Thursday, June 8, 2017

शेती प्रश्न संक्षेपात


Friday, June 2, 2017

देशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत

At the core of lots of problems in India is it's poor taxation. Enough people are not paying their dues taxes. Even the farm incomes should also be taxed (but along with that the agriculture should be subsidised to a lot of extent and regulated to some extent, which is necessary as many agri produces are part of food).
When on one side people can 'afford' to buy multiple SUVs and enjoy multiple foreign holidays and on other side people can't even afford a basic life, there must be some problem with the taxation of the nation. It's uneven, complex or whatever. That must be corrected.
देशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत. ज्यांनी जितका टॅक्स भरावा तो भरला जात नाहीये. म्हणून शासन याला पैसे नाहीत आणि त्याला पैसे नाहीत अशी दर वेळी ओरड करते. इतकंच काय तर देशातील शेतकऱ्यांनाही आयकर लावावा. कारण बहुतांश शेतकरी सगळ्या कुटुंबाच मिळून १-२ लाख ही कमवत नाहीत. म्हणून आयकर न भरू शकणारा वर्ग असाही बाहेर राहील. पण शेतीच्या नावाखाली काळाबाजार धंदे, दुकाने, हॉस्पिटल, वकिली फर्म, कंपन्या आणि राजकारण चालवणारे ते करू शकणार नाहीत. त्या सोबतच शेतीत लागणारी सामग्री सबसिडीने स्वस्त करावी आणि हमीभाव आणि खरेदी हमी द्यावी. या उपर देशाच्या प्रगतीला फार काही लागणार नाही!
जेंव्हा एखाद्या देशात एकीकडे लोक एकापेक्षा जास्त चार चाकी खरेदी करू शकतात, अगदी महागड्या हॉटेलात आणि विदेशात सुट्ट्या घालू शकतात आणि दुसरीकडे असंख्यांना साधं जगणं महाग वाटावं, तेंव्हा नक्कीच त्या देशाच्या कर प्रणालीत/ टॅक्स सिस्टीम मध्ये काही तरी गडबड आहे असं समजावं.
कॉल इट कम्युनिजम, सोशालिजम किंवा इतर काही. पण हेच प्र्याक्टिकल आहे.













Image Courtesy : TOI






Thursday, June 1, 2017

शेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं?

शेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं?
शेतकऱ्यांचा चालू असलेला संप कुणाच्याही विरोधासाठी नाही. ना सरकारच्या विरोधात आणि नाही इतर शहरी अकृषक वर्गाच्या विरोधात. हा संप आहे आपल्याच न्याय हक्कासाठी. देवेन्द्र फडणवीस किंवा कुणीही एक सरकार टार्गेट नाही. कुणी त्याचा संबंध लावत असेल तर संपाच्या आडून राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय त्या लोकांकडून असं समजावं. काही प्रमाणात ते टाळता येणार नाही. पण अशा लोकांना दूर ठेवावं. एक तर संप घडून आलाय ही खूप चांगली गोष्ट. एक लक्षात ठेवा आपली परिस्थिती अचानक अशात बिघडलेली नाही. गेल्या १०-२० वर्षांपासून हे सगळं सुरु आहे. म्हणून हा संप अन्यायी आणि अकार्यक्षम अशी व्यवस्था सुधारावी म्हणून आहे. पुन्हा लक्षात ठेवा. हा संप सरकार किंवा लोकं बदलण्यासाठी नाही. संप आहे व्यवस्था बदलण्यासाठी.
हमीभाव हा आपला पहिला नारा हवा. एक तर कृषी उत्पन्न जीवन आवश्यक गोष्टीत मोडते म्हणून त्याला एकदमच मोकळं सोडता येत नाही. म्हंणून मग कमीत कमी हमीभाव तरी हवा. आणि तो ठरवण्यासाठी अनेक गोष्टींचा विचार व्हावा. तुरीचा ३ हजार हमी भाव म्हणजे निव्वळ चालूगिरी होती. कारण तीच तूर काही प्रोसेसिंग नंतर जर लाखोंच्या घरात विकली जात असेल तर कमीत कमी ३० हजाराच्या घरात हमी भाव असायला हवा होता. कारण शास्त्रीय नियमानुसार अन्नधान्याचा मार्केट भाव हा शेतकऱ्याच्या भावपेक्षा ३ पट असतो. म्हणजे १/३ भाग हा शेतकऱ्याला मिळायला हवा. आणि पावसाच्या प्रमाणानुसार, उत्पादनानुसार भाव कमी जास्त व्हायला हवा.
अजून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपल्याला फुकटे फुकटे म्हणणारे हे अकलेचे कांदे आहेत. त्यांना दुर्लक्षित करायला हवं. त्यांच्याशी हुज्जत घालून वेळ आणि शक्ती वाया घालू नये.
संपात एक करावं. जमेल तितका माल गावातच विकावा. एक मेकांना विकावा. खूप जास्त काळ संप चालणार असेल तर खते आणि इतर महाग वस्तूंची खरेदी करू नये.
डॉक्टर लोकांनी सहकार्य करावं. भाजी पाल्याच्या बदल्यात उपचार करावेत. ज्यांच्याकडे कुणी बाहेरून विकत घ्यायला आलच तर माल चढ्या भावाने विकावा. तो मार्केटचा नियम आहे. तसच वागावं.
शेवटी हार मानू नये. अनेक वर्षांनंतर हे घडून येतंय. कुण्याही राजकीय नेत्याचं ऐकू नये. विशेषकरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस -राष्ट्रवादी च्या नेत्यांचे.
जे शहरात माल विकायला नेण्याचा विचार करत आहेत त्यांनी आजचे झालेले नुकसान पहिलेच असेल. म्हणून कृपा करून सहकार्य करावे. गोर गरीब कुठे उपाशी असतील मग ते कुठचे ही असोत त्यांनी सरळ गावाकडचा रस्ता धरावा. त्यांना कुण्याही शेतकऱ्याने नाही म्हणून नये.
चला व्यवस्था बदलू!