Monday, June 28, 2010

झिंग चिक झिंग आणि हापूस : नक्की बघावे असे

दोन्ही चित्रपट अगदी खूप छान आहेत. दोन्ही वेग वेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल बोलतात. एक खूप हसवतो तर दुसरा हसवता-रडवतो-हसवता.
जास्त बोलणे नव्हे, अप्रतिम कलाकृती पहायच्या असतील तर नक्की जाऊन या!  



http://www.youtube.com/watch?v=7_PERcVlVvY&feature=related

Tuesday, June 22, 2010

ग्रामीण भागासाठी आता संगणक केवळ २५०० रुपयात !

आता इझिटेक सोलुशंस देणार सर्वात स्वस्त दारात कॉम्पुटर
यु एस एफ ओ स्कीम अंतर्गत नोव्हाटीयम व बी एस एन ल यांचा प्रयास

जळगाव : जळगाव येथे नुकतेच सुरु झालेले इझिटेक सोलुशंस चे संचालक श्री विलास नेवे यांनी सांगितले नोव्हाटीयम सोलुशंस लिमिटेड चेन्नई या कंपनीने यु एस एफ ओ स्कीम व बी एस एन ल यांचा बरोबर मिळून जनतेला सर्वात स्वस्त दारात कॉम्पुटर (नोवा नेट पी सी ) मिळून देण्याचा प्रयास केलेला आहे त्याची किमंत फक्त २५०० रुपये व ट्याक्स (ग्रामीण भाग ) आहे कारण याला यु एस एफ ओ कडून अनुदान मिळत आहे .
इझिटेक सोलुशंस चे संचालक श्री विलास नेवे हे यावल तालुक्याचे राहावासी असून सध्या जळगाव येथे स्थाइक झाले आहे त्यांनी कॉम्पुटर (नोवा नेट पी सी ) ची माहिती देताना सांगितले कि ज्या वेळेस कॉलेज ला शिकत होतो त्या वेळेस मला कॉम्पुटर घ्यावयाचा होता परंतु त्याची किमंत फार असल्या मुळे मी तो घेऊ शकलो नाही हे मागील दिवस मला आठवले ज्या वेळेस नोव्हाटीयम सोलुशंस लिमिटेड चेन्नई या कंपनी भेट देऊन तेथील कॉम्पुटर (नोवा नेट पी सी ) ची माहिती घेतली तेव्हा मला फार आनंद झाला कि इतक्या स्वस्त दारात कॉम्पुटर मिळेल तर कोणताही विध्यार्थ्याची कॉम्पुटर घेण्याची इच्छा अपूर्ण राहणार नाही.
आजचे युग हे कॉम्पुटर युग आहे प्रत्येक क्षेत्रात आज कॉम्पुटर चा वापर होतो त्या मुळे प्रत्येकाला कॉम्पुटर येणे अवश्हक झाले आहे आपल्या देशात असे भरपूर विध्यार्थी आहेत कि जे कॉम्पुटर हा विषय शिकत आहे पण त्यांच्या जवळ स्वतःचे कॉम्पुटर नाही
कॉम्पुटर (नोवा नेट पी सी ) हा इंटेल कंपनी चा पी ४ कॉम्पुटर आहे या बरोबर बी एस एन ल ब्रोडबेण्ड (इंतारनेठ ) कनेक्शन सुद्धा देण्यात येणार आहे. २५०० रुपयात आपणास मिळेल सी पी यु , यु एस बी कीबोर्ड , माऊस, मोनितर, व बी एस एन ल ब्रोडबेण्ड (इंतारनेठ ) कनेक्शन . या कॉम्पुटर (नोवा नेट पी सी ) याची वैशिष्ट्य म्हणजे हा कॉम्पुटर सर्व सामान्य कॉम्पुटर सारखा आहे परंतु त्याची कार्य प्रणाली मध्ये क्राउड तेक्नोलोजी वापरण्यात आलेली आहे या मधील स्वप्त्वेअर हे एक केंद्रीय नेटवर्क सर्वर च्या माध्यमाने चालविले जातात या सर्वर वरून आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम एम एस ऑफिस , गेम , नेट ब्राउझर हि सोफ्टवेअर प्राप्त होतात हा एक व्हैरस व देघाभाल विरहित कॉम्पुटर आहे कारण यात अजून बर्याच प्रकारची विशेषताये आहेत.
ह्या कॉम्पुटर (नोवा नेट पी सी ) अधिक माहिती साठी आपण सर्व बी एस एन ल ऑफिस मध्ये व इझिटेक सोलुशंस दु। न. २६६, ग्राउंड फ्लोर , नवीन बी जे मार्केट ,जळगाव येथे संपर्क साधू शकतात किवां टे.न.०२५७ २२३५५५० मो. न. ९९२११९९७७७ वर फोन करू शकता.

- कार्यकर्ते जिजाऊ.कॉम

Monday, June 21, 2010

महाराष्ट्र पोलीस ई-मेल पत्ते

 

 







सौजन्य: महाराष्ट्र पोलीस वेब साईट [http://mahapolice.gov.in/mahapolice/jsp/temp/home.jsp]
सदर माहितीचा चांगल्या कामासाठी उपयोग व्हावा ही अपेक्षा.

Saturday, June 19, 2010

डॉकुमेंट्रीला चला, डॉकुमेंट्रीला चला : निर्माण - डीस्कव्हरिंग लाईफ!

निर्माण - डीस्कव्हरिंग लाईफ (आयुष्याच्या शोधात) ही जयप्रसाद देसाई यांची निर्माण बद्दलची डॉकुमेंट्री रामनारायण रुईया कॉलेज, माटुंगा येथे
सायंकाळी ६.०० ते  ८.०० या वेळात २१ जून, सोमवार रोजी प्रदर्शित होणार आहे. महराष्ट्राच्या ग्रामीण आणि अविकसित भागात बदलाचे वारे कसे वाहत आहे, हे बघायचे असेल तर नक्की डॉकुमेंट्रीला चला!
प्रवेश मोफत आणि सर्वांना!
डॉकुमेंट्रीचे आमंत्रण पत्र आणि डॉकुमेंट्री बद्दल अधिक येथे बघा
निर्माण बद्दल अधिक:http://nirman.mkcl.org/

Wednesday, June 16, 2010

अंधार होत चाललाय दिवा पाहीजे,या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे ॥

                                                                                       जिजाऊ.कॉम
राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब पुण्यतिथी
[१७ जून ]

महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यानं स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात ते स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच बीज ज्या आईने पेरलं, ती आई म्हणजे जिजाऊसाहेब. त्यांना फक्त शिवबांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणाव लागेल, म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते. काही शतकांनंतर सुद्धा छत्रपतींचे विचार किती सद्य परिस्थितीला साजेशे वाटतात. सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मुल्यांचा आदर करणारे विचार, जे छत्रपतींच्या आचरणात होते, आपण म्हणू शकतो या आईनेच त्यांना दिले; त्यासाठीचे वातावरण आणि संस्कार जिजाऊ साहेबांनी शिवरायांना दिले. हा सह्याद्रीचा राजा, सहयाद्री सारखाच कणखर आणि अंगाई सारखा दयाळू व मायाळू या आईच्या पदराखालीच झाला. पुढे छत्रपतींच बाळ, बाळराजे, धर्मवीर संभाजी महाराज ही याच कुशीत आणि संस्कारात वाढले.
याच आऊसाहेबांची साथ शहाजी राजांना होती, ज्यांनी स्वराज्याच स्वप्न जिजाऊ साहेबांसोबत पाहिलं; जिजाऊनी ते छत्रपतींकडून साकार करून घेतलं.[या वाक्यानं छत्रपती परप्रकाशित होत नाहीत; आणि तो उदेष्य ही नाही. कोणत्याही बाळाच्या यशात त्याच्या आईच्या संस्काराचा सिंहाचा वाटा असतो आणि राजे स्वयंप्रकाशित सूर्य होते, ज्याला सदैव तितक्याच तेजाच्या आईचे मार्गदर्शन लाभले]
महाराजांचा राज्याभिषेक झाला (६ जून) आणि त्यानंतर काही दिवसातच आऊसाहेबांचे पाचाड येथे निधन झाले . एक स्वाभिमानाची जननी काळाआड गेली, पण स्वाभिमानाच साम्राज्य बघूनच! राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांची आज (१७ जून) पुण्यतिथी आणि या निमित्य पुन्हा स्वतःला आठवण करून देऊयात की त्याच जिजाऊच्या विचारांचा अंश आमच्यात आहे आणि आम्ही आयुष्यभर स्वाभिमानी आणि स्वातंत्र्याच्या विचारांचे पाईक राहू.
स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी, एका सुर्याइतक्या तेजस्वी आणि सहयाद्री सारख्या कणखर आणि खंबीर असलेल्या युगपुरुषाची माता, धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजी राजांची आजी आणि आऊ असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना जिजाऊ.कॉम चा मनाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम.
जय जिजाऊ!                      जय शिवराय!                  जय महाराष्ट्र!
कार्यकर्ते
जिजाऊ.कॉम www.jijau.com 
हेच येथे डावून्लोड करा आणि आपल्या मित्रांना पाठवा. 

Tuesday, June 15, 2010

प्रखर आणि हसवणाऱ्या वात्रटिका

सुर्यकांत डोळसे यांच्या वात्रटीकांचा तिसरा अंक. राष्ट्रच्या सध्यस्थितीवर, नवरा-बायाकोंवर आणि विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या वात्रटीका.
नक्की वाचा आणि इतरांना ही वाचायाल लावा, नक्की आवडतील.
येथे डावून्लोड करा. 

[http://sites.google.com/site/pimpalepatil/suryakanti.....15june2010.pdf.pdf?attredirects=0&d=1]

Monday, June 14, 2010

मुलांचे करिअर आणि पालक

कालचा उर्वरित लेख येथे  देत आहे 

नुकताच १२ वी चा निकाल लागला आणि पालक व विध्यार्थी यांची एकाच धावपळ चालू झाली. आणि लवकरच १० चा हि निकाल लागेल. पण आत्ता पुढे काय ? हा तर सर्वात मोठा प्रश्न. बऱ्याच विध्यार्थी आणि पालकांचे पुढे काय करायचे याचे नियोजन असते. सर्वांत गोची होती ती त्या विध्यार्त्यांची ज्यांना साधारण गुण मिळाले असतात. त्यांना नेमके काय करावे तेच माहित नसते. शक्यतो हि मुले आर्टस मध्येच admission घेतात. नाहीतर कोणी जवळचा शहाण्या व शिकलेल्या व्यक्तींना विचारून आपला निर्णय घेतात. बरेचजण अमुक अमुक गोष्टीला खूप वाव आहे, घुप पैसा आहे म्हणूनच जास्त तर पालक त्यांच्या मुलांना त्या त्या field मध्ये टाकतात.

पण खरच त्या मुलाला ज्या field मध्ये admission घेत आहोत ती आवडते का नाही हे विचारले जात नाही. तसे आजकालचे पालक शिकलेले आहेत व काही पालक आपल्या मुलाच्या आवडीचाही विचार घेतात. पण मला त्या पालाकांबद्धल बोलायचे आहे जे शिकून नं शिकल्या सारखे आहेत. कारण बऱ्याच वेळा असे आढळते कि अश्या पालकांना वरवरचे बरेच माहित असते पण पूर्ण माहित नसते. मग ते याचे थोडे ऐकून, त्याचे थोडे ऐकून आपला निर्णय घेतात.

महत्वाचा मुद्दा असा कि ज्याला शिक्षण घ्यायचे आहे त्याचा जास्त विचार घेतला जात नाही. आणि बऱ्याचवेळा विद्यार्थ्याला सुद्धा काय करावे ते नाहीत नसते. काय करावे काय करु नये हा ज्याचा त्याचा प्रश्न, पण जो निर्णय घ्यायचा आहे तो पूर्ण विचार करूनच घ्यावा आणि त्यानंतर पाठीमागेच नव्हे तर इकडे तिकडे पण पाहू नये. याचा अर्थ असा नव्हे कि दुसऱ्या गोष्टींचे ज्ञान नसावे. पण बऱ्याच गोष्टी एकदाच माहित झाल्या कि सर्वच छान वाटतात, पण सर्वच करणे शक्य नसते. नाहीतर बऱ्याचवेळा असे होते कि आगोदर एक छान वाटते म्हणून त्यामध्ये उडी मारतात काही दिवसांनी दुसरे बरे वाटते मग वाटते ते करावे. जे काही करायचे आहे ते आगोदर ठरवा आणि टाका उडी त्यामध्ये. कारण एक गोष्ट खरी कि माणसाला ज्या गोष्टी मध्ये आवड असते त्या मध्ये तो जरूर यशस्वी होतो. कधी लवकर होईल नाहीतर कधी वेळ लागेल पण यश हे नक्की आहे.

१० वी , १२ वी नंतर पालकांनी मुलासोबत मित्रासारखे राहावे असे सर्वच लोक सांगत असतात. पण असे सहसा होत नाही. कारण शेवटी आम्ही पालक, आम्ही मोठे, आम्ही म्हणेल तेच खरे असा मुद्दा कुठेतरी येतोच. कारण ते मूळ स्वभावातच नसते. आणि कधी कधी प्रयत्न करून सुद्धा असे होत नाही. पण तेच पालक दुसऱ्याच्या म्हणजेच आपल्या मित्राच्या मुलांना छान सल्ला देऊ शकतात पण आपल्या नाही. कारण मित्राच्या किंवा दुसऱ्याच्या मुलाला सांगताना तो हक्क दाखवता येत नाही आणि याच गोष्टीमुळे ते त्याला छान समजून सांगू शकतात. मग अश्या वेळी हाच मार्ग पर्याय म्हणून का होईना वापरता येऊ शकतो. जर तुम्हाला समजून सांगता येत नसेल तर तुमच्या मित्रांना सांगा. किंव्हा अश्या व्यक्तीला सांगा कि ज्याला त्या क्षेत्रातली माहिती आहे. अश्यावेळी विचारांची देवाण घेवाण छान पद्धतीने होते.

दुसरा आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बरेच पालक असा विचार करतात कि काहीतरी शिक्षण घेऊन थोडेसे पैसे वगैरे देऊन मुलाला नौकरी लाऊन देऊ म्हणजे आपली जबाबदारी संपली. हा पैसे देऊन नौकरी हा मुद्दाच मुळात नं पटणारा आहे. आणि तुम्ही अश्याप्रकारे जेंव्हा मुलांसमोर बोलता तेंव्हा त्याची चांगले शिक्षण घ्यायची आवड कमी होऊ शकते. कारण असी एक मानसिकताच बनते कि काही झाले तर पैसे देऊन नौकरी लागेल. यापेक्षा तुम्ही त्याला आगोदर समजाऊन सांगा कि तुला शिक्षणाला पाहिजे ते मी देतो पण नौकरी तू तुझ्या स्वत:च्या कर्तत्वावरच करावी लागेल.

शेवटी जे विध्यार्थी नापास झाले आहेत त्यांच्याबद्धल. जे नापास झाले आहेत त्यांची तर तर गोष्टच वेगळी. आत्ता त्यांचे काय होणार. एकदा नापास झाले म्हणजे त्याचे आयुष्य, त्याचे currier संपले असा एक निकष होतो. पण असे काहीही नाही, कारण अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे असे म्हणतात. ते विध्यार्थी नापास झाले आहेत ते काटावरती पास झालेल्या विध्यार्थ्यांपेक्ष्या चांगले असे मला तरी वाटते. कारण जे नापास झाले आहेत त्यांना नव्याने काहीतरी करायची इच्छा होऊ शकते. अपयश माणसाला बरेच आकी शिकून जाते. मलातरी वाटते जीवनात प्रतेकाला एकदातरी अपयश यायला पाहिजे. पण या अपयशाची त्या विद्यार्थ्याला जान व्हायला हवी. सोबतच त्याला घरातल्या व आजूबाजूच्या लोकांच्या प्रोत्साहनाची आवशकता असते.

सांगायचा मुद्धा म्हणजे तुम्ही एखाध्याला कितीही समजून सांगा, मारून सांगा किंव्हा काही लालच देऊन सांगा. त्याचे आयुष्य तेंव्हाच भरारी घेणार जेंव्हा त्याला या सर्व गोष्टींची जान होईल. म्हणून एखाद्याला समजाऊन सांगायचे असेल तर त्याला समजाऊन सांगण्यापेक्ष्या त्याला ठराविक गोष्टीची जान करून देण्यान मदत करा.
  

सौजन्य: प्रसाद पवार, उस्मानाबाद 

Sunday, June 13, 2010

मुलांच्या दहावी आणि बारावी नंतर, पालकांच्या जबाबदारी

नुकताच १२ वी चा निकाल लागला आणि पालक व विध्यार्थी यांची एकाच धावपळ चालू झाली. आणि लवकरच १० चा हि निकाल लागेल. पण आत्ता पुढे काय ? हा तर सर्वात मोठा प्रश्न. बऱ्याच विध्यार्थी आणि पालकांचे पुढे काय करायचे याचे नियोजन असते. सर्वांत गोची होती ती त्या विध्यार्त्यांची ज्यांना साधारण गुण मिळाले असतात. त्यांना नेमके काय करावे तेच माहित नसते. शक्यतो हि मुले आर्टस मध्येच admission घेतात. नाहीतर कोणी जवळचा शहाण्या व शिकलेल्या व्यक्तींना विचारून आपला निर्णय घेतात. बरेचजण अमुक अमुक गोष्टीला खूप वाव आहे, घुप पैसा आहे म्हणूनच जास्त तर पालक त्यांच्या मुलांना त्या त्या field मध्ये टाकतात.

पण खरच त्या मुलाला ज्या field मध्ये admission घेत आहोत ती आवडते का नाही हे विचारले जात नाही. तसे आजकालचे पालक शिकलेले आहेत व काही पालक आपल्या मुलाच्या आवडीचाही विचार घेतात. पण मला त्या पालाकांबद्धल बोलायचे आहे जे शिकून नं शिकल्या सारखे आहेत. कारण बऱ्याच वेळा असे आढळते कि अश्या पालकांना वरवरचे बरेच माहित असते पण पूर्ण माहित नसते. मग ते याचे थोडे ऐकून, त्याचे थोडे ऐकून आपला निर्णय घेतात.

पूर्ण येथे वाचा.

सौजन्य: प्रसाद पवार, उस्मानाबाद 



Tuesday, June 8, 2010

सुर्यकांत डोळसे यांच्या वात्रटीकांचा नजराणा

एका शब्दात वर्णन करायचे झाले तर आगदी झकास. पाऊस आणि त्याच्या बद्दल वाचवा असा अंक.


येथे डावून्लोड करा.
[http://sites.google.com/site/pimpalepatil/suryakanti..new......8june2010.pdf?attredirects=0&d=1]

लय भारी!

Sunday, June 6, 2010

शिवराज्याभिषेक दिना निमित्य हार्दिक शुभेच्छा

सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वाभिमानाची साक्षात मूर्ती असलेले शिवाजी राजे आजच्या दिवशी छत्रपती झाले. तमाम पोरक्या झालेल्या मराठी जनतेला राजा मिळाला. वडिलोपार्जित छत्राखाली नव्हे तर स्वतः मावळ्यांच्या मदतीने उभारलेल्या छत्राखाली शिवाजी राजे बसले आणि स्वयंघोषित नव्हे तर लोक घोषित छत्रपती बनले.
या दिनी सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा. जे शिवराज्य-सुराज्य स्थापन करण्यासाठी राजे छत्रपती झाले, ते राज्य पुन्हा स्थापन आणि सक्षम करण्यासाठी जमेल तिथे जमेल त्या प्रकारे प्रयत्न करूयात हा संकल्प.
जय जिजाऊ !             जय शिवराय!                                            जय महाराष्ट्र!

कार्यकर्ते जिजाऊ.कॉम   
www.jijau.com