Friday, November 14, 2014

मराठा समाज आरक्षण

मित्रानो मराठा समाज आरक्षण ला न्यायालयाने स्तगीति दिली हे खरोखरच दुर्दैवी आहे. आता सरकार त्याचा पाठपुरावा करेल आणि आदरणीय न्यायालय पुन्हा विच्यार करेल हीच अपेक्षा करतो .
  पण मित्रहो माला इथं खरच सांगायचं आहे की  आपला समाज मागे पडन्या मागे बऱ्याच कारणं पैकी एक  कारन म्हणजे आपला समाज हेच आहे . होय मला आसां वाटतं की मराठा समाज मागे पडण्या मागे मराठा समाज पण एक कारन आहे. मराठा समाज मोठेपना, हुज्जतपना , मीपना ह्यतच मागे पडला , मराठा समाज स्वतःचा बढेपना हयात मागे पढला. मराठा समाज एकमेकांचे पाय खेचन्या मधे मागे पडला  आणि  एक मेकांना कमी लेखण्या मधे मागे पडला. आपल्या  समाजाच्ं झालं आसं की समाजाला वर नेने समाजाला सुधारने तर सोढाच आपल्या समाजाचा सगळ्यात पक्का वैरी कोण तर आपलिच भावकी
      आपल्या तालुक्यात आणि जिल्ह्यात तर ह्याची प्रचिती ज्यास्तच दिसून येईल. तुम्ही बरकायिने विच्यार करा , आपल्या तालुख्या मधे आणि जिल्ह्या मधे मराठा समाज एक मेकांचे लांग्या (खेकदयाच्या) खेचन्या मधे मग्न आहे.  त्यामुळे झालं आसं की एकमेकांच्या लांग्या खेचन्या मधे आज काही अपवाद वगळता सगळेच अपंग बिना लांघी बिना पयाचे लंगड़े झाले आहेत. एकूणच मराठा समाजाच्या ह्या सगळ्या गोष्टी मुळे आज समाजाची परिस्तिथि खीळ्खीळ झाली आणि आपल्या समाजाच्या ह्या पाय खेचने खेलामुळे दूसरे कधी दूर पुढे निघुन गेले काही कललेच नाही.
    मित्रांनो ह्या गोष्टी चा विच्यार करने गरजेचे आहे . राजकारण असो(मुख्य तर आपल्या समाजाला तेच आहे ) , शिक्षण असो , व्यवसाय असो की शेती सगळी कड़े आपल्या समाजाला कशी मदत करता येईल ते पहावे लागेल. एखादा कुणी व्यवसाय सुरु करत असेल तर ते कधी बंद पडेल आसा विच्यार करण्यापेक्षा त्याला कशी मदत करता येईल , एखादा शिक्षण घेत असेल तर नोकरी साठी कोंडी निर्माण करण्या पेक्षा त्याला कशी मदत करता येईल , आज आपल्या समाजाचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती ,शेतीला कशे पुढे नेता येईल शेती करणार्याला कसं प्रोत्सान देता येईल ह्याचा सगल्यांनी विच्यार करायला पाहिजे.
    मित्रहो आता आपल्यालाच ठरवायच आहे की आपल्या पूर्वजां च्या महान कार्या मुळे मीळालेली शुर मराठा मर्द मराठा पदव्या ....आपण शुर मराठे , मर्द मराठे  नुस्तं भाषाणां पुरते, मेसेज पुरते, लेख पुरते सिमित ठेवायचे आहे की कृतितुन दखवायचं आहे
    आरक्षण मिळणार की नाही हे मी नाही नाही सांगू शकत पण एवढं नक्की सांगेन की मराठ्यांच्या मनात जर आलं तर नक्कीच आशी परिस्तिथि बनवतील समाजाची की पुढच्या सात पिढ्या आरक्षणा ची गरज वाटनार नाही आणि खरच आरक्ष मीळाल्यावर मी जेवढा आनंदी होईल त्या पेक्षा मी त्या दिवशी आनंदी होईल ज्या दिवशी आपला समाज आरक्षण ची गरज नाही आशी परिस्तिथि निर्माण करेल.
जय भवानी जय जिजाऊ जय शिवजी
सुधाकर पाटिल
15 नवेम्बर 2014

No comments:

Post a Comment