एकदा मी आणि अमोलराव असच सेकुलर (धर्म निरपेक्ष) राष्ट्र म्हणजे काय यावर बोलत होतो. तर तेंव्हा त्यांनी काही मोजक्या शब्दात याचा उत्तर दिला होत, ते असे : धर्म निरपेक्ष राष्ट्र म्हणजे धर्म विरहित राष्ट्र नाही, तर स्पष्टच बोलायचं झाल तर, अशा राष्ट्रात मंदिर, मस्जीत, चर्च वगैरे सगळ काही असते पण राष्ट्राचे नियम, धोरणे आणि भवितव्य मंदिरातून, मास्जीतीतून किंवा चर्च मधून ठरवली जात नाहीत. पण सध्याची परिस्थिती पहिली तर संसदीय लोकशाही ही या धर्म सत्तान पुढे झुकतीये. ही एक अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. वेळीच हे थांबवले नाही तर आपल्या स्वातंत्र्यावर विघ्न आल्याशिवाय राहणार नाही. हे मी नव्हे तर बाबासाहेब अनेक वर्षान पूर्वी सांगून गेलेत. इथली जनता बघताना शासनाने त्यांना फक्त माणूस आणि नागरिक म्हणून बघावे, हा मुस्लीम मतदार, हा हिंदू मतदार असा भेद केला तर अनिष्ट जास्त दूर नाही. आणि तेच शहाणपण मतदारांनीही नेतृत्वाकडे बघतांना ठेवावे. 
शेवटी सध्या असलेल्या परिस्थितीत हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही गटांनी सय्यम बाळगावा. नसता राजकारणी एक मेकांना एकमेकांची भीती घालून अविरत सत्ता गाजवायची वाटच पाहत असतात!      
 

 
 
 
 
 Posts
Posts
 
 
No comments:
Post a Comment