Friday, November 26, 2010

एका पोवाड्याचे महापरीनिर्वान - विठ्ठल उमप नावाचा झंझावात शांत


अगदी काल पवारवा पर्यंत विठ्ठल उमप नावाच्या शाहिराने अवघा महाराष्ट्र आपल्या पोवाड्याने जागवला होता. आज तो पोवाडाच शांत झाला. विठ्ठल उमप यांचे आज दिनांक २६ नोव्हे. २०१० रोजी नागपूर येथे भाषण देतांना हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ते  ८० वर्षाचे होते. वयाच्या ८ व्या वर्षा पासून ते  ८० वर्षांपर्यंत विठ्ठल गंगाधर उमप  हे संगीत क्षेत्रात कार्यरत होते. महाराष्ट्रच शाहिरीभूषण  असलेले विठ्ठल उमप एक उत्कृष्ट नाटककार, संगीतकार, गीतकार आणि शाहीर होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि आंबेडकरी चळवळीला उमपांचे खूप मोठे योगदान आहे आणि अवघा महाराष्ट्र या त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही आणि खरं पहिल तर मुक्त होऊ ही इच्छित नाही. एका कलाकाराला मंचावर असताना मृत्यू यावा हीच खूप मोठी गोष्ट आहे. आयुष्यभर बाबासाहेबांच्या विचारांचे  लोन महाराष्ट्रभर घेऊन जाणारे शाहीर शेवटचा श्वास घेताना जय भीम म्हणूनच गेले.   
त्यांच्या पोवाड्यांनी आजही महाराष्ट्र गर्वाने छाती फुगतो आणि असाच फुगवत राहावा हीच पांडुरंगा  चरणी प्रार्थना.

No comments:

Post a Comment