Wednesday, November 12, 2014

ह्यलाच म्हणतात राजकारण

वाह ...ह्यलाच म्हणतात राजकारण , आज खरी जीत नेमकी कुणाची झाली हे खऱ्या खर्यांना नाही कळले. सिंगल लार्जेस्ट पार्टी असून सुधा अल्प मत्तांच सरकार ते पण आवाजावरनं स्थापन केलेली भाजपा , की स्वाभिमान दखवानारी शिवसेना की फक्त 41 आमदार घेऊन चौथ्या क्रमांकावर जावून सुधा एकदम महत्व प्राप्त करुण घेतलेली राष्ट्रवादी ...खरच नेमका विजय झाला कुणाचा .
   आसं पण म्हणतायत की आज जर गुपित मतदान झलं आसतं तर कदाचित सरकार पडलं पण असतं पण काही केल्या राष्ट्रवादी ला सरकार पाडायचं (आत्ता)नहिये . कारन आत्ता सरकार पडलं आणि फेर निवडणूक झाल्या तर भाजपा निवडून येईल मग 6 12 महीने भाजपा सरकारला खेळ खेळु द्यायचा , सरकारच्या प्रत्येक घडामोडी वर शिवसेना नजर ठेऊन राहील आणि शिवसेना आक्रामक होईल आणि सरकार ला धरेवर घरेल. मग जनता महाराष्ट्र भाजपा वर नक्कीच नाराज होईल लोकांना महाराष्ट्र भाजपा चा राग एययला लागेल (जसा आता माला राग येत आहे ) मग जनतरचा कौल पाहून सरकार ला पड़ायाचं .
   मित्रानो मला जर विच्यारलात तर, सगळे नाट्यमय घडामोडी पाहून माला तरी आसं दिसून आलं की एवढा महान नेता लभलेला असताना सुधा आणि त्या नेत्यांच्या मुख्या नारा "सबका साथ सबका विकास " "सबको साथ लेके चलना है" असतांना सुधा महाराष्ट भाजपा ला शिवसेनेला शेवट पर्यन्त सोबत घेता आलं नहिये हयात महाराष्ट्र भाजपा मधे अनुभव ची उणीव नक्कीच दिसून आली . सत्ते मधे न जावून शिवसेना आपला महत्व वाढून घेतली तर सत्तेचे दोर आपल्या हाती ठेऊन राष्ट्रवादी जिंकली . तर मला तरी वाटते जिंकून सुधा आज महाराष्ट्र भाजपा नाही जिंकली तर राष्ट्रवादी आणि शिवसेने चा आज नक्कीच विजय झाला.
सुधाकर पाटिल
12 नव्हेम्बर 2014

No comments:

Post a Comment