Tuesday, March 13, 2012

खऱ्या जातीयवादावर हल्ले करायचे सोडून बऱ्याच वेळी उगाच घोंगड्या झोडीत बसले जाते

जातीयवाद तो ही धर्म किंवा मग धर्म ग्रंथात आहे की नाही. या किंवा त्या ग्रंथात काय म्हंटले या पेक्षा समाजात तो आहे की नाही हे बघितला तर दिसेल की शिवा-शिव, वेगळ्या कपातला चहा वगैरे गोष्टी बऱ्याच बंद झाल्यात. पण खऱ्या जातीयवादावर हल्ले करायचे सोडून बऱ्याच वेळी उगाच घोंगड्या झोडीत बसले जाते. आणि हा जातीयवाद फक्त जातीने ब्राम्हण असलेलेच करतात हा एक मोठा गैरसमज निर्माण केला जातो आणि रुजवला जातो, कदाचित इतरांकडून होणारा झाकण्या साठी तर नव्हे. ब्राम्हन्यावर टीका करणारे हळू हळू ब्राम्हनावर सरकतात, कुणी राकीय पोळी भाजतो कुणी पुरणाची.असो.
पण खरा जातीय वाद जो राष्ट्रासाठी घटक आहे तो म्हणजे डोळेझाकून दलित आरक्षणाला विरोध करणारे. कोट्या मधून कुणी अडमिशन घेतली म्हणून त्याला शिक्षण होई पर्यंत आणि त्या नंतर ही हिणवणारे आणि त्रास देणारे - विद्यार्थी आणि शिक्षक. किंवा मग आपल्या जातीचा म्हणून आडनाव पाहून मार्क देवो की न देवो पण इतरान पेक्षा वेगळी वागणूक देणारे शिक्षक. आता हे कोणत्या जातीतले ते गौण. पण असा ही हा आधुनिक जातीवाद अजूनही अस्तिवात किंवा अशात अस्तित्वात आला आहे. हे कदाचित बरेच लोक मान्य करतील. कायद्याने जात मिटवण्याचा प्रयत्न होतोय पण बऱ्याच लोकांच्या (इथे फक्त एका जातीचे लोक अपेक्षित नाही) मनातून ती जात नाही. पण मग जाती निर्मुलांचा हा जो कार्यक्रम बरेच लोक हाती घेतात तो द्वेषातून आलेला आहे असे वाटते. फक्त आणि फक्त ब्राम्हण द्वेष हाच याचा पाया असेल तर जात कधीच जाणार नाही. इथे तो आहेच असा ही मला म्हण्याचा नाही एक जनरल निरीक्षण. उदेष्य जर योग्य असेल म्हणजे राष्ट्र निर्माणात समान संधी म्हणा किंवा जगण्याचा आणि प्रगती करण्याचा समान हक्क म्हणा असा असेल तर अभिनंदनीय. आणि प्रखरत किंवा आक्रमकता यांना विरोध नाहीच पण ती जातीनिर्मुलानाचे कार्य कारणांनी तुम्ही आम्ही जेथे जेथे कुणी जातीचे बीज पुन्हा पेरण्याचे काम करत आहे तेथे उपयोगात आणावी, जसे या (http://roundtableindia.co.in/index.php?option=com_content&view=article&id=4792%3Athe-death-of-merit&catid=119%3Afeature&Itemid=132) प्रकारात . हे ही एक जनरल निरीक्षण या पोस्ट बद्दल नाही. बाकी काही म्हणा अस्वस्थ भारताला जातीने जितके अस्वथ केले तितके कशानेच नाही :)





----
जागोजागच्या जातीय मक्तेदाऱ्या मोडून काढणे हे मुख्यमंत्री चे उदेष्य. मग त्यामक्तेदाऱ्या मराठ्यांच्या राजकारणातील असोत, ब्राम्हणांच्या सांस्कृतिक आणि सामजिक क्षेत्रातील असोत किंवा मग मारवाड्यांच्या व्यापारातील असोत,त्याच त्वेषाने मोडायच्यात. आणि त्यासाठीचा मार्ग त्यांना तेथून हाकलून नव्हे तर तर इतर सर्वांना तेथे पोहचवून.
जय महाराष्ट्र!


No comments:

Post a Comment