Sunday, February 5, 2012

मराठी साहित्य संमेलन

वसंत डहाके यांच्या अध्यक्षतेखाली चन्द्रपूर येथे ३ फेब्रुवारी ला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरीत मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाली आणि पुन्हा जुने दिवस आठवले. ७१ वे कि ७२ सहुत्या संमेलन असेल, विजया राजाध्यक्ष या अध्यक्ष होत्या आणि त्या वेळ पासून साहित्य संमेलन फॉलो करायचा चांद लागला. निवडणुकीचे निकाल जसे ७२ तास डीडी वर यायचे तसे साहित्य संमेलनांचे अध्यक्षीय भाषण वाटायचे एक कार्यक्रम खूप मोठ्ठा आणि लांबच लांब. मग तेंव्हा काळात फार नव्हते पण मग ती भाषणे टीव्ही वर ऐकत चीड-बीड-चीड-बीड अक्षरात लिहून घेत होतो. बराच काही सुटायचं पण एकंदर अध्यक्ष काय म्हंटले याचा अंदाज वाचल्यावर यायचा. असो. ती कागदे खूप वर्षे जपून ठेवली होती, घरच्यांनी मागे आमच्या अनेक साहित्य कृतीं सहित रद्दीत घातली असं दोन चार वर्षां पूर्वी कळाल. असो. असा आमचा साहित्यिक म्हणून प्रवास कुठे तरी प्रकाशकाच्या कार्यालयात जाऊन 'सुरु' व्हायच्या ऎवजी दुकानीत साखर-शेंगदाणे यांच्या पुड्या बांधण्यासाठी होवून 'संपला'. ते ही असो, बारा झाल एकदाचा.
आता थोडा थांबतो. काही मित्र आले आहेत. नुसता साहित्य काय कामच. त्याला जीवनाचा गंध असावा. असं म्हणणारे ग्रेस यांचे खालील भाषण ऐका तोपर्यंत....!     

No comments:

Post a Comment