Thursday, December 13, 2012

यशवंतराव चव्हाण विचार मंच



फेसबुक वर यशवंतरावांच्या जन्म शताब्दी वर्ष निमित्य सुरु झालेल्या या उपक्रमाला आपली साथ लाभावी. त्यातून आणि या सह्याद्रीच्या मातीने बनलेल्या महापुरुषाच्या विचारातून तुम्हाला ही नक्कीच खूप काही सकारात्मक भेटेल. 

त्या पानावरील काही नोन्दी :

यशवंतराव चव्हाण हे केवळ राजकारणी नव्हते तर ते खरे समाजकारणी होते. राज्याचा व देशाचा डोलारा सांभाळताना धावपळीच्या काळातही त्यांनी साहित्यातील व्यासंग कायम ठेवला. म्हणूनच यशवंतराव देशाच्या राजकारणात पट्टीचे व्याख्याते बनले. अखेरपर्यंत त्यांनी साहित्यसेवा केली. त्यांच्या साहित्य प्रेमाचे अनुकरण आजच्या विद्यार्थ्यांनी करावे. यशवंतराव चव्हाण हे आजच्या पिढीसाठी व सत्ताधाऱ्यासाठी समाजसेवेचा खरा आदर्श आहेत. त्यांचे विचार देशाला तारणारे व प्रेरक होते. संरक्षणमंत्रीपदाची धुरा त्यांनी सांभाळली म्हणून देश मोठ्ठ्या अडचणीतून सहीसलामत बाहेर आला. महाराष्ट्राची नवनिर्मिती करणारा स्वच्छ चारित्र्याचा हा नेता राज्य व देश विकासासाठी आजही प्रेरणादायी ठरत आहे....”
-
मा.श्री. विनायकराव अभ्यंकर, निवृत्त नौसेना अधिकारी
-- 
"यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असतानाच्या काळात समाज परिवर्तन घडविणारे अनेक चांगले निर्णय घेतले. आपण राज्य करायला सत्तेत कुणासाठी बसलोय याचे भान त्यांना होते. यशवंतराव चव्हाण हे समाजाच्या दु:खाचे भान असलेले नेते होते. त्यांच्या आई, विठाई या न शिकलेल्या. घरात आर्थिक चणचण, कोणताही आधार नाही, अशा परिस्थितीत यशवंतराव मोठे झाले. त्यांच्या आईने त्यांना काबाडकष्ट करून शिकविले. याचे भान ठेऊन यशवंतरावांनी पुढे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला निर्णय घेतला तो गरीब मुलांसाठी. या मुलांना शिक्षण घेताना कुठल्याही अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांनी 900 रुपये आर्थिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांना शिक्षण शुल्कात सवलती देण्याचा निर्णय घेतला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात यशवंतराव चव्हाण यांच्यावर विरोधकांनी खूप टीका केली. यात तीव्रता होती, मात्र कटूता कुठेही नव्हती. संरक्षणमंत्री झाल्यावर त्यांच्या अभिनंदनाचा व निरोपाचा ठराव विरोधी पक्षाने मांडला होता. यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. हीच याश्वान्त्रावांची खरी कमाई होती..."
-
मा. श्री. मधुकर भावे, ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार
--
"यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे असामान्य सुसंस्कृत व्यक्तिमत्व होते. म्हणूनच त्यांच्या नावाचे प्रभुत्व मराठी मनांवर आजही आहे. या नावाला अन्य विशेषणांची गरज नाही. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग, निर्णय त्यांची संवेदनशीलता, सुसंस्कृतता यांचा प्रभाव नव्या पिढीवर पडणे गरजेचे आहे. शिक्षणाला साधन मानणाऱ्या यशवंतरावांनी गरीब घरातील मुलांसाठी आर्थिक निकष लावून मोफत शिक्षणाची सोय करताना आपले मुख्यमंत्रीपद पणाला लावले होते...."-मा. डॉ. एस. के. कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, पुणे.
--
युरोप अमेरिकेत शेतकऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे त्यांचे औद्योगिक धोरण भारतात आणणे चुकीचे आहे. कृषीकडे दुर्लक्ष केल्याने देशात हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. सहकार व कृषी औद्योगिक विकास आणि ग्रामीण विकासाची यशवंतराव चव्हाण यांची मांडणी आज हवी तशी स्वीकारली जात नाही. सद्द्यस्थितीत महाराष्ट्राला त्याचीच आवश्यकता आहे...”
-
मा. श्री. भाई वैद्य, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत 
--
यशवंतरावांनंतर राज्याचे विघटन सुरु झाले. यशवंतरावांनी महाराष्ट्राला जातीविरहित शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्यानंतर अनेक सहकारी संस्था डबघाईला आल्या. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा, यासाठी यशवंतरावांनी प्रयत्न केले. मात्र आजही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकले नाहीत. यशवंतरावानंतर महाराष्ट्र पोरका झाला. त्यांच्यासारखे समर्थ नेतृत्व आज देशात व महाराष्ट्रात राहिले नाही...”
-
मा. श्री. श्रीनिवास पाटील, माजी खासदार, कराड 
-- 
यशवंतरावांनंतर त्यांच्या विचारला गवसणी घालून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे एकही नेतृत्व आज राहिले नाही. महाराष्ट्र कृषी, शिक्षण, आरोग्य क्षेत्रांत मागे राहिला आहे. यशवंतरावानंतर जातिवादावर अस्मिता जपणारे संघटन वाढू लागले आहे...”
-
मा.श्री. किशोर बेडकिहाळ, ज्येष्ठ विचारवंत

अधिक जाणण्यासाठी आणि उपक्रमात सहभागी होण्यासाठी कृपया येथे भेट द्या : https://www.facebook.com/pages/Yashwant-Vichar-Manch/280568318692687

Wednesday, December 12, 2012

वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - प्रकाशराव

आमचे लाडके मुख्यमंत्री.. म्हणजेच मुख्यमंत्री.कॉम  चे आणि  जिजाऊ.कॉम चे  संस्थापक, परम मित्र श्री. प्रकाश पिंपळे (उक्कलगावकर) यांना त्यांच्या वाढ दिवसानिमित्य हार्दिक शुभेच्छा !
आई भवानी त्यांच्या आयुष्याला सुखा - समृद्धीने भरभरून आशीर्वाद देवो हीच तिच्या चरणी प्रार्थना ! जगदंब .

जय जिजाऊ -जय शिवराय .

अमोल सुरोशे आणि समस्त मित्र परिवार
जिजाऊ.कॉम  / मुख्यमंत्री.कॉम

Tuesday, December 11, 2012

१२-१२-१२ : लोकनेते - शरद पवार आणि गोपीनाथराव मुंडे


आजच्या आगळ्या वेगळ्या आणि शतकातून एकदाच येणाऱ्या या दिनी महाराष्ट्रातील राजकारणामधील दोन रत्नांचा आज वाढदिवस. हे दोन्ही नेते खर्या अर्थाने लोकनेते आहेत. आयत्या पिठावर रेघोट्या मारून नेतृत्व झालेल्यांची संख्या आज भारतीय राजकारणात कमी नाही. अशा सगळ्या परीस्थित शरद पवार आणि गोपीनाथ मुंढे यांसारखी राजकारणी म्हणजे खाणीतील हिरेच. दोघांनाही मुख्यमंत्री.कॉम  कडून जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पांडुरंगाचरणी दोघांना ही दीर्घ आयुष्य लाभो ही प्रार्थना.

पवार साहेब आणि गोपीनाथराव हे दोन्हीही नेतृत्व फक्त खादी घालून मिरवणारे राजकारणी नाहीत. तळा गळतील सामन्यांचे दुख समजून त्यावर शक्य ते राजकीय उपाय करणे यात या दोघांनचा हाथ खंडा.

शरद पवारांच्या दूरदृष्टीने राज्याला आणि राष्ट्राला सुखाचा मार्ग दिसेल यात शंकाच नाही. दोघांना ही जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 

Wednesday, December 5, 2012

खऱ्या स्वातंत्र्याची ओळख करून देणारा महामानव.



भारतीय संविधानाचे निर्माते, बहुजन नायक भारतरत्न डॉ . बाबासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्य त्यांना विनम्र अभिवादन !
त्यांचे उपकार केवळ दलित समाजावर नसून सबंध जगाला अचंबित करणारी सामाजिक क्रांती या महामानवाने प्रत्यक्षात घडवून दाखवली आणि हजारो वर्षे जाती - पातीच्या चिखलात रुतलेले भारतीय समाजाचे चाक खऱ्या अर्थाने फिरायला लागले.
सबंध जगामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि एवढ्या प्रतिकूल परीस्थ्तीमध्ये सामाजिक क्रांती होण्याची हि अद्वितीय अशीच घटना !

या महापुरुषाला केवळ एका जातीमध्ये अडकवून ठेवण्यचा कोतेपणा / संकुचितपणा गेली अनेक वर्षे अव्याहतपणे चालूच आहे, आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्य जाती धर्माच्याही पलीकडे जाऊन या महामानवाच्या विचारांना खरच मनापासून अबिवादन करूया!


जय भीम. जय महाराष्ट्र.

- अमोल सुरोशे (नांदापूरकर)

---

बाबासाहेबांना त्यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन. आज असलेली सुबत्ता आणि समानता या भूमीवर तुमच्या शिवाय येणेच अशक्य होती. राष्ट्राला धर्माच्या पुढे नेवून आम्हाला मानवतेची शिकवण दिलीत आणि हात धरून त्या रस्त्यावर आणून सोडले. त्याची परतफेड फक्त आणि फक्त तुम्ही सुरु केलेला प्रवास संपवूनच केली जाऊ शकते.

जय भीम. जय महाराष्ट्र.

- प्रकाश बा. पिंपळे (उक्कलगावकर)

Sunday, November 18, 2012

एका वादळास अखेरचा सलाम ... !!!!


गेल्या ४५ वर्षांचा धगधगता झंजावात, एक राजकीय वादळ ज्यांनी महाराष्ट्रातील राजकारण आणि सत्ताकारणाची उलथापालथ  करून टाकली. वर्षानुवर्षे सरंजामशाही वृत्तीने निवडून येणाऱ्या पुढार्यांच्या ऐवजी अति सामान्य आणि ज्वलंत तरुणाला या राजकारणात आणि सत्ताकारणात महत्वाचे स्थान दिले. जाती-धर्माच्याही पलीकडे जाऊन या महामानवाने दगडालाही शेंदूर फासून देव बनविले, असंख्य शिव सैनिक, नेते, मंत्री आणि मुख्यमंत्री घडवतांना स्वतः कुठल्याही पदाला - स्थानाला स्पर्श केला नाही जणू हे सर्व त्यांच्या पायाशी लोळण घालत होते.

राजकारणात राहून देखील सत्तेसाठी कधी हि तडजोड नाही किंवा एकदा टाकलेला शब्द पुन्हा माघारी नाही, एवढ्या सरळ आणि स्पष्ट वृत्तीचा बेधडक माणूस म्हणजे बाळ केशव ठाकरे. आपले बाळासाहेब ...

मरगळलेल्या समाजात अस्मितेची फुंकर घालून त्यांना ताठ मानेने जगायला शिकवणारे, प्रस्थापित - सरंजामशाही राजकीय व्यवस्थेला चांगल फोडून आणि झोडून काढणारे बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय - सामाजिक जीवनातील सदा लख - लखता  ध्रुव तारा.

वयाच्या ८६ व्या वर्षी हे वादळ शिवातीर्था वर काल शांत झाले. याच शिवतीर्थावर साहेब घडले, त्यांनी शिवसेना घडवली अनेक ऐतिहासिक सभा - आंदोलने याच मैदाने पहिली आणि शेवटी याच मैदानावर शिवसेनेचा हा ढाण्या वाघ एका चीर निद्रेत गेला.

लाखो - लाखो लोकांनी या महाराष्ट्राच्या महानेत्यास शाश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या घरातलाच एक व्यक्ती गेल्याचे दुखः सर्वांना झाले आणि संपूर्ण महाराष्ट्राने स्तब्ध राहून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली.

लाखो लोकांचे जीवन घडवणाऱ्या, शिवरायांच्या स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी आम्हाला दाखवले अशा या महान - महान नेत्यास कोटी कोटी नमन .. आणि मनपूर्वक श्रद्धांजली.

बाळासाहेब .. अमर रहे  !

- अमोल सुरोशे आणि प्रकाश पिंपळे

Wednesday, October 31, 2012

Shivaji Underground in Bhim Nagar Mohalla : An ode to the real Shivaji Maharaj - DNA


"This play is a landmark in the history of Marathi theatre. The tightly-written play is attracting a new audience and rejuvenating the decaying Marathi theatre industry. It has also provoked people to think, discuss and debate and not to simply accept anything blindly." - DNA


--
The barren region of Marathwada, particularly Beed and Nanded districts, may be on the national radar for all the wrong reasons (26/11 co-conspirator Abu Jundal hails from Beed) but 13 farmers are trying to change that.
These farmers have turned theatre artists and are creating ripples with their revolutionary play — Shivaji Underground in Bhimnagar Mohalla. The play attempts to change popular history by highlighting lesser known but crucial historical facts about Chhatrapati Shivaji Maharaj.
Here’s how the play goes. Indra, the king of the Gods, and ruler of heaven orders Yamraj, the God of death, to bring Shivaji to heaven along with his reforming ‘thoughts and ideas’. Shivaji deceives Yamraj saying he forgot to bring along his ideas and returns to earth to complete his unfinished work.
Yamraj returns to earth too in search of Shivaji. He suspects Shivaji and his revolutionary thoughts are hiding at Shiv Shahir Milind Kamble’s (Kailas Waghmare) home at Bhimnagar Mohalla. Kamble is the one who challenges the traditional Shahir Dharma (Sambhaji Tangde) and presents the authentic history of Shivaji through ballads.
The play says the history of Shivaji that is dominant now is biased and fashioned by a section of society for its own benefit. Instead of bridging the gap between Hindus and Muslims, dalits and other castes, this ‘manufactured’ history poisons the mind of people. It emphasises that in reality, Shivaji was a secular king. In fact, 35% of his army were Muslim and most of his prominent fort protectors were also from the minority community. Even the names of Shivaji’s father, Shahaji, and that of his uncle, Sharifji, were Muslim.
Over the centuries, these facts were replaced by a sensational and fictional history that have diminished Shivaji’s universal appeal.
It also satirises the present corrupt and myopic political system. It notes how political outfits misuse Shivaji’s name to polarise society into rigid Hindu and Muslim sections in order to build vote banks that help them stay in power.
It even lampoons present folk storytellers Shahir (Baba Purandhare and Shahir Deshmukh) over their sensational style of narrating the history of King Shivaji. They feel, it is this style that is responsible for spreading hatred.
The jugalbandi is one of the play’s most entertaining parts. It takes place between Shahir Dharma, the fiction teller, versus Shahir Kamble, the fact teller. Initially, spectators are drawn to the dramatized and masala version of Shivaji’s history. But Shahir Kamble in the end wins over the audience by presenting the lesser known side of Shivaji.
Though sometimes, the play’s tone can sound anti-Brahmin, it doesn’t detract from the fact that this play is a landmark in the history of Marathi theatre. The tightly-written play is attracting a new audience and rejuvenating the decaying Marathi theatre industry. It has also provoked people to think, discuss and debate and not to simply accept anything blindly.

Monday, October 1, 2012

बंदे मे था दम !



राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्य सबंध विश्वात वंदनीय असणाऱ्या या महान व्यक्तिमत्वास अभिवादन.

जय जवान - जय किसान चा नारा देणारे दिवंगत पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांचे हि आज स्मरण आणि कोटी कोटी अभिवादन.

स्वच्छ राजकारणा साठी दोन फार मोठे आदर्श!

गांधी आणि लालबहादूर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!



Sunday, September 16, 2012

निजामाच्या तावडीतून सुटून आम्ही, म्हणजे आम्ही सध्याचे आठ जिल्हे


निजामाच्या तावडीतून सुटून आम्ही, म्हणजे आम्ही सध्याचे आठ जिल्हे औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि हिंगोली भारत नावाच्या देशात ज्याचा की आपल्या सगळ्यांनाच अतिशय अभिमान आहे, मराठवाडा म्हणून सामील झालो. एक प्रकारे मुक्त झालो. निझाम गेले पळून. पटेलांना मानावे लागेल. पण निझाम जातांना निझामशाही मात्र तशीच सोडून गेले. पण त्यात पटेलांचा काही दोष नाही.

निझामशाहीचे संस्कार आमचे इतके घट्ट की अगदी अलीकडे पर्यंत आमच्याकडे राजकारणी सरंजामशाही वगैरे काही गेलेली नाही अशा अविर्भावात राहायचे. धर्मसत्ता आमच्याकडे मागपर्यंत इतकी सशक्त होती की भल्या भल्या दलितांना आम्ही छोट्या मोठ्या मंदिरात ही प्रवेश नाकारलाय. नामांतराला विरोध आम्ही जितका केला तितका कदाचित दुसरीकडे होणे अशक्य होते. पुण्यात झाला असता पण नुसताच शाब्दिक; आमच्याकडे धर्म आणि जातीवर जीव ओवाळून टाकण्याची फार महान परंपरा आहे. स्त्रीचा आदर कसा नाही करायचा हे आम्हाला विचारा. आणि ते करण्याची पाळीच येऊ नये म्हणून काय करायचे ते ही आमच्या इतके कुणालाच माहित नाही. कमीत कमी लेखी तरी. पण आमचा असा संशय आहे की हरयाणा आणि पंजाब मध्ये आम्हाला या क्षेत्रात मागे टाकण्याची ताकत आहे. ही फार मोठी खंत.

आमच्याकडे पाणी वगैरे हा देवानेच बघायचा कारभार असल्याने आम्ही 'दादां' ना देव मानून अनेक गोष्टी त्यांच्यावर सोडल्यात. बाकी कधी कधी पाऊस पडतो; पण तो कदाचित इथे होवून गेलेल्या संतांच्या वशिल्याने पडत असावा असे वाटते. इथे अनेक संत होवून गेले. नावे आठवत  नाहीत. कदाचित एकनाथ, नामदेव, हम्म, हम्म, ज्ञानेश्वर, तुकाराम आणि आम्हाला असे दाट वाटते की संत कबीर सुद्धा. पण असे ही कुणाच्या काहीच लक्षात नसल्याने उगाच सांगून ही जास्त अर्थ नाही. पण इकडे संत जन्माला जरी आले असले तरी अनेकांनी हा भाग सोडून जाण्याचाच निर्णय घेतला. अनेकांच्या प्रबोधनालाही अशी माती दाखवाणारा आमचा हा भाग. इथून ज्ञानेश्वर शिकून निघून गेले, रामदास स्वामी निघून गेले आणि साई बाबाही. इतकेच काय तर शिवाजी महाराजही मूळचे इथचेच. तर असा हा आमचा संतांना आणि महान लोकांना जन्माला घालणारा प्रदेश. कदाचित पृथ्वी अस्तित्वात असल्यापासून येथे आहे आणि तरीही अजूनही आहे तेथेच आहे. वेरूळ-अजंठा वगैरे सोडले तर जग प्रसिद्ध म्हणवे असे मानव निर्मित आमच्याकडे काही नाही; किल्लारीचा भूकंप नैसर्गिक होता! आणि असेल तर कमीत कमी आतल्या नवीन पिढीला आणि बाहेरच्या कुणालाही माहित तरी नाही. असो.

अनेक बाहेरच्या लोकांना, म्हणजे महाराष्ट्र बाहेरच्या लोकांना आणि अनेक कोकणातल्या लोकांनाही शरद पवार मराठवाड्यातले वाटतत. ही एक क्षणिक आनंदाची गोष्ट. पण ते खरच नाहीत ही अतिशय दुर्दैवाची बाब. मग बाकी आमच्याकडे नावे सांगण्या सारखे कुणी नाही. गोपीनाथ मुंडेना बाहेर लोक ओळखतात, पण नागपूर इतके मोठे आहे की परळी दिसतच नाही, अगदी त्यांच्या धरमपेठेतही मावेल इतकिच. बाकी धर्माच्या बाबतीत परळीत रुद्र आहेत, म्हणजे जोतिर्लिंग हो. पण रुद्राच्या इतके जवळ असूनही परळीला नागपूरचा जास्त राग येत नाही किंवा पर्यायाने करता येत नाही. शेवटी रुद्र ही विष्णूंच्या मानाने... असू द्या. पण मुंडे साहेब आहेत हा तितकाच मराठवाड्याला, देश्मुखांनंतर, काडीचा आधार (काडीचा = काडीचा; बुडत्याला = मराठवाड्याला,  so मराठवाड्या = बुडत्या, finally बुडता = मराठवाडा!). कारण मराठवाड्यात नेतृत्व असले तरी त्याला फक्त लोकांचा आधार आहे, त्याचा लोकांना नाही! म्हणजे इथे निर्विवाद सत्ता आहे अनेकांची अगदी वडिलोपार्जित. पण  पाणी प्रश्न? दादा ठरवतील. उद्योग? अबब, आपल्याला काय करायचे ते पुण्या-मुंबईचे फ्याड! असे आहे सगळे. पण अगदीच चटणी भाकरी वर समाधान मानणारा सामान्य वर्ग इथे असल्याने अतिशय संत वृत्तीचे लोक इथे पाहायला मिळतात आणि म्हणूनच “ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान” असे इथले राजकारणीही लोकांना सतत आठवण करून देतात. असो.

पण आम्ही आठही जिल्हे आम्हाला मुक्त करण्यासाठी लढलेल्या समस्त मराठवाडा/हैद्राबाद मुक्ती संग्रामातील प्रत्येकाला वंदन करून, विनंती करतो की “हे महान पुरुष हो आणि स्त्रियांनो, इथल्या खचलेल्यांना बळ द्या आणि असंख्य राजा बळींना जन्म देणाऱ्या आयांना कळ द्या”.

मराठवाडा/हैदराबाद मुक्ती संग्रामातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांना स्मरून आणि इथल्या शांतचित्त जनतेच्या शांततेवर आश्चर्य व्यक्त करून सर्व मराठवाड्याच्या जनतेला आणि या मुक्तीने आनंदित झालेल्या इतर प्रत्येकाला मराठवाडा मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!            
                                                                                                      - आम्ही आठही जिल्हे.
                     

Saturday, September 15, 2012

मतदान आणि मतदार!


Tuesday, September 11, 2012

आरक्षणावरील एक चर्चा


  • रक्षणाच्या विरोधात बोलतांना अनेकांचा फार मोठा गैरसमज झालेला असतो. किंवा तो त्यांनी करून घेतलेला असतो. किंवा मग यात काय इतका विचार करायचा म्हणून गौण मानलेला असतो आणि म्हणून मग दुर्लक्षित. आरक्षण ही व्यवस्था भारता सारख्या विभिन्नातेने नटलेल्या (खरा पहिला  एका आर्थी 'भेदा-भेदाने' व्यापलेल्या ) देशाला अतिशय महत्वाची. आरक्षणाच्या विरोधात ओरड करणारे जास्तीत जास्त लोक त्याला व्यक्तिगत घेतात; माझा मित्र माझ्या पेक्षा डल्ल वगैरे होता आणि त्याला मेडिसिन मिळाले मी आयुर्वेदात घासतोय (औषधी ;) ) ! अशा आशयाची असतात. 
    पण या देशाची मालमत्ता आणि साधन संपत्ती प्रत्येकाची सारखीच आहे. आता प्रत्येकाला ती बरोबर विभागून देता येत नाही. म्हणजे हे घे तुझे २ गुंठे, हा घ्या तुमचा खाणीचा तुकडा, हे इतके लिटर पाणी तुमचे वगैरे वगैरे विभागणी खऱ्या अर्थाने करता येत नसते. पण तसं पहिले तर ती इथे जन्म घेतलेल्या प्रत्येकाची सम-प्रमाणात असतेच. आणि समजा जमिनी जरी गुंठ्या गुठ्याने वाटून  घेतल्या तरी ज्यांच्या नावे सध्या सात-बारे आहेत ते त्या सोडायला तयार होतील का? आणि जमिनीच्या मालकीकडे पहिले तर का मग जमिनी तथा कथित उच्च वर्णीयांच्या नावे जास्त आहेत? ते जन्माला वगैरे लवकर आले होते का? तर नाही. इथच्या हजारो वर्षांच्या व्यवस्थेने आपोआप त्यांच्या सात-बाऱ्यावर त्या चढवलेल्या होत्या. तितकेच काय तर याच व्यवस्थेन सगळ्यात आधी शिक्षण ही यांच्याच नावे १००% आरक्षित केले होते. पुढे जो शिकलेला तोच नौकरीत, या नियमाने मग तिथेही जवळपास १००% च्या आस पास उच्च वर्नियांचेच आरक्षण. मग एकंदर व्यास्थेत सगळेच मुठभर समाजातील लोक आली. पण पुढे शिक्षणाच्या पाझराने, होय पाझरा-पाझरानेच,  वंचित समाज पुढे आला आणि मग ओघानेच प्रस्थापित व्यवस्थेतील लोकांशी साहजिकच स्पर्धा करू लागला. स्पर्धेत हारायचे नाहीच हीच सवय लागलेली असल्याने किंबाहुणा एकेकाळी व्यवस्थाच तशी बनवली गेली असल्याने हा अनेकांच्या सर सरळ पोटावर पाय होता आणि अजूनही आहे; याने मग अनेकांच्या मुखातून द्वेष बाहेर पडू लागला. पण तो द्वेष अज्ञानातून आहे. हा प्रचंड देश मोजकीच लोके सांभाळू शकत नाहीत. म्हणून समाजाच्या प्रत्येक स्थरातून इथे लोक पाहिजेत. म्हणून त्यांना प्रोस्साहन पाहिजे. आणि हक्कच पहिला तर लोकसंखेच्या प्रमाणात इथल्या सगळ्या क्षेत्रावर प्रत्येक समाजाचा जितका तितका हक्क आहे. 
    आज जर खरच जातीनिहाय लोकसंख्या व्यवस्थेतील आणि संपत्तीतील वाट्यासहित 'नीट' मोजली तर आपल्याला थक्क करणारी आणि खरच आपण जाती व्यवस्थेमुळे किती अराजक माजवून ठेवले आहे हे दाखवणारी असेल. आरक्षणाच्या प्रश्नांवर चर्चाच हवी असल्यास ती वस्तू निष्ठा असावी. बिग पिक्चर समोर ठेवून असावी. गुणवत्ता वगैरेला काही धक्का बसत नाही. आणि कुठे आकडेवारीने गुणवत्तेला कसा धक्का बसतोय असे कुणी दाखवत असेल तर तिथल्या उच्चवर्णीय व्यवस्थापकांच्या बुरसटलेल्या आणि अजूनही १८ व्या शतकात जगणाऱ्या मेंदूलाही तपासून पहा, उत्तर तिथेच असते. 
    या सगळ्यामागच एक कारण आहे, बाबासाहेब अजून कुणालाच नीट कळले नाहीत (म्हणजे आम्हाला ते पूर्ण कळाले असेही नाही). आणि सगळ्यात म्हत्वाचे तर उच्चवर्णीयांना कळले नाहीत. त्या माणसाने संविधान एका विशिष्ट वर्गा साठी लिहिलेच नव्हते. ते होते अखंड भारतासाठी. अतिशय दूरदृष्टी ठेवून. त्यामुळे त्यांनी जो पाया मांडलाय तो खूप खंबीर आहे. त्या पायावर खर तर स्वयंप्रकाशित आणि स्वयंपूर्ण समतावादी समाज निर्मिती करणे हे आपले सगळ्यांचे ध्येय असावे.  

    (सांगण्याची गरज नाही, पण एका अर्थाने या प्रतीवादाला मदतच होईल म्हणून. कारण आरक्षणाचे समर्थान करणारे आरक्षण घेणारेच असतील असा हा फार मोठा गैरसमाज बाळगून आणि वेळ पडलीच तर 'तुम्ही कशाला नाही म्हणाला आरक्षणाला?' अशी चर्चेची बोळवण करून आम्हीच खरे असा आव आणला जातो म्हणूनही. मी जन्माने खुल्या वर्गातील जातीतून आहे)


    प्रतिक्रिया :

    Sudhakar Patil प्रकाश विस्तारत लिहिण्यास वेळ नाहीये माझ्या कडे पण आजचा लेख वाचून आसं वाटलं कि तुम्हालापण राजकारणात जाण्याचे डोहाळे लागले आहेत राजकीय दृष्ट्या बोलायचा झाला तर लेख सुरेख, पटवून देण्याचा उत्तम प्रयत्न .... पण .... हा पण खूप मोठा आहे ... ....होय विषय खूप मोठा आहे ... विस्तारत फोन वर बोलेन
    September 5 at 12:57am ·  · 5

  • प्रकाश बा. पिंपळे Patil साहेब नक्की. बोलल्या शिवाय प्रश्नाचा आणि उत्तराचाही तळ लागणार नाही. आणि खरच तुमच्या सारख्या तळागाळात काम केलेल्यांचे विचार नक्कीच ऐकावेशे वाटतील. आणि राजकारणाचे म्हणाल तर २०१४ अजून दूर आहे! :) आणि तसा काही विचार झालाच तर तुम्ही आमच्या पाठीशी खंबीर पाने उभे असतांना जातीय राजकारण करायची गरज कधीच पडणार नाही. आणि तसे केल्यास आपल्यात आणि आरक्षणाकडे राष्ट्रानिर्मानाचे आणि सक्षमीकरणाचे हत्यार म्हणून न पाहता, व्होट बँक इशू म्हणून बघानारात काय फरक? बाकी आमचे तर सध्या काही नाही राजकारणाचे, तुअमाचेच काही असेल तर, आम्ही कार्यकर्ते तयार आहोत पाटील साहेब!
    September 5 at 1:07am ·  · 3

  • Takshak Bodhi ‎. आणि कुठे आकडेवारीने गुणवत्तेला कसा धक्का बसतोय असे कुणी दाखवत असेल तर तिथल्या उच्चवर्णीय व्यवस्थापकांच्या बुरसटलेल्या आणि अजूनही १८ व्या शतकात जगणाऱ्या मेंदूलाही तपासून पहा, उत्तर तिथेच असते.

    Correctly pointed out Prakash ... :)
    September 5 at 7:48am ·  · 2

  • Kuldeep Deshmukh ‎@prakash & takshak, mitrano maz hya babtital knowledge thod kami ahe mhanun vicharto ki ase konti karana ahe ki jyamule amuk eka samaja la reservation dyawe amuk eka samaja la nako kinva kontya nikashan mule amuk eka samajala reservation dyav as tumhala watat

  • Shivraj Kalshitte Thank god I don't have reservation bcoz I and my generation will become stronger and more stronger......Keval dnyan ki kaam aata hai..
    September 5 at 9:28am ·  · 1

  • प्रकाश बा. पिंपळे ‎:) tasa nahi saheb lokaho. OBC cha MPSC wagaire che cutoff bagha, kalel ki tithehi spardha aahech karan loksankhyach titaki! Tech SC/SC che hoil yetya 10 warshat. Je ki changali bab aahe. Ani te magech na honyache karan mhanje aapali poor shikshan vyavstha - Pazara Pazaranech tithe pohachaliye Paravhane nahi!
    September 5 at 9:52am ·  · 1

  • प्रकाश बा. पिंपळे Deshmukhsaheb loksankhechya pramanat representation ani Sadhanta asanya sathi garaj aasel tya wargla.
    September 5 at 9:54am ·  · 1

  • Atul Chalak Mala vatata pratek kshetrat arakshanachi defination hi vegali asavi.... Jasa shikshanat aarthik nikash, rajkaranat caste ani naukarit gunvatta...
    September 5 at 10:13am ·  · 1

  • प्रकाश बा. पिंपळे Atulrao Tumhi mhanta te barobar aahe. Badal ani tyat sudharna vhyala pahijet. Loksankhecha ani tya kshetrancha nit abhyas karun. agreed.
    September 5 at 10:15am ·  · 1

  • Kuldeep Deshmukh Prakash Pimpalesadhanta ani representation he reservation mule yet ka ? ek sadha prashna ahe pujniy Dr. babasahebana reservation hot ka ? tari tyani kityek padvya milavalya na farak itka ahe ki tyana padvya milavatana Shahu maharaj Sayajirao maharaj yani welo weli madat keli ani mala watat ekda manus tya levela pohachala ki sadhanta aapoaap milte mala tari as watat, ani rahila sadhantecha prashna tar aaj itar sajat sudha motha warg nirdhan aahe mag tya anushanga ne sagalyanach reservation dyayacha ki madaticha hat dewun aapal kartvya purn karayacha he shasnanech tharvave pan cast basis reservation mhanje mala tari saral saral dividation vatat aapan janun bujun ekhadya wargala aapalyatun wegal kadhato as mala watat ani shahu maharajani tyanchya rajyat reservation chalu kela karan ti kalachi garaj hoti tya kali dalit bandhavana shikshana cha hakka nakarnyat yet hota pan aata sarv shiksha abhiyana tun sarvana shikshana cha saman hakk milala aahe as maz mat aahe
    September 5 at 11:12am · Edited ·  · 1

  • प्रकाश बा. पिंपळे ‎1. Shahu maharaj Sayajirao maharaj yani welo weli madat keli - Reservation 2. levela pohachala ki sadhanta aapoaap milte - Babsahebanna anek ucchwarniyanni mothe zalyavar hi accept kele nahi 3. Itara samajatil jyanna garaj aahe tyanna garaj asel tya goshti nakki dyayala hawyat - agreed.

  • Amol Suroshe सडेतोड आणि सत्य लिखाण. सत्य बोलायला - लिहायला आणि वाचायला सुद्धा हिम्मत लागते. ती हिम्मत दाखवल्याबद्दल अभिनंदन.

    काल टीव्ही वर एक कार्यक्रम बघतांना छान वक्तव्य कानी पडल, माननीय सर्वोच्च न्यायालयाने १९९२ मध्ये एका खटल्यात आरक्षणाचा खरा हेतू स्पष्ट केला होता तो असा..

    आरक्षण म्हणजे काही "गरिबी हटाव" चा कार्यक्रम नाहीये, आरक्षणाचा मूळ हेतू म्हणजे वर्षानुवर्षे येथील सामाजिक परिस्थितीमुळे मागासलेल्यांना प्रत्येक क्षेत्रात प्रतिनिधित्व देणे हा होय. ज्या वेळी शासनाच्या आणि प्रशासनाच्या विविध स्तरावर आरक्षणामुळे वंचित घटकांना प्रतिनिधित्व मिळेल तेव्हाच ते एकूण या राष्ट्रीय विकासाच्या प्रक्रीयाम्ध्ये सहभागी होऊ शकतील, आणि हा देश - हि व्यवस्था माझी आहे अशी भावना त्याच्या मध्ये जागृत राहील.

    आरक्षण म्हणजे काही चपराशी किंवा तत्सम नौकर तयार करण्याचे मध्यम नाहीये तर एकूणच निर्णय प्रक्रियेत सर्व घटकांना सामावून घेणे हे आहे. सबंध देशामध्ये आरक्षणामुळे हजारो वर्षे व या व्यवस्थेपासून दूर ठेवलेल्यांना या व्यवस्थेचा अविभाज्य घटक होता आलं आणि या द्वारे त्यांचा पर्यायाने भारतीय समाजाचा विकास झाला.

    आरक्षण देतांना गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागासालेल्यांचे पण प्रतिनिधित्व असायला हवे, त्या साठी आर्थिक निकषांवर सुद्धा आरक्षण देता येऊ शकते पण आरक्षणाच्या मूळ सामाजिक हेतूला कुठलाही धक्का न लागू देता.

    आरक्षणामुळे गुणवत्ता प्रभावित होते या तर्कालाही कसला आधार नाहीये, कारण आज देशाच्या सबंध निर्णय क्षमता असणाऱ्या पदांवर बोटावर मोजण्या इतकेच मागासवर्गीय अधिकारी आहेत आणि उर्वरित ९० टक्क्यांहून जास्त हे तत्सम उच्च वर्गातून आहेत तरी हि आपण एकूणच आपल्या प्रशासनाची गुणवत्ता बघू शकतो.

    आरक्षण या विषयावर नेहमी वाद घालण्या पेक्षा त्या मागील मूळ हेतू समजून भारतीय समाज कसा मजबूत करता येईल हे सकारात्मक दृष्टीने पहिले पाहिजे.

    अजूनही आदिवासी, भटके, विमुक्त आणि इतर मागासवर्गीय लोकांचे जीवनमान बघा.. कुठल्या संध्या त्यांना प्राप्त होतात, सर्व म्हणतात द्या न त्यांना संध्या, शिकायला पाठवा वैगेरे वैगेरे पण सत्य परिस्थती पहिली तर त्या सर्व कार्यासाठी लागणारा पैसा किती प्रमाणात दिला जातो हे हि पहिले पाहिजे. आणि मिळणाऱ्या पैश्यात ज्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो त्यातून कसा ह्या सर्व वंचितांचा विकास साधता येईल आणि कधी त्यांना समान स्तरावर आणता येईल याचा विचार अपान सर्वांनी करावा.
    September 5 at 11:35am ·  · 6

  • Takshak Bodhi आरक्षण म्हणजे काही "गरिबी हटाव" चा कार्यक्रम नाहीये, आरक्षणाचा मूळ हेतू म्हणजे वर्षानुवर्षे येथील सामाजिक परिस्थितीमुळे मागासलेल्यांना प्रत्येक क्षेत्रात प्रतिनिधित्व देणे हा होय. ज्या वेळी शासनाच्या आणि प्रशासनाच्या विविध स्तरावर आरक्षणामुळे वंचित घटकांना प्रतिनिधित्व मिळेल तेव्हाच ते एकूण या राष्ट्रीय विकासाच्या प्रक्रीयाम्ध्ये सहभागी होऊ शकतील, आणि हा देश - हि व्यवस्था माझी आहे अशी भावना त्याच्या मध्ये जागृत राहील.

    Correct ... :)
    September 5 at 11:39am ·  · 2

  • Hemant Sardeshmukh · Friends with Mahesh Pawar
    ‎1) Arakshan fakt jativar adharit asave ka? 2) Tyapeksha te arthik sthitivar adharit asane jast sayuktik nahi ka? 3) Jethe arakshan asel tethe gunavatteshi tadjod, he trivar satya nahi ka? 4) Jar jativar adharit arakshan asel tar apan jatibhed manato, asa artha hot nahi ka? 5) Arakshan kiti varshe asave yababat Dr. Babasahebani ghatanet kahi lihile ahe ka? Ki he jatibhed kayamswarupi aapalyat phoot padatach rahtil? Krupaya aapale vichar manda.
    September 5 at 2:05pm ·  · 2

  • प्रकाश बा. पिंपळे ‎1. Tase pahile tar nasawe. (4 che uttar details baghavet) 2. ek comment madhe mhnataly apramane reservation is not meant for just removing poverty - aarthik garaj asel tar EBC wagaire sarkhya facilities asawyat ani tya ajun jast aswyat 3. Gunwatteshi tadjod hotach nahi - minimum eligibility kuthe hi asatech ani kamat gunatmak farak hot nahi. Competition hi kami hot nahi karan - OBC che udhaharan tyancha cutoff kahi weles Openchya peksha 1 te 2 marks ne jastach asto 4. Apan Jatibhed ajunahi manato mhanunach khare tar aarakshanachi garaj aahe 5. Tyachi mala kalpana nahi, pan te jay karnanni dile gele ti karne aajun sampaleli nahit. Apan pratikriya baddal Dahnyawad. Ani apan sagalyannich jatibhed nirmualnalasathi praytan kele tar tumhala apekshit aarakshan virahit vyavstha yetya 50 warshat disel. Provided eauality purna taha achieve zaleli pahije
    September 5 at 2:20pm ·  · 1

  • Kuldeep Deshmukh ‎@amol & takshak , mitrano aapan jya samajik paristiti mule magasalelya warga chi gosht karta ahat ti paristiti tya kala pramane ahe ka ? Ani jya lokani ti paristiti bhogali te lok tari aaj ahet ka ? Mitrano kala pramane jatiy wishamte chi dhar pan bothat zali ahe ani ji kahi thodi bahut jatiyta ahe ti gramin bhagat ahe karan ajun pan shikshan, nave vichar tya bhagat mhanave titkya pramanat pochale nahi pan mala khatri ahe ek diwas jatiyta tya bhagatun pan samul nasht hoyil ani rahil tumhi je pratinidhitwa denya chi gosht karta ti denyachi gosht nahi ahe ti milavnyachi gosht ahe tyana apan reservation hya nava khali kamkuvat tar karit nahi ahot na, ani samjat apanach jatiyta pasarvat nahi na hyacha vichar karava

  • Takshak Bodhi ‎@ Kuldip - Jatibhed Nirmulana Sathi Dr. Babasahebani lihilela "Annihilation of Cast" ya pustakatlya babinacha samajatlya sarva staratil lokani avalamb kela ani tashi Manasikata Thevali badalavali tar Arakshan sarkhya gostichi garaj bharatala nahi. Pan konihi tya babinacha avalamb karayala tayar nahit ani kibuhuna tashi manasikata tayar honyasathi ankhi kitek varsha lagatil kai thavuk.

    Current Jatibhedache udhaharan dyayache zalyas, Google News madhe Dalit shabd type karun search karave deshabharatil khup sare udhaharn pahala milatil, kiva "Cast no Bar - SC/ST/OBC please excuse" yevadhacha search karave 4-5 lakha peksha jast result miltil.Yachach arth Jitiyata hi fakt gramin bhagatacha navhe tar shahari bhagatil educated lokanmadhe suddha ahe yache he praman.
    September 5 at 3:41pm ·  · 2

  • Vishalsing Chauhan mitrano mala fakt mazya eka prashnache uttar dya me ek teacher competitive exam deto maza ek x friend pan competitve exam deto tyche economical background mazya peksha khup changle ahe pan mpsc chaya cutt off la tyala mazya peksha 14 mark kami asunhi tyala chance ka an mala ka nahi karan me so called uch vargat janmala aalo mhanun?????

  • Takshak Bodhi ‎@ Vishalsing - Tumachya prashnache uttare varil prakash ni lihilelya likhana madhe ahe.

  • Vishalsing Chauhan pan mag he amchych veles ka

  • Vishalsing Chauhan mag he sagli mule jar ya vyasthevirudh band karu lagli tar

  • प्रकाश बा. पिंपळे Vishalsing band wagaire kahi honar nai! Ani reservation naste tar ata paryant nakkich band zale aasate. Karan tokachi paristhiti. Ani tya prashnachi kalji ghyayala Creamy layer certificate aahech ki!
    September 5 at 6:58pm ·  · 1

  • Vishalsing Chauhan maz example bajula thevu ,pan aajhi so called open madhil mule jya laukik arthane apan gunvata ha birud vaprto tya arthane pudhe asun sudha tyna yogya to job milat nasel tar tyni kay karayche?an ekhadya IAS officer chya mulala reservation dene an eka garib shetkarychya mulala davlane ka kuthala nyay??
    September 5 at 6:59pm ·  · 1

  • Vishalsing Chauhan praksh rao pan sc st sathi cremylayer aste ka? yachahi vichat vhyala hava na

  • प्रकाश बा. पिंपळे Reality Bagha. Jase anek jan mhantat ha wishay khup moththa aahe. Tasa kaharch to khupmotha aahe. That's why I have mentioned in article to look at the Big picture. Show me the IAS and so called reach sending their children to the Government Jobs. There are very few. And also examples as you mentioned are very personal many times as mentioned in article again. A day will come when you will find all reserved category cutoffs same as that of the open. You will find the same competition among them as the open category. we don't see it as of now because there is very less penetration of education among those classes. Yes, now the point should be how fast we bring those this level? And also accept them socially. Education can be a good medium for it! I know people like Vishalsing are doing that very honestly. I have personally seen his passion for education. But still questions like these bug them and that was the reason I wrote the piece. To get this point to such honest fellows who want to know and get convinced about this very issue. Others who have there reservations of opinion on this may please neglect it :)
    September 5 at 7:07pm ·  · 1

  • Vishalsing Chauhan pan mag he sagle vyavstheche balich ka?

  • Bhande Nitin Patil aata houn jaudya 2014 ch election, bhashanachi tayari jabardast zaleli disatey :)
    September 5 at 8:48pm ·  · 1

  • Sudhakar Patil होय आरक्षण देण्याचा उदेश चांगलाच होता, त्या वेळेस एखाद्या समाजाची परिस्तिथी खूप बिकट होती , त्या समाजाबद्दलचे विचार हे खूप खालावलेले होते आणि त्या मुळेच ह्या परिस्तिथी ला तोंड देणारे डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानात ह्याची नोंद घेतली, वंचित समाजासाठी आरक्षण असायला पाहिजे ज्या मुळे वंचित समाज वर येईल आणि एक भक्कम भारत निर्माण होईल हाच त्यांचा उदेश होता . मला एवढंच म्हणायचं आहे त्यांचा उदेश चांगलाच होता पण आता हे जे काही चाललाय ह्या राजकीय नेत्यांचा उदेश हा एक वेगळाच आहे . लोकांनी हे समजून घेयायला पाहिजे दोन्ही विचारांची तुलना होऊच शकत नाही. समाजातील विसंगत पना दूर करण्यासाठी बाबा साहेबांनी संविधानात नोंद घेतली होती आणि आता हे जे काही चाललंय ह्या मुळे समाजातला विसंगत पना दूर होणे तर दूरच पण ह्या उलट विसंगत पना वाढण्याला खत पाणी घालण्याचं काम चाललंय.




    आता नोकरी मध्ये बढती देण्या च्या विधेयक बदल बोलायचा झालं तर ..... ह्यात फक्त राजकीय हेतू आहे असच मला वाटते ..... हे तर आसं झालं कि मुलाला महाविद्यालयात प्रवेश घेताना आरक्षण दिला आणि पुढ प्रत्येक परीक्षे मध्ये आरक्षण , पहिल्या वर्ष्यातून दुसर्या वर्षी प्रवेश करताना पण आरक्षण असा होतं ( आता तेच उरलाय ... खरच तिथ पण आरक्षण आणतील हे लोक .... आहो खुल्या वर्गाला पूर्ण विषय पास होणे गरजेचे तर SC / ST साठी ४ विषय मध्ये नापास जरी झाले तरी पुढच्या वर्ष्यात प्रवेश आणि त्यांना ते ४ विषय मध्ये पास होण्याची गरज सुधा नाही ...... आसं पण करतील हे लोक ) ..... खरच एक वेळेस नोकरी लागली तर पुढ त्यांना कश्याला पाहिजे हो आरक्षण ... स्वतः च्या कार्यक्षमते च्या आधारावरच बढती होणे गरजेचे नाही का. आणि जे लोक खरच नोकरी करत आहेत त्यांना स्वतः ला पण वाटत असेल कि नकोय त्यांना आरक्षण ... पण ह्या राजकीय नेत्यांना पाहिजे ना . मला मान्य आहे पिच्याड्लेल्या समाजाला समाजातल्या व्यक्तींना समोर येण्या साठी आरक्षण गरज आहे पण मग काय बढती साठी पण ....

    एक म्हण आहे ' एखाद्याला पाण्या जवळ नेऊ शकतो पण त्याला पाणी स्वतःच प्यावे लागेल' ...... इथं आरक्षण च्या बाबतीत उलट होत आहे .. एखाद्या ला पाण्या जवळ तर नेतच आहेत (ते पण ५ लोकांच्या खांद्यावर उचलून ) आणि पाण्या जवळ नेऊन पण तो पाणी पीत नसेल तर त्याच्या तोंडात पाणी टाकल्या जात आहे .... पुढ चालून मग काही दिवसांनी आसं होईल कि तो पाणी gitaknar नाही मग हे लोक त्याच्या नरड्यात नळी टाकून पाणी पाजावायचा प्रत्न करतील . एका वाक्यात बोलायचा असेल तर आरक्षण च्या बाबतीत राजकारण करू नये , बघावे कि खरच कोणत्या लोकांना आरक्षण ची गरज आहे , आणि आरक्षण देऊन लोकांना पाण्याजवळ नेण्यात यावे , पाण्याजवळ जाण्याची क्षमता द्यावी , त्याला पाणी पिण्यास सक्षम करावे पण पाणी पाजे पर्यंत आरक्षण नको .........




    आजून एक खूप मोठा विषय हा पण आहे कि आरक्षण चा लाभ खरच गरजूंना होत आहे का ??? , गरजून पर्यंत आरक्षण चा लाभ जात आहे का ??
    September 5 at 9:50pm ·  · 2

  • Vishalsing Chauhan patil 2014 che election ladhvach aapla fukt prachar
    September 5 at 10:09pm ·  · 1

  • Kuldeep Deshmukh Totaly agreed with sudhakar patil
    September 5 at 10:20pm ·  · 1

  • प्रकाश बा. पिंपळे Sudhakar rao. Kahi mudyan baddal mi agri ahe. Pan tu mandatay to aarkshanacha hetu nai. Ani samaja desh watun ghetala tar kadachit jyatya samajala tethe representation milel. Amol raje sambhala! Amhi thode out of station ahot :)

  • प्रकाश बा. पिंपळे Sudhakar rao. Kahi mudyan baddal mi agri ahe. Pan tu mandatay to aarkshanacha hetu nai. Ani samaja desh watun ghetala tar kadachit jyatya samajala tethe representation milel. Amol raje sambhala! Amhi thode out of station ahot :)

  • प्रकाश बा. पिंपळे Sudhakar rao. Kahi mudyan baddal mi agri ahe. Pan tu mandatay to aarkshanacha hetu nai. Ani samaja desh watun ghetala tar kadachit jyatya samajala tethe representation milel. Amol raje sambhala! Amhi thode out of station ahot :)

  • प्रकाश बा. पिंपळे Sudhakar rao. Kahi mudyan baddal mi agri ahe. Pan tu mandatay to aarkshanacha hetu nai. Ani samaja desh watun ghetala tar kadachit jyatya samajala tethe representation milel. Amol raje sambhala! Amhi thode out of station ahot :)

  • प्रकाश बा. पिंपळे Sudhakar rao. Kahi mudyan baddal mi agri ahe. Pan tu mandatay to aarkshanacha hetu nai. Ani samaja desh watun ghetala tar kadachit jyatya samajala tethe representation milel. Amol raje sambhala! Amhi thode out of station ahot :)
    September 5 at 11:15pm ·  · 1

  • Bhushan Mhatre · Friends with Vijay Panzade
    great

  • Pradyumna Deshpande Prakash : लेख छान लिहिलाय !! पण मनातून एक गोष्ट सांगा.. हा लेख कुठल्या भावनेतून लिहिला?? आरक्षणाचे दुष्परीनाम तुम्हाला नाही भोगावे लागले का??
    श्री. आंबेडकरांनी फक्त १० वर्षांसाठी हे आरक्षण दिलं होतं .. त्यानंतर ते चालू ठेवण्यात भारतीय नेत्यांची भूमिका लक्षणीय आहे.. मला एक कळत नाही.. शिक्षणात आरक्षण मिळाल .. ठीके.. नोकरीत आरक्षण मिळाल ठीके.. पण २ वेळा Already लाभ घेवून झाला असेल, तर परत बढतीमध्ये कशाला पाहिजे राव ??
    मी आरक्षणाच्या विरोधात नाहीये.. पण फक्त एक लेव्हलला घ्या ना... तुमचं शेपूट वाढतचं चाललंय !! ओपन Categoryमध्ये येणाऱ्या सर्व जाती.. त्यांना कधी आरक्षण मिळाल का हो?? नाही मिळाल तरी त्या प्रगती कर्तायेतच ना ? :)
    बाकी तुझा राजकारणात किंवा बी-ग्रेडमध्ये सहभागी व्हायचा विचार असेल तर शुभेच्छा !! :) आणखी काही बोलू इच्छित नाही !! :)
    14 hours ago ·  · 2

  • Sandeep Nandgaonkar Prakash PimpaleTakshak Bodhi Pradyumna Deshpande बघा मित्रानो.. SC असो ST OBC किंवा मराठा किंवा ब्राह्मण कित्ती दिवस असा भांडायचं आहे..
    आता SCआणि ST च्या लोकांना २-३ जाऊद्या ५ पिढ्या पर्यंत आरक्षणान मिळालाच पाहिजे.. यात वाद नाही
    ...See More
    10 hours ago ·  · 2

  • Kuldeep Deshmukh Deshpande saheb cast base reservation mala pan manya nahi pan b-grade cha vishay kadhun tumhi siddh kel ajun pan castism ahe
    2 hours ago · 

  • प्रकाश बा. पिंपळे Aso mala kashacha rag nahi. Karan te watane ani tase label lawane sahajik aahe. :) khanta hi nahi. Pan kadachit yanche lokanna nakki kalel. Apan shant dokyane wichar karawa hich apeksha. Jai Hind!http://www.youtube.com/watch?v=7EUnXOL165o&feature=relmfu


    In an interaction with reporters during Idea Exchange organized by Loksatta, the...See More
    2 hours ago ·  · 

  • प्रकाश बा. पिंपळे Purna aika ani punha punha aika. Mala patale anekanna patel. Ani Mohanrao nakkich brigade madhe janar nahit ;)
    2 hours ago · 

  • कृष्णा पाण्डेय 
    I 'll like to repost my fb status on 8th July 2012 in this regard, that says "Turned few pages of Newspaper "Sunday Times of India"... on Page No. 16, found a news that headlines "Scored Zero in exam? Get seat in AP course". It further read
    s "22 of 78 students who scored zero in the entrance test this year will get admission in engineering and agriculture courses as they belong to SC or ST Communities". BTW exam is called EAMCET, and deciding factor to award them this reward was their 40% marks in Class XII. Wondering where our country's future leading to?"
    I personally feel that the reservation or any govt. aid shud be given on basis of family income with reference to poverty line. Jai Hind.
    2 hours ago · 

  • कृष्णा पाण्डेय 
    I may agree to your findings on past, but look at country now. There are countless schemes from Govt. for different categories and minorities. Now tell me if all General category people are born rich and intelligent? If not, why should not 
    they get benefited from govt. schemes? You will also agree that not all SC/ST people are poor in country now-a-days, so why should their children get reservation in various schemes? How will you justify this, without some concept like "an eye for an eye" ;-)
    2 hours ago · 

  • प्रकाश बा. पिंपळे It's not an eye for an eye! It's an extra eye for those, whom this society had kept blind for last many years. And why and extra eye now? - So that they can cover up the distance and come with those who had taken their both the eyes and has 4 eyes in the past.