Wednesday, February 15, 2012

होय! तुमचे एक मत बदल घडवू शकते.


माझ्या एका मताने काय फरक पडेल म्हणून आम्ही मतदानाला बाहेर पडत नाहीत पण या मुळे एक एक असे करून एकूणच सुशिक्षित लोकांची मतदानाची टक्केवारी घसरते आणि मग इतर मार्गाने मिळवलेल्या मतदानावरच निवडणुकांचे भवितव्य अवलंबून राहते. याला जबाबदार आपणच.
पैसे वाटून , दारू वाटून इतर आमिषे दाखवून करवून घेतलेल्या मतदानाचे उत्तर आपल्या सारख्या लोकांनीच द्यायचे असते.. ते इतर कोणीच रोकु ...शकत नाही.

कुठलाच उमेदवार चांगला नाही हि तक्रार सुद्धा नकोच .. कारण, एकदम परफेक्ट उम्मेद्वार सापडत नसला तरी हि त्यातल्या त्यात उत्तम उम्मेद्वाराला मतदान करणे हेच व्यवहार्य ठरते. आणि ह्याला कोणीच अपरिहार्यता म्हणू नये ह्याला सामाजिक व्यवहार्यता असे म्हणतात.

आपल्या समाजासाठी .. आपल्या विकासासाठी .. रोजच्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी .. आजचा थोडा वेळ काढा.. संविधानाने दिलेला सर्वोच्च अधिकार, मतदान.. त्याचा वापर करा.

जय हिंद .. जय भारत

No comments:

Post a Comment