Wednesday, November 26, 2014

ज्यांची इच्छा वेद शिकण्याची आहे त्यांनी मदरशासारख्या विशेष वेद शाळा काढाव्यात

संघ बेरकी आहे. हे राष्ट्र सेकुलर आहे. यात शंका नाही. आणि कुणी घेऊही नये. संविधानाच्या पहिल्या पानावर तसे लिहिलेय. उलटे जे सेकुलर नाहीत त्यांनी सेकुलर व्हावे! 
जातीय द्वेषातून संघाकडे बघितले जात नाही. संघाच्या इतर जातीबद्दलच्या द्वेषामुळे/दुर्लक्षामुळे/अतेरिकी विचारांमुळे संघाचा द्वेष होतो. तो योग्यच आहे. संस्कृत एक चांगली भाषा आहे. ती एक भारतीय भाषा आहे. हिंदू धर्मातील सगळे जुने ( 'जुनाट'ही म्हणता येईल. ग्रंथ याच भाषेत लिहिलेत). पण सगळ्या भारतीय भाषांचा उगम संस्कृत मधून झाला हा इतर भाषांचा अपमान असेल आणि शास्त्रीय दृष्ट्या ते चूकही असेल. उर्दू/संस्कृत दोन्हीही इथे मेनस्ट्रीम मध्ये लोप पावलेल्या भाषा आहेत. त्या दोन्हीचा बावू करू नये. संस्कृत अनेक वर्षांपासून वैकल्पिक विषय आहेच. असायलाच हवी. राहील ही. वेद वगैरे काही समाज उपयोगी असतेच तर त्यांच्या अस्तित्वा पासून आता पर्यंत काही तरी मोठे घडलेच असते! ज्यांची ज्यांची इच्छा वेद शिकण्याची आहे त्यांनी मदरशासारख्या विशेष वेद शाळा काढाव्यात. मेनस्ट्रीम मध्ये वेदांची लुडबुड नको. याच निमित्याने मदरशात शिकानारांसाठी धार्मिक शिक्षण घ्याचे असेल तर घ्या. पण मेन स्ट्रीममध्ये प्रगती पाहिजे असेल तर पोरांना मेन स्ट्रीमच्याच शाळेत घाला! बाकी नरेंद्र मोदी संख्येने जास्त म्हणजे बहुजन समाजातील आहेत तरीही ते पंतप्रधान झालेत याचे कारण लोकशाही! नसता शक्य नव्हते. आज संविधान दिवस त्याच्या तुम्हाला शुभेच्छा!

No comments:

Post a Comment