Monday, August 31, 2009

इथे होतं भंगाराचं सोनं



जागोजागी भंगारात पडलेल्या सायकलींचं रिपेअरिंग करून त्या आदिवासी पाड्यांतल्या मुलांना देण्याचा नवा प्रयोग 'त्या' तिघांनी यशस्वी केलाय.

गाडी शिकण्याचं पहिलं पाऊल म्हणजे सायकल. काही वर्षं सायकल तांबडल्यानंतर तिची जागा 'टू व्हिलर' घेते. इथेच सायकलचा 'वनवास' सुरू होतो, तो कायमचाच. म्हणूनच प्रत्येक घरात,सोसायटीत अशी मान मोडून पडलेली एखादी सायकल असतेच. या उलट चित्र आदिवासी पाड्यांमधलं. नशिबी दारिद्य आल्यामुळे शिक्षणासाठी पाच-पाच किलोमीटरचं अंतर पायी तुडवत ही मुलं रोज शाळेत जातात.

त्यांचे हे कष्ट कमी करण्याची प्राथमिक गरज भागवण्यातही आपण कमी पडलेलो. इतका विरोधाभास. दोघांतली हीच गॅप ओळखून 'ते' तिघे एकत्र आले, आणि त्यांनी एक प्रयोग करायचं ठरवलं. भंगार सायकलींचं 'सोनं' करून त्या गरजू आदिवासी मुलांना वाटण्याचा प्रयोग.

विक्रमगड, वाडा यांसारख्या आदिवासी भागात लांबलांबच्या पाड्यांतून मुलं शिकण्यासाठी गावच्या शाळेत येतात. ६ ते १६ वयोगटातल्या या कोवळ्या मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी रोजची २ ते ७ किमीची पायपीट करावी लागते. एसटीची सोय आहे, पण रोजचं ६ रुपये भाडं परवडत नाही.

आदिवासी भागातील ही वस्तुस्थिती हेमंत छाबरा आणि त्यांची पत्नी संगीता यांनी पाहिली. या मुलांसाठी काहीतरी करायला हवं, असा विचार त्यांच्या डोक्यात घोळू लागला. सिमोना टेरन या आपल्या आणखी एका मैत्रिणीकडे त्यांनी हा विचार मांडला आणि या तिघांना एक नामी कल्पना सुचली.

मुंबईसारख्या शहरात जुन्या, मोडक्या सायकली भंगारात पडून असतात. या सायकलींची डागडुजी करून गावातल्या मुलांसाठी द्यायच्या, अशी ही कल्पना. त्यांनी आपल्या ओळखीपाळखीच्या मित्रांना फोन केले, ई-मेल धाडले आणि जवळपास ६८ मोडक्या सायकली गोळा केल्या. स्वत:च्या खर्चाने त्या रिपेअर केल्या आणि प्रजासत्ताक दिनी अलोणे गावातील श्री बिनोई घरडे विद्यालयातल्या गरजू ६८ आदिवासी मुलांना या सायकलींचं वाटप करण्यात आलं. खरं तर या शाळेतल्या १३७ मुलांना सायकलची गरज आहे, असं शाळेने कळवलं होतं. आता उरलेल्या सायकली गोळा करण्यासाठी 'दि बायसिकल प्रोजेक्ट' ही चळवळच या ग्रुपने सुरू केलीय.

एका सायकलीचं रिपेअरिंग करण्यासाठी साधारण ४०० रुपये खर्च येतो. 'सध्या आम्ही काही मित्रमंडळी आमच्याच खिशातून तो खर्च करतोय', असं हॉटेल व्यावसायिक असलेले हेमंत छाबरा सांगतात. लोकांना भंगारातल्या सायकलची किंमत नसते. पण, आदिवासी मुलांसाठी अशी सायकल म्हणजे मर्सिडीजच. सायकल मिळाल्यानंतर मुलांच्या चेह-यावर जे भाव उमटले त्याला तोड नाही, असंही छाबरा यांनी सांगितलं.

केवळ अलोणेच नव्हे, तर आदिवासी खेड्यांमधे किमान १ लाख सायकल्स वाटण्याचं या ग्रुपचं उद्दिष्ट आहे. हे मिशन पूर्ण करण्यासाठी आम्ही सध्या दि बायसिकल प्रोजेक्ट नावाची चळवळच सुरु केली असून, या नावाने आम्ही लवकरच एनजीओ रजिस्टर करणार आहोत, असं सिमोना टेरन यांनी स्पष्ट केलं.

तुम्हीही उचला खारीचा वाटा
भंगार सायकलींचं सोनं करण्याच्या या प्रोजेक्टमधे आपणही खारीचा वाटा उचलू शकतो. त्यासाठी हेमंत छाबरा यांना ९८२०१४९०२२ यावर फोन करायचा किंवा thebicycleproject@gmail.com या पत्त्यावर इ-मेल पाठवायचा. स्वयंसेवक तुमच्या घरी येऊन जुनी सायकल घेऊन जातील. या रिपेअरिंगचा खर्च देण्याची तुमची तयारी असेल तरीही तुमचं स्वागतच होईल.

Saturday, August 29, 2009

महाराष्ट्राचे काही प्रश्न आणि त्यांना सुचवलेली काही उत्तरे

महाराष्ट्राचे काही प्रश्न आणि त्यांना सुचवलेली काही उत्तरे, बघा तुम्हाला आवडतात का ते ?

कोरडवाहू शेतीचा प्रश्न: http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=2780:2009-08-25-13-01-39&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=3146:2009-08-26-15-28-55&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=3380:2009-08-27-13-32-30&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10


पाण्याचा प्रश्न: http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=1215:2009-08-18-15-48-41&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10

आपले विचार ही आम्हाला कळू द्यात!

Wednesday, August 26, 2009

महाराष्ट्रातील समस्याग्रस्त शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट - राष्ट्रपती प्रतिभा पाटील

लोकसत्ता - मुंबई, २६ ऑगस्ट/प्रतिनिधी
‘महाराष्ट्रातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे अत्यंत मार्मिक व विदारक सत्य गोष्ट छोटी डोंगराएवढी या चित्रपटातून तुम्ही मांडले आहे. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ही अत्यंत वाईट स्थिती शहरात बसलेल्या लोकांच्या लक्षात येत नाही. विजेच्या भारनियमनामुळे तर शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. या परिस्थितीतून मार्ग काढायला हवा’, असे उद्गार राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी चित्रपटाच्या कलाकारांसमवेत बोलताना काढले. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे यावेळी हजर होते. राष्ट्रपतींना चित्रपट दाखविण्याकरिता असलेल्या प्रतिक्षा यादीवर सुमारे शंभरेक चित्रपट असताना उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून राष्ट्रपतींनी हा चित्रपट पाहिला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपचा विरोध पत्करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसच्या ‘मराठी’ उमेदवार प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला. त्यानंतर वरचेवर पाटील यांनी ठाकरे कुटुंबाला ‘राष्ट्रपती भवना’चा पाहुणचार घेण्याची विनंती केली होती. तो योग काल जुळून आला. उद्धव व रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य व तेजस हे काल राष्ट्रपती भवनाचे पाहुणे होते. त्यांच्यासोबत खासगी सचिव मिलींद नार्वेकर होते. दुपारी साडेबारा वाजता राष्ट्रपती पाटील व त्यांचे पती देवीसिंग शेखावत यांनी ठाकरे कुटुंबाचे स्वागत केले. त्यानंतर भोजन झाल्यावर ठाकरे परिवाराने राष्ट्रपती भवनाची पाहणी केली. राष्ट्रपतींच्या कार्यालयातील रवींद्र जाधव यांनी राष्ट्रपती भवनाची सविस्तर माहिती ठाकरे परिवाराला दिली. राष्ट्रपती पाटील यांच्याकरिता ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या चित्रपटाचा खेळ सायंकाळी ठेवण्यात आला होता. हा चित्रपट पाहण्याची विनंती खुद्द उद्धव ठाकरे यांनी त्यांना केली होती. चित्रपट पाहिल्यावर राष्ट्रपती अत्यंत प्रभावित झाल्या होत्या. त्यांचा चेहरा चिंताजनक होता. शेतकऱ्याविषयीच्या आपल्या कळकळीच्या भावना त्यांनी व्यक्त केल्याचे चित्रपटातील कलाकारांनी सांगितले. यावेळी नागेश भोसले, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, सुरेश सुवर्णा, लक्ष्मीकांत खादिया, गिरीजा ओक, माधवी जुवेकर, अरविंद जगताप आणि मच्छिंद्र चाटे यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Tuesday, August 25, 2009

गोष्ट छोटी डोंगरा एवढी [http://mukhyamantri.blogspot.com/]

कालच "गोष्ट छोटी डोंगरा एवढी" हा मराठी चित्रपट पाहीला. तस आम्हाला मराठीचा आणि तिच्या संवर्धना साठी झटनार्यांचा फार अभिमान. पण नुसत्या पोकळ गप्पा न मारता कुणी काही करून दाखवलं तर आम्हाला अधिक आनंद होईल. आणि तोच हा मुव्ही पाहिल्यावर झाला. निळू फुले, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे , नागेश भोसले आणि अनेक पट्टीच्या कलाकारांनी केलेली हि एक अप्रतिम कलाकृती आहे.
त्यासोबतच आम्हाला जे भावले, ते म्हणजे विषय आणि त्याची तंतोतंत हाताळणी. अहो शेतकऱ्याच्या प्रश्नाला असा हात घातलाय जसा बरोबर अर्जुनाने पक्षाचा डोळा नेमावा [उदा: निळू फुलेंचा एक डायालोग: "अहो, मरण्याचे शेतकऱ्याला एक लाख देता, जगण्याचे पंधरा-वीस हजार तरी द्या"]. एकंदर चित्रपट एकदाच नव्हे तर अभ्यास म्हणून अनेकदा पाहण्यासारखा आहे. अभिनय करताना कलाकाराच्या तर डोळ्यात पाणी येतेच पण बघानाराच्या डोळ्यात सुद्धा पाणी आणल्याशिवाय कलाकार राहत नाहीत. मी सर्वाना कळकळीची विनंती करतो कि आपण फुटकळ मुव्ही बघतो, अहो कधी कधी तर भंकस पानाचा कयास करणारे मुव्ही सुद्धा बघतो, तेंव्हा या कृषिप्रधान देशातील नागरीकानो हा मुव्ही तर खूप चांगला आहे, नक्की पहा. शेतकऱ्याचे प्रश्न समजून घ्या, ते तुमच्याशी कशे निगडीत आहेत ते हि समजून घ्या. शेवटी तुम्हाला आम्हाला पोसणारा उपाशी राहिला आणि पटा पटा आत्महत्या करायला लागला तर.......? तुम्हीच विचार करा काय होईल! अहो, निराश होऊन तो शहरात येईल, कारखान्यात काम करेल, तिथे हि तो चटणी भाकरच खात होता आणि इथे हि तेच खाईल. त्याला काही फरक पडणार नाही, पण आपल्यासारख्यांचे काय ......? आपण उपाशी मरू! त्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय उरणार नाही.[घेताय ना आजच महागाची डाळ विकत; बघा एक दिवस दाना सुद्धा मिळणार नाही!]

मुंबईमध्ये मुव्हीचा चांगला व्यवसाय होतो, मग काही भंकस हिंदी मुव्ही सुधा पोटापाण्यापूरत कमावतात. अहो विनोदी मराठी मुव्ही असतील तर ते हि धक्के खात चालतात, पण चालतात. एकंदर काय तर टाइम पास होणार असेल तर आम्हाला काहीही चालेल."पण आता आमचेच प्रश्न कमी आहेत का की आम्ही ते शेतकऱ्यांचे प्रश्न बघायला जाउत", हा विचार ही काही बहादूर करणार असतील त्यांना आमचा सलाम! [जा XXXकात]. आम्ही काल मुव्ही ला गेलो तर तिथे सगळे मिळून लोक ४! मुंबईत बरेच मराठी लोक आहेत हे राज ठाकरेंच्या कर्तुत्वाने कळले; पण असा शेतकऱ्याच्या प्रश्नावर हा मुव्ही आला आणि सगळे कुठे गायब झाले कि अन् काय कि? मला एक घटना आठवते, गांधीजीकडे आफ्रिकेत काही भारतीय आले आणि ते म्हणत होते आमच्यावर अन्याय होतो आहे, आमच्याशी विषम व्यवहार होतोय कारण आम्ही भारतीय आहोत. आणि तिथेच हे जमलेले भारतीय आपल्या वर्णा नुसार वेग-वेगळे बसले होते. तेंव्हा गांधीजीने त्यांना ठणकावले होत कि आधी आपले भेदाभेत कमी करा! तसच मला वाटते आज जेंव्हा आपण मराठीचा, मराठी माणसाचा प्रश्न उभा करतो तेंव्हा मग आम्हाला फक्त मुंबई आणि इतर काही शहरातील मराठीच दिसतात! काय तर म्हणे आमच्याशी विषम व्यवहार होतोय. हाच विषम व्यवहार काही प्रमाणात याच काही शहरात असपृश्या मानल्या जाणार्या शेतकऱ्यांशी होतो, त्यांचे प्रश्न ऐकायालाच नाही, तर त्यांच्याकडे ढुंकून हि बघायला कुणी तयार नाही. हा आमचा राग असेल कदाचित, आम्ही चुकलो हि असू; पण जे दिसला त्यांन मन हेलावलं; नव्हे हलच!

एकून आमच्या मनाची स्थिती फार विक्षिप्त झालेली आहे. एक तर ते प्रश्न पाहून मन हळहळत आणि त्या प्रश्नांपायी असलेली आपली उदासीनता पाहून मग जखमी होते. अहो आम्ही छोट्यामोठ्या रोगावर [...तारे xyx पर ..... {मी ते बघू नका असा म्हणत नाही}, प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे आणि ते हि स्वाभिमानाने, पण मग हाडामासाच्या सुदृढ शेतकर्यालाच का नाही?], छोट्या छोट्या प्रश्नावर निघालेले मुव्ही किती छान आहेत, अभिनय कसा अप्रतिम केलं अस म्हणतो आम्ही, आणि कुणाच्या जीवन मरणाशी निगडीत गोष्टी " ह्या, ती भंकस कुणी झेलावी तीन तास!" असा म्हणून दुर्लक्षित करतो. धन्य आम्ही!

हा मुव्ही अगदी वेगळा आहे, शासन व्यवस्थेवर, त्याच्या चुकावर बरोबर बोट ठेवणारा आहे. माणूस म्हणून शेतकऱ्याच असतीत्व मान्य करा हे अगदी ठासून सांगणारा आहे. आमची गाडी जागतिकीकरणात अगदी वेगाने धावत आहे, पण धावण्यात मागे किती धूर निघतोय हे पहायचं कदाचित आमचे ड्रायव्हर विसरलेत अस वाटत. अहो कुत्र्या-मांजरांच्या प्रश्नावर ही आंदोलन करणारे आम्ही, त्यांच्या प्रश्नांना देशाचा प्रश्न करणारे आम्ही, माणसाचं माणूस म्हणून जगणं जो पर्यंत मान्यकरत नाहीत, समाजाच्या आणि सामाजिक रित्या अक्षम गटाच कल्याण आम्ही चिंतीत नाही, तोपर्यंत आम्हाला भारत महासत्ता बनण्याच्या फुटकळ गप्पा मारण्याची शरमच वाटावी!

ज्यांना हा धूर बघायचा असेल, शेतकरी आत्महत्या करतो म्हणजे नेमकं काय करतो? तो ती का करतो? आणि मग त्यानंतर त्याच्याशी आणि मागे राहिलेल्यांशी काय होत? याची माणूस म्हणून थोडी जरी जाणीव करून घ्यायची असेल तर "गोष्ट छोटी डोंगरा एवढी" नक्की बघावा!

[भावनेच्या भारत माझ्याकडून कुणी दुखावलं गेलं असेल तर, क्षमा करावी!]

या विषयावर इतर काही: http://www.pbs.org/wnet/wideangle/episodes/the-dying-fields/video-full-episode/1952/

प्रकाश पिंपळे-पाटील .

Creative Commons License
Blog by Amol Suroshe is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License.

Sunday, August 23, 2009

गोष्ट छोटी डोंगरा एवढी...............

नमस्कार मित्रानो ,

कालच हा चित्रपट पहिला .. खरच काळजाचा थरकाप उडवणारी हि कथा आहे .. शेतकर्याची कथा ..

कसा आमचा हा बळी राजा रोज मृत्युच्या दारात ढकलला जातोय ह्याचे खूप विदारक दृश्य ह्या चित्रपट मध्ये बघायला मिळते ..

त्यांचे प्रश्न कित्ती साधे आणि सोपे आहेत पण गेली साठ वर्षे आम्ही त्यांना काय देऊ शकलो ह्याचे दर्शन ह्या चित्रपट मध्ये होते ..

जग फार वेगाने धावत आहे .. पण आम्हीच ज्यांना मागे ठेवले आहे त्यांच्या मध्ये आणि आमच्या मध्ये जमीन आसमानीचा फरक आहे .. आम्हाला खाऊ घालणारच आज उपाशी आहे ..

एकीकडे महासत्ता होण्याची स्वप्ना पाहणाऱ्या आमच्या ह्या देशाचा राजा .. भिकेला लागायची वेळ आली आहे .. शाषण आणि प्रशासन मेलेल्या मुडद्या सारखे पडून आहेत ..

ह्याच चित्रपटातील शेवटचा एक वाक्य आहे जे तुमचे काळीज चिरून बरेच प्रश्न तुमच्या समोर उपस्थित करून जातो ...

"एका किलो गव्हा साठी जेंव्हा सारा देश गहन ठेवावा लागेल न तेव्हाच माझ्या पिंडाला कावळा शिवेल "

खरच एका शेतकऱ्याच्या मनातले बोल काळजाचा ठाव घेतल्या खेरीज राहत नाहीत ...

प्रत्येक माणसाने .. ज्याला माणुसकीची कदर आहे आशाने .. आणि आमच्या शेतकर्यांच्या मुलांनी हा चित्रपट जरुर बघावा ..

शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्यावर जेवढ्या सहजतेने बोलता... त्याच मोठे पनाने हा चित्रपट एकदा तरी पाहावा .. तेव्हाच तुम्हाला आपल्या या कृषिप्रधान देशातील बळीराजाचे काय हाल चालले आहेत हे लक्षात येईल ......

एक चित्रपट म्हणून देखील आतिशय उच कोटीचा सिनेमा मराठी रंगभूमी वर आणल्या बद्दल मी सर्व कलाकारांचे अभिनंदन करतो ...


जय महाराष्ट्र ......



Thursday, August 20, 2009

मोहीम - शिवतीर्थ किल्ले राजगड

या पावसाळ्यात काय काय करायचे हे अगदी आधीपासूनच मना मध्ये ठरलेलेल .. मग काय पहिला पाऊस होताच टाकला एक इ मेल, जिजाउ.काम च्या कार्यास जेंव्हा सुरुवात केली तेवाच मनी एक ठरले होते कि महाराजांच्या, मा साहेब जिजाउच्या आयुष्यात अनेक क्षणी साथीदार साक्षीदार असलेल्या त्या आमच्या अभेद्य गडकोट किल्ल्यांना भेट द्यायची ..

मग ठरले तर, मोहीम शिव तीर्थ किल्ले राजगड ..... शिवाजी महाराजांची पहिली राजधानी, याच किल्ल्या वरून महाराजांनी २४-२५ वर्षे स्वराज्याची कामे पहिली, अनेक महत्वाचे निर्णय, अनेक मोहिमांची सुरुवात तथा विजयी सांगता याच गडावर व्हायची.

राजगड - म्हणजे गडांचा राजा.. खरोखरच ह्या किल्ल्याचा इतिहास बघितला असता हा खरच सर्व किल्ल्यांचा राजाच आहे. पूर्वी ह्या किल्ल्याचा डोंगर मुरुंबदेवीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध होता. शिवरायांनी याच डोंगराचे महत्व ओळखून त्यावर आतिशय कठीण चढणीचा तथा दुर्गम आणि एक भक्कम असा किल्ला बांधला किल्ले राजगड.

मग कित्येक मेल नंतर सारा प्लान तयार झाला .. ठरले तर मग गाठायचे किल्ले राजगड.. सर करायचे महाराजांच्या या पहिल्या राजधानीला .. मग काय गाड्या काढल्या ... मी, श्याम, तानाजी, केदार, दत्ता , सुधाकर (झोड) , किशोर, अरविंद , सुनील, सन्नी (भूषण), मिसाळ काका (काका या साठी कि एकमेव लग्न झालेले), गणेश, आणि वैभव या १३ जणांची मोहीम निघाली पहाटे ठीक ६ वाजता .. ठिकाण कर्वे नगर, पुणे.

सर्वांच्या मुखावर एक
प्रचंड उत्साह दिसत होता.. कारण कित्येक दिवसांनी आम्ही सर्वांनी एकत्र येण्याचा हा प्रसंग, पण त्या हि पेक्षा हा उत्साह होता तो शिवरायांच्या त्या पवित्र भूमीस आपला स्पर्श होणार ह्या विचारांनी.

बरोबर ६ वाजता आम्ही कर्वे नगर सोडले .. मुंबई - बंगलोर या हाय वे (एन एच -४) ने सरळ निघालो . ७ गाड्या आणि १३ लोक ... सकाळच्या त्या फ्रेश वातावरण मध्ये मन आगदी आनंदाने भरून वाहत होते .. गाड्यांचा वेग जसा वाढायचा तसा आमचा उत्साह हि ... खरोखरच पुण्याला एक अलभ्य देणगी लाभली आहे ती म्हणजे सभोवतालच्या उंच उंच पर्वत रागांची .. सकाळचे धुके .. त्या मधून दिसणारी ती हिरवीगार डोंगर रांग.. एका वेगळ्याच विश्वात आम्हाला घेऊन जात होती .. पुढे येणारा कात्रज चा बोगदा .. सकाळच्या वेळीचे ते विहंगम दृश्य बघून सर्वाना एवढ्या पहाटे उठवल्याचे जे शल्य होते ते केव्हाचेच निघून गेले...

याच हाय वे चा आनंद घेत आम्ही जवळ पास २० किमी सरळ आल्यावर रस्त्यात भेटणाऱ्या वाट्सरुकंडुन चौकशी केली .. समोर नसरापूर फाटा लागताच आमच्या गाड्या उ
जवी कडे वळल्या .. समोर एक मोठा फल लागलेला होता .. राजगड २० किमी. सर्वाना खूप आनंद झाला कारण राजगड आपल्या एवढ्या जवळ असेल याची कल्पना कोणी केली नव्हती, याच वाटे वरून कित्येक वेळा आपण गेलेलो पण ह्या शिवरायांच्या अनमोल ठेव्यास कधी बघितलेच नाही असे चुकून वाटून जाते.

मग हाय वे सोडून वाट लागते ती एका सुंदर डांबरी रस्त्याची .. रस्ता तसा अरुंद पण चांगला .. दुतर्फा शेती ची कामे चालू होती .. पावसाने तर आम्हाला केव्हाच गाठले .. जणू तो आमचे शिवरायांच्या राजधानीत स्वागतच करण्या साठी आमची वाट बघत होता. हिरवी गार गर्द झाडी बघून मन अगदी फुलून जात होते .. रस्त्यावरून चालताना लहान लहान मुलांची शाळेला जाण्याची धडपड पाहून पुन्हा एकदा आमच्या शाळेचे दिवस आमच्या डोळ्या समोर आले.. जोराचा वारा.. आणि पाऊस या मुले आम्ही पूर्ण भिजलो .. कल्पना आली आता पुढील वाटचालीची .. म्हणून थोडा थांबा घ्यावा असे वाटले .. पण समोर फ़क़्त दिसत होते सह्याद्रीच्या त्या अभेद्य अशा पर्वत रांगा. पुढे मार्गासनी हे गाव लागते तेथून डावी कडे गेले असता गुंजवणे हे गाव आहे, इथूनच आम्ही आमच्या गड सर करण्याला प्रारंभ करणार होतो.. कुठे हि न थांबता गुंजवणे गाव गाठायचे ठरले .. पण एक छान रस्ता लागला .. दुतर्फा गर्द झाडीच झाडी .. समोर एक नदी तुडुंब भरून वाहत होती .. आपोआप आमचे पाय तेथे रोखले गेले .. हे निसर्गाचे सुंदर रूप खरच आम्हाला चुकवायचे नव्हते .. सर्वांच्या गाड्या थांबल्या. सर्व जन डोळे भरून बघत होते ते सुंदर असे दृश्य .. समोर उंच पर्वत रांगा .. आजू बाजूला फुलांची झाडी .. समोर नदी .. खरच कित्ती सुंदर आहे आपला निसर्ग, तेव्हा आपल्याला जाणीव होते कि आपण शहर मध्ये राहून पैसा तर कमावतो पण कित्ती गोष्टीना आपण मुकतो.

लगेच पुन्हा एकदा एक छोट फोटो सेशन झाला .. नेहमी प्रमाणे पाटील साहेबांचा पुढाकार होताच.

ते दृश्य आपल्या डोळ्या मध्ये सामावून मोहीम पुढे निघाली .. वळणा वळणाच्या रस्त्यातून ..
चारी बाजूनी झाडी झुडपांनी वेढलेले गुंजवणे गाव आले.

छोटासाच पण आगदी टुमदार असा हे गाव, गाड्या पार्क करून सर्व जन शोधात होते ते चहा चे हॉटेल .. एक छान से हॉटेल सापडतच सर्वांचा मोर्चा आत वळला .. हॉटेल छोटेच पण मधले वातावरण आगदी सुरेख :) .

लगेच घाई घाई म
ध्ये आम्ही पोहे आणि चहा चा आस्वाद घेतला आणि एका अवघड प्रवासाला सुरुवात केली .. या आधी पायथ्याशी असलेल्या शिव मंदिराचे दर्शन घेतले .. समोरचा भयानक डोंगर बघून खरच गरज भासली याची..

राजगडावर जाण्या साठी आमच्या माहिती मधले २ रास्ते आहेत , एक म्हणजे गुंजवणे गावातून जाणारा.. आणी एक म्हणजे मार्गासनी या गाव वरून सरळ समोर पाली या गाव कडून .. पाली च्या मार्गे रस्ता थोडा सुकर.. असा म्हणतात

पण गिर्यारोहकांसाठी तथता शिव प्रेमींनी गुंजवणे गावातूनच जावे असे मी त्यांना सुचवू इच्छितो.

आमची मोही
म निघाली ती गुंजवणे गावातून, सर्व मावळ्यांनी कंबर कसली .. कारण पुढे होती एक कठीण आणि खडतर चढा .. आमच्या सोबत आमचे मित्र सुनील केदार हे हि होते, एका पायाचा प्रोब्लेम असल्या मूळे त्यांची काळजी सर्वांनाच पडली .. पण जे हार खातील ते आमचे केदार साहेब कसले .. लगेच त्यांनी पायाची चप्पल काढली आणि पूर्ण गड अनवाणी पायांनी सर करण्याची इच्छा मनोमनी ठरवूनही टाकली. पाऊस चालूच होता .. सुरुवातीची वाट तशी सोपीच पण खूप घसरणीची म्हणून आगदी काळजी पूर्वक आम्ही निघालो .. एक मेकांना हात देत, साथ देत.

सुरुवातीला सोपी वाटणारी हि वाट पुढे अजून कठीण आणि खडतर होत जाते .. पण पावसाचा हि जोर वाढत होता .. तसाच आमचा जोश हि .. कारण होते जय भवानी - जय शिवाजी या घोशाचे ... समोर संपूर्ण धुके .. उंच आणि हिरवी गर्द डोंगर रांग त्या वर असलेले ढंगाचे थवेच्या थवे.. मधेच या ढगांतून एखादा उंच डोंगर जणू सूर्यालाच गवसणी घालत होता .. आम्ही उंच उंच जाऊ तसे हे सगळे दृश्य बघून आमच्या डोळ्यांची पारणे फिटले .. उंच उंच ढगांतून पडणारे पावसाचे पाणी आम्ही आमच्या याच डोळ्यांनी बघत होतो .. खाली असणारी शेती त्यात साचलेले पाणी .. खरोखरच हे सगळ दुर्मिळच

पुढे झाडा झा
डातून अवघड वाट काढीत काढीत आम्ही पुढे सरकत होतो .. खूप वेळ चालल्या नंतर ढगांनी थोडी वाट दाखवली .. आणि आम्हाला कळून चुकले कि आमचे उद्दिष्ट्य अजून खूप दूर आहे .. ढगांनी बाजूला सरकताच एक उंच डोंगर दिसला .. सर्व प्रथम बघून मना मध्ये एक धसकि भरली एवढा मोठा डोंगर सर करावयचा आहे अजून, पण असे हिम्मत हरतील ते आमचे मावळे कसले .. थोडी विश्रांती घेताच पुन्हा ती खडतर वाट पकडली.

बराच वेळ चालल्या नंतर समोर खूपच कठीण असा मार्ग दिसला, बघता क्षणी वाटले .. बाप रे हे आता कसा? पण लगेच आचे २ -४ मावळे पुढे सरसावले आणि सरा-सरा ती कठीण वाट चढून पुढे गेले.. मागे असलेल्यांना सूचना करत .. त्यांना हात देत आम्ही तो अवघड ट्रेक पार केला .. समोर दिसायला लागला तो चोर दरवाजा.. अरुंद आणि एका वेळेस एकाच मनुष्य जाऊ शकेल एवढा .. पण तो चोर दरवाजा गाठणे म्हणजे मोठा दिव्यच होता .. आता ते पण जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांमध्ये पार पडला .. आणि एक एक करून सारे जन चोर दरवाज्यातून आत आले.

अखेर सर्वांनी यशस्वी रित्या संपूर्ण ट्रेक पार पडली.. यात सर्वात विशेष म्हणजे आमचे केदार साहेब.. गेल्या गेल्या न कळतच सर्वांच्या तोंडून उद्गार आले ..केदार साहेबांचा विजय असो .. खरोखरच त्यांनी केलेले काम हे खूप धाडसी. आमच्या पाया मध्ये ट्रेक चे शु असून सुद्धा आमचे हे हाल झाले त्यांनी तर अनवाणी पायांनी हि खडतर वाट पार पाडली, मला खात्री आहे राजे स्वतः असले असते तर त्यांनी आमच्या केदार साहेबांचा योग्य तो सन्मान केला असता ... खरच कमाल आहे आमच्या केदार ची आणि त्याच्या शिव प्रेमाची.

चोर दरवाज्यातून आता येताच पद्मावती माची लागते .. वि
स्तीर्ण आणि पसरट असलेली हि माची आहे. चोर दरवाज्यातून अथवा पाली च्या मार्गे आले तरीही सर्व प्रथम आपण याच माचीवर येतो . या माचीवरून एकदा सभोवताली बघितले तर आपल्याला जाणीव होते आपण कित्ती वर चढून आलो आहोत याची . विस्तीर्ण अशा या माचीवर भरदाव वारे वाहत होते .. या वार्या सोबत आपण हि वेगाने सर्वत्र धावत सुटावे असे वाटत होते .. सार काही खूप छान वाटत होते, पद्मावती माची ला दगडांची बांधणी होती.. अशाच एका टोकाला मी धावत गेलो.. खाली असलेली हिरवळ आणि खोल खी बघण्या साठी.. एक खूप छान धबधबा दिसला .. गडावरचे सारे पाणी एका वाटेने खाली पडत होते .. खूप सुरेख देखावा होता तो.. लगेच सर्वांना आवाज दिला सर्व जन धावत आले.. खाली वाकून बघताना खरोखरच ते सुंदर धबधब्याचे सृष्या बघून सर्व जन असलेला थकवा एका क्षणात विसरून गेले ... ते धबधब्याचे पाणी जोराच्या वार्याने उलटे गडावर येत होते .. त्याचे थेंब आपल्या तोंडावर येताच सर्व लोकांचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला...

पद्मावती माची वर येताच दर्शन होते ते शिवाजी महाराजांच्या पत्नी तथा संभाजी राजांच्या मातोश्री सइ बाइ यांची समाधी.. त्या थोर शंभू राजस जन्म देणारी ती जननी .. तिच्या पायाशी आमचे शीर हजार वेळेस
झुकले .. पण या समाधीची असलेली अवस्था पाहून मन खूप खिन्न झाले .. स्वराज्याच्या दुसर्या छत्रपतीच्या आई ची समाधी आशा सामान्य अवस्थेत .. आज आमच्या इथे कर्म कांडाच्या नावाखाली लाखो रुपये मंदिरे उभारण्यात जातो आणि आमच्या स्वराज्यास आपल्या पोटचा गोळा अर्पण करणाऱ्या त्या थोर मातेची समाधी अशा अवस्थेत बघवत नव्हती, जशा जिजाउ तशाच महाराणी सइ बाइ ।

तिथून दर्शन घेऊन समोर असलेल्या पद्मावती देवीच्या मंदिराकडे आम्ही कूच केली .. बाहेरून दर्शन घेतेले. पण रात्रीच्या मुक्कामी येणाऱ्यासाठी राहण्याची म्हणून खूप चांगली व्यवस्था इथे होऊ शकते।

पद्मावती मचिवाराच एक छान सा तलाव आहे ॥ त्याचे नव पद्मावती तलाव असे आहे। पवासमुले हा तलाव सुद्धा भरून वाहत होता.

पुढे नजरेस पडते ती महाराजांचा राजवाडा.. सध्या पडझड झाल्यामुळे सध्या त्याचे फ़क़्त अवशेष दिसून येतात, तरीही त्याच्या भव्यतेची कल्पना मनाला स्पर्श करून जातेच. ह्याच राजवाड्यात राजाराम महाराजांचा जन्म झाला, शहाजी राजांच्या मृत्यू नंतर मा साहेब जिजाऊ यांना त्यांच्या निर्णयापासून शिवबांनी परावृत्त केले ते इथेच, आशा अनेक ऐतिहासिक क्षणाचा साखीदार राहिलेला हा राजवाडा.

पुढे राजवाड्यातून बाहेर पडताच समोर येते ती महाराजांची सदर, "राजसदर" . याच सदरेवारती स्वराज्याचे महत्वाचे निर्णय घेतले जात, कित्येक महत्वपूर्ण निवाडे याच सदरेवर बसून महाराज करीत असत. खरोखरच ती सदर बघून असे वाटले आपले पण गाऱ्हाणे महाराजांच्या समोर मांडावे. महाराज नक्कीच मला योग्य दिशा दाखवतील ..
पुढे सदरेच्या बाहेर एक निशानाची जागा आहे .. इथेच स्वराज्याचे भगवे निशाण आगदी डोलाने फडकत असेल ... आणि इथूनच दिल्लीच्याही पातशहा ला आव्हान देत असेल .. आज काल इथे स्वातंत्र्य दिनी
आणि प्रजासत्ताक दिनी तिरंगा तसाच मानाने फडकत आसतो.

सदरेवर बराच वेळ शिव काळाचा अनुभव घेतल्यावर समोर दिसत होता तो बालेकिल्ला, आता पर्यंत खूप ऐकून होतो कि अतिशय कठीण चढणीचा हा बालेकिल्ला आहे .. आमच्यातले केदार .. दत्ता यांनी लगेच पुढे न येण्याचा सांगितले.. सोबत आमचे सन्नी म्हणजेच भूषण यांनी पण आराम करण्याचे ठरवले.. सुनील हसबे पण दत्ता ला सोबत म्हणून थांबले ...

बाकीचे मावळे काही केल्या थांबणार नव्हते... उत्साह काही केल्या कमी होत नव्हता. पुढे वाटचाल सुरु झाली ती बालेकिल्ल्याची .. खूपच अवघड अशी हि वाटचाल होती.. काळजी पूर्वक आम्ही एक एक अवघड चढाई पार करत होतो .. मध्ये येणारे सुंदर दृश्य कॅमेरा मध्ये टिपण्याचा प्रयत्न हि करत होतो. धुक्यामुळे वाट अजून कठीण वाटत होती, अरुंद वाट .. धुवाधार पाऊस .. आणि जोराचा वारा .. पण कशाचीही तमा न बाळगता आम्ही पुढे चालत होतो .. निसर्ग जेवढा सुन्दर आहेत तेवढाच तो भयावह हि आहे याची कल्पना आम्हाला इथे आली. कित्येक अडचणींना मात करत आम्ही गाठला बालेकिल्ल्याचा दरवाजा .. या दरवाजा जवळची वाट खूप कठीण आहे.. थोडा जपूनच हि शेवटची वाट पार पदवी लागते.

एक ब ला मोठा बालेकिल्ल्याचा दरवाजा.. आमचे स्वागत करत होता.. याच बालेकिल्ल्याच्या दरवाजा जवळ अफजल खानाचे मुंडके दफन करण्याचा आदेश आउ साहेबांनी दिला होता ... याच दिवशी मराठ्यांचे सत्व जागे झाले होते.. त्यांच्या स्वाभिमानाची जान त्यांना झाली होती.. त्या अभेद्य अशा दरवाजा जवळ जाताच आमचे उर फुलून आले .. तोंडात एकाच घोषणा होती जय भवानी- जय शिवाजी .. एकाच नारा .. मा साहेब जिजाउ कि जय .. हाता मध्ये भगवा .. आणि उरामध्ये प्रचंड स्वाभिमान ...

बालेकिल्ल्याच्या आत येताच एका वेगळ्या विश्वात गेल्याची जाणीव होते .. सर्व सुख दुख पासून दूर.. आगदी वेगळ्या विश्वात .. इथून जग कित्ती छोटे दिसते .. सर्वत्र धुक्याचा साम्राज्य होता .. अन्यथा याच बालेकिल्ल्यावरून सिंहगड, रायगड, तोरणा असे अनेक गड दृष्टीस पडतात .. खरच महाराज याच बालेकिल्ल्यावरून सबंध स्वराज्यावर कशी देखरेख ठेवत असतील याची कल्पना येते .. बालेकिल्ल्यावर उभे राहिल्यास असे वाटते जणू गरुड भरारी घेण्या साठी हे आसमंत आपल्याला बोलावत आहे .. एका उत्तुंग शिखरावरती आम्ही पोचलो होतो याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

बालेकिल्ला हा पद्मावती माची पासून १.५ किमी वर. जवळ पास ४०-४५ मिनिटांचा वेळ लागतो.. पण कोणी हि चुकवू नये आशीच हि ट्रेक. वर बालेकिल्ल्यावर सुद्धा असलेली व्यवस्था पाहून खरोखरच नवल वाटते .. राजवाड्याचे अवशेष आज हि इथे आहेत , सन १९४९ पर्यंत हा राजवाडा चांगल्या अवस्थेत होता . त्याचे खांब उभे होते .. नंतर वादाळा मध्ये त्याला खूप नुकसान झाले. पण तरीही याची भव्यता लपून राहत नाही. पुढे दारू गोळ्याचे कोठार .. एवढ्या वर रक चंद्र कृती आकाराचा छोटासा तलाव .. त्याचे पाणी पिण्या योग्य.

अगदी वेगळ्या अश्या त्या विश्वातून आम्हाला कोणालाच जावे वाटत नव्हते. बालेकिल्ल्यावर येऊन आमची मोहीम सार्थकी लागल्या सारखे वाटत होते .. वेळेची कमी आणि खाली आमची वाट बघत असणारे आमचे साठी या मूळे आम्ही लवकरच बाले किल्ला सोडण्याचे ठरवले.

हा बालेकिल्ला चढायला जेवढा अवघड तेवढीच काळजी तो उतरताना घ्यावी लागते अन्यथा केव्हा तुम्ही खाली याल हे कळणार पण नाही .. तीच काळजी घेत घेत आम्ही बालेकिल्ला उतरायला सुरुवात केली.

खाली येताच पोटात कावळे ओरडत होते .. लगेच आमच्या प्रशांत मिसाळ काकांनी आणलेल्या दशम्या सोडल्या .. सोबत आगदी मस्त असा ठेसा .. आह्ह खरच काय मज्जा आली ते जेवताना.. मस्त पैकी खाऊन पिऊन झाल्यावर खाली उतरण्याचे ठरले ...

वेळेच्या अभावी आम्ही संजीवनी माची आणि सुवेळा माची ह्या दोन महत्वाच्या माच्या नाही करू शकलो .. खर तर ह्या पण गडाच्या दोन महत्वाच्या जागा .. पण धुक्यामुळे आणि पावसामुळे आम्हाला खूप वेळ लागत होता म्हणून आम्ही गड सोडण्याचे ठरवले .. खर तर इथून जावच वाटत नव्हते पण सगळे सोबत होते .. पण नक्कीच आम्ही परत ह्या दोन जागांना भेट देणार हे ठरवून आम्ही निघालो आमच्या परतीच्या वाटेवर.

पावसाचा जोर थोडा कमी झाला होता .. निसर्ग रम्य ठिकाणाचे फोटो घेत घेत आम्ही वाट उतरत होतो. जी वाट चढताना काही वाटले नव्हते तीच वाट आता उतरताना मात्र खूप मज्जा येत होती .. कारण पावसामुळे सगळी वाट हि निसरडी झाली होती .. एकमेकांना पकडत.. कसे तरी वाट उतरत होतो .. त्यात आमच्या केदार साहेबांनी काय काय सोसले असेल देवच जाने .. पण कधी पाऊस कधी वारा याचा सामना करत आम्ही गड उतरत होतो मध्ये एक चहा चा हॉटेल लागले लगेच सर्व जन आत घुसले ... मस्त पैकी चहा आणि बिस्किट्स वर ताव मारला. अजून थोडा थोडा म्हणत किमान आर्धा तास आशीच कठीण वाट आम्ही उतरत होतो .. पायाची वाट लागलेली होती .. पण मना मध्ये एक समाधान होता.. आम्ही आज शिवरायांच्या त्या पहिल्या राजधानीची माती आमच्या या माथ्यास लावून आलो ...

आतिशय अविसाम्रीनीय आशी हि आमची मोहीम आम्ही पार पडून परत गुंजवणे गावामध्ये आलो.

मित्रहो आपण शिवरायांना कधी बघितले नाही पण त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा साथीदार .. व साक्षीदार असलेला हा किल्ले राजगड आज याची देही याची डोळा बघितल्याचा आनंद सर्वांच्या मुखावर दिसून येत होता ..

"असा ट्रेक होणे नाही " बस या एका वाक्यातच या प्रवासाचे पूर्ण वर्णन करता येईल .. एका दिवसा मध्ये जगलेले हे क्षण नक्कीच पुढील आयुष्य साठी एक स्वाभिमानाची भावना आमच्या मनामध्ये पेटवून जाईल याची मला खात्री आहे.

सर्वांनी जाताना एकाच प्रश्न विचारला .. पुढची मोहीम कुठे ? नक्कीच शिवरायांच्या नावाने पेटवलेला हा निचायाचा महामेरू अखंडपणे आम्हाला आमच्या स्वत्वाची जाणीव करून देईल .. आम्हाला आमच्या गौरवशाली इतिहासाची जान करून देईल.. हि अखंड ज्योत आमच्या मना मना मध्ये सतत प्रज्वलित राहील ..

पुन्हा लवकरच भेटूया पुढील मोहिमे साठी ... तो पर्यंत जय महाराष्ट्र .. जय भवानी .. जय शिवराय
काही खास क्षण