देवूनच कामे करून घ्यायची तयारी ठेवा.

यावेळी दोन गोष्टींशी आपला लढा आहे :
१) सत्तेचा माज
२) धर्मांध आणि जातीय शासन

बाकी. शिवरायांच्या महाराष्ट्रात कोणत्याही गलथान व्यवस्थेला पलटवून लावायची ताकत आहेच!

मतदान ही इतकी महत्वाची बाब आहे कि जिने तुमचे भविष्य उज्वल होऊ शकते आणि न केल्याने अंधकारमय!  


जय जिजाऊ! जय शिवराय!



        

Wednesday, October 8, 2014

अरे हा कसला मूर्खपणा?


Monday, October 6, 2014

अरे हा इथेय महाराष्ट्र माझा ....


Wednesday, August 27, 2014

शंकराचार्य आणि साई बाबा

शंकराचार्याचा निषेध. साई बाबांचा एकेरी उल्लेख करणारे हे कोण लागून गेलेत. साईच्या भक्तीचा उगम भक्तांच्या हृदयातून होतो. फक्त भगवे कपडे घरून त्यागी होता येत नाही, गुरुही नाही आणि देव तर मुळीच नाही. त्यासाठी खरोखर त्याग करावा लागतो, लोकांच्या दु:खाला ओ द्यावी लागते आणि त्यांच्या जखमावर फुंकर घालावी लागते. आणि हे जो कोणी करेल तो इथचा देव असेल. साई आजही लक्षावधी लोकांच्या भक्तीने अस्तित्वात आहेत आणि असतील. - साई बाबाचे जन्मस्थान पाथरी येथील एक रहिवाशी!


आणि 

हवे तर आपण साई बाबा बाहेर ठेवू. इथच्या लक्षावधी लोकांच्या 'श्रीमंतच' का असेना, मनात साई बाबा आहेत. त्यांची आणि त्यांच्या भक्तांची श्रीमंती या शंकराचार्याच्या डोळ्यात खुपतेय हे सांगायला शेमडे पोर ही पुरेसे. साई बाबा आणि त्यांचे चमत्कार बाजूला ठेवा. पण असंख्य जनसमुदाय शिर्डीत आणि पाथरीत नथमस्तक होतो, पैसा आणि बंदुका स्वतः पासून दूर करतो. तेच आम्हा वंदनीय. आणि शंकराचार्यांची साई बाबांशी तुलना करूच नका. साई बाबा जगाला माहित आहेत. इथे शंकराचार्याचा फोटो टाकला तर 'हे कोण' ? असे म्हणणारे १००० भेटतील आणि त्यांना आदर द्यायला वयसोडून इतर कोणताही मुद्धा नाही. वयामुळे आदर दिलाही असता पण …. . भले तर देऊ कासेची लंगोटी !! नाठाळाचे माथी हाणु काठी !! … म्हणून शंकराचार्य कोण ?

--
कॉमेंट्स :


  • Laxminarayan Thorat आज काल पेपर मधील बातम्या वाचून मला असा वाटत आहे कि हिंदू धर्माची मूळ व्याखा काय आहे?. प्रत्येक संत, बाबा, महाराज इ. लोक भगवे कपडे घालून, हिंदू धर्माची व्याखा आपल्या सोयीनुसार बदलत आहेत आणि जर फक्त भगवे कपडे घालून धर्माचे ज्ञान प्राप्त होत असेल तर सर्वानीच भगवे कपडे वापरण्यात काहीच चुकीचे नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार अश्या संत, बाबा किंवा स्वयंघोषित देवांना पाठींबा देण्यासाठी आणि विरोध करण्यासाठीही पुष्कळ लोक आज आपल्या देशात आहेत.
  • प्रकाश बा. पिंपळे 'हिंदू' कोण ?  या शंकराचार्याचा गैरसमाज झाला. त्याने स्वतःला हिंदू समजले. तो इतर कोणत्या तरी इतर धर्माचा कोणी तरी असेल. 
    20 hours ago · Edited · Like · 1
  • Shweta Tyagi sir, please write in hindi or english...i want to read ur posts
    20 hours ago · Unlike · 1
  • Shivraj Kalshitte Mr Prakash to protect ur thoughts u r also doing same as per second sentence.
    If u take positively Sai Baba is a great human being rather than God. Sai baba would say same what currently he is saying.
    Please read again ur 10th standard marathi topic Mahapurushancha Parabhav by Janardan waghmaare
    19 hours ago · Unlike · 2
  • प्रकाश बा. पिंपळे  हरकत नाही शिवराज भाऊ. साई बाबांचा पराभव होऊ शकत नाही. कारण ते या शर्यतीतून कधीच बाहेर पडलेत. इतकेच हवे तर आपण साई बाबा बाहेर ठेवू. इथच्या लक्षावधी लोकांच्या 'श्रीमंतच' का असेना, मनात साई बाबा आहेत. त्यांची आणि त्यांच्या भक्तांची श्रीमंती या शंकराचार...See More
    18 hours ago · Edited · Like · 1
  • Shivraj Kalshitte My only request is let Sai Baba stay in Heart of all of us. Lets not make temples and make it commercial . Sai baba will be happy to stay in free food feeding place or with poor people rather than on golden throne . Problem of Indians is we makes god ...See More
    16 hours ago · Unlike · 2
  • प्रकाश बा. पिंपळे Ok. Then lets not have temples of Ram Krishna Hanuman 
  • Pradyumna Deshpande I agree! शंकराचार्य हे धर्मगुरूपद आहे आणि त्याचा योग्य मान राखणे हे त्यांचे कर्तव्य. साईबाबा खरे होते कि खोटे हे ठरविण्याचे त्यांचे काम नाही. आणि परवा स्टेजवर जे नाटक पाहायला मिळाले ते एक किळसवाणे प्रदर्शन आहे. आदी शंकराचार्यांचे कार्य कुठे आणि हे दिग्विजय सिंघाचे गुरु शंकराचार्य कुठे. कुठे तुलनाच नाही. हे शंकराचार्य कायमचे वादात असतात फार आधीपासून.
    15 hours ago · Unlike · 1
  • Shashikant Sakhare अरे बाबा कोन देव आहे अन कोन नाही हे ठरवनारे हे कोन ????
    प्रकाश सरानी सांगितल्यासारखे लोक देवता कुनाला मानतात हे महत्वाचे आहे...
    कुनी ठरविल्यानि देव होत नाही..
    ...See More
    See Translation
    13 hours ago · Unlike · 1
  • Ajay Raut The abrahamic religions such as Islam,christianity and Judaism are monotheistic religions with the respective holy texts and a code of conduct.One must follow and abide by these tenets of the religion.
    But hinduism is very complex and different than th
    ...See More
    12 hours ago · Unlike · 1
  • DrSandip Chavan Aaplyach dharmamartandani dharmyachya navavar khel mandla aahe.
    Aadya shakarachryachya ya mahan gadila hya lokani lajvun takle aahe.2-2 peethache pad he swatha javal thevtat v dusryala nyay dayla nighalet.
    Sant dyaneswar asot ki sant chokamela kiva tukaram yana tras denari hich jamat aahe.
    10 hours ago · Unlike · 2
  • Ajay Raut The fundamentalist organisations are raising concern about a new phenomenon called Love Jihad.While doing so ,they portray Muslims as `they` and hindus as `us`.
    They talk as if hindus are homogeneous society and a hindu can always marry another hindu.
    ...See More

-----