Showing posts with label mukhyamantri blog. Show all posts
Showing posts with label mukhyamantri blog. Show all posts

Tuesday, March 6, 2012

लोकसत्ताला ही 'पोटदुखी' चा विकार !

अनेक वर्षांची लेखणीची चळवळ अर्ध्या हळकुंडानि पिवळ्या झालेल्या काही विशिष्ट पत्रकारांच्या हाती गेल्यावर त्याचा स्तर कुठल्या पातळीपर्यंत खाली येतो ह्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला आला.
निमित्य होते "लोकसत्ता" मधील 'वाचावे नेट-के' या नवीन सदराचे.
मागे एकदा एक मित्राद्वारे या लोकसत्ताच्या नवीन उपक्रमाची माहिती समजली, निव्वळ 'वरण-भात' लेखांचा भरणा असलेल्या या सदराखाली एखादी विचारांची झणझणीत मेजवानी लोकसत्ताच्या असंख्य वाचकांपर्यंत जाईल अशी त्याने अपेक्षा व्यक्त केली. अतिशय प्रांजळपणे कुठलाही जास्त विचार न करता केवळ ब्लॉग ची यु आर एल थोडक्यात माहितीसह नेटके च्या महाशयांना पाठवली, आणि खरच विसरून सुद्धा गेलो.
काल अचानक लोकसत्ता हाती पडल्यावर या महाशयांनी अमोल 'सुरोशे' , प्रकाश 'पिंपळे-पाटील' आणि मुख्यमंत्री कार्यकर्ता या ब्लॉग चा केलेला पोस्ट-मोंर्टम वाचला आणि अनेक वर्षान पासून ज्या चेहऱ्याचा आम्ही शोध घेत होतो तो सापडला. कारण ही प्रवृत्ती/व्यक्ती आम्हाला या पूर्वी अनेक ठिकाणी भेटली पण आम्ही लक्ष दिले नाही, किंवा त्याची फारशी दाखल घेतली नाही.

अगदी सुरुवातीलाच मोठ्या अविर्भावात 'आम्ही म्हणजे काही ब्लॉग माझा वाले नाहीयेत, उपलब्ध एंट्रय़ांमधूनच विजेते निवडणारं... प्रसिद्धी देणारं ' वैगेरे छापून उरलेला सबंध लेख केवळ आणि केवळ आमच्या ब्लॉग चे, त्या मध्ये व्यक्त केलेल्या विचारांचे आणि ग्रामीण, बहुजन पार्श्वभूमी असणाऱ्या योगदान कर्त्यांची जाणीवपूर्वक आणि निव्वळ आकसापोटी केलेली केलेली निरर्थक ओरड म्हणावी लागेल.

हातात वृत्तपत्राची सत्ता आणि डोक्यात जात आणि अंगावर पुरोगामित्वाच्या शाली पांघरून पिंपळा वर वर्षानुवर्षे बसलेले हे मुंजे. जास्त स्पष्टीकरण नकोच द्यायचे असे वाटते पण, नाही बोलले तर गैरसमज, तो हि हार मानल्याचा.
म्हणून खालील प्रपंच, नसता या 'नेटके' ची किंमत त्याच्या वृत्तपत्रा च्या किमती पेक्षा देखील जास्त नाहीये.

मी म्हणालो आकसापोटी, होय ! कारण ज्या ब्लॉग वर शंभराच्या वर एन्ट्रीज आहेत, २०१० पासून लिखाण आहे त्या ब्लॉग च्या पहिल्या पानावरच्या चार लेखांना वाचून ह्या विचारवंत महाशयांनी ब्लॉग आणि ब्लॉगर्स च्या आडून एका विचार धारेवरच हल्ला चढवला ! हे असले हल्ले आम्ही नेहमीच पचवत आलोय पण आम्हाला "प्रसिद्धीचे छुपे उमेदवार" म्हणणारे स्वतः ला कुठेतरी लपवून हे असले फुटकळ शाब्दिक वार करतात याचीच कीव येते.

आता यांनी ज्या चार लेखांबद्दल आक्षेप नोंदवला, त्या लेखांच्या गाभ्यात विचार होता तो महाराष्ट्राचे आराध्य असलेल्या शिवरायांचा, सर्वांना पोटभर अन्न मिळाव म्हणून राब राब राबणाऱ्या त्या माझ्या शेतकऱ्याचा, आणि साहित्याला गेली कित्येक वर्ष घुबडासारखे चिटकून बसलेल्यांवर जोरदार आसूड ओढणारा.. असा काहीसा विचार आणि नेमके इथेच ह्यांचा पोटशूळ !

शिवजयंतीच्या लेखात शिवरायांची थोरवी सांगण्याला आमचा मोह ठरवून सबंध लेखाला एका क्षणात निष्प्रभ ठरवेले !
महाशय, मुख्यमंत्री ब्लॉग च्या दर्शनी भागावरच अगदी ठळक अक्षरात लिहिले आहे, "आमचे श्रद्धास्थान" डोळे फाडून बघा नीट ! होय सबंध लेखच काय अख्खा ब्लॉग जरी महाराजांची थोरवी गाण्यासाठी वापरला ना तरी ते थोडेच! पण इथे तुमच्या पोटात का दुखतंय ? शिवजयंती च्या दिनी या महाराष्ट्रातील एक सर्व सामान्य तरुण सार्वजनिक शिवजयंतीची मिरवणूक सोडून आत्ता विचार करायला लागला कि काय, हि भीती तर नाही ना !

दलित - ग्रामीण साहित्याबद्दल प्रस्थापितांची असलेली भूमिका अतिशय हलक्या-फुलक्या स्वरुपात, कुणाचेही मन नं दुखावता इथे मांडली त्याबद्दल हि खालच्या पातळीवर भाष्य ते वाचून तर यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते ! यांचे निदान वाचन कौशल्य कमी कि मुद्दाम ठरवून नेमका उलटा अर्थ काढायचा हे समजायला मार्ग नाही.

एका शेतकऱ्याच्या पोराने, शेतकर्यांबद्दल एखादा प्रखर विचार मांडला तर ह्यांना तिथे फ़क़्त शैली दिसते ! विचारांना झाकण्याचा कित्ती हा केविलवाणा प्रयत्न !

'शिवराय','दलित-ग्रामीण','शेतकरी' या शब्दांचीच ज्यांना मुळात एलर्जी आहे त्यांच्या कडून निराळी अपेक्षा हि नाहीये.

एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल एका विचारवंताने एवढ्या पब्लीकली एवढ्या मोठ्या प्रमाणावर लिखाण केल्याबद्दल त्यांचे मनापसून आभार !

मला "प्रसिद्धीचा छुपा उमेदवार" म्हणून ज्या अनेक शंका ह्यांनी उपस्थित केल्या त्याबद्दल थोडक्यात ;

'नेटके" ला पाठवलेला मेल हा सरळ सरळ अमोल सुरोशे म्हणजे मी स्वतः च म्हणूनच थेट पाठवलाय, तो मेल हि इथे वाचकांसाठी प्रसिद्ध करतो.. तुम्हीच बघा काही चुकल असेल तर !

amol suroshe Mon, Feb 27, 2012 at 3:53 PM
To: wachawe.netake@expressindia.com
मागील पिढी हि वर्तमान पत्र वाचून घडली, इंग्रजी सत्तेविरुद्धाचा असंतोष लेखणी द्वारे उभा राहायचा आता काळ बदललाय ! सध्याची आणि येणारी युवा पिढी त्यांचा जास्त काळ हा या इंटरनेट वर घालवते, विविध विषयांची माहिती एका क्लिक वर उपलब्ध होते.
हीच काळाची पाऊले ओळखून महाराष्ट्रातील प्रत्येक जिवंत कार्यकर्त्याची सामाजिक आणि राजकीय जडण घडण व्हावी, त्याच्या विचारांवर आपल्या सोनेरी इतिहासातील संस्कार व्हावेत या उद्देशाने "मुख्यमंत्री " या ब्लॉग ची स्थापना केली.

महाराष्ट्राच्या तरुण मनातील राजकीय / सामाजिक / ऐतिहासिक प्रश्नांवर अगदी रोख ठोक पाने लिखाण करण्याचा इथे प्रयत्न केला जातो.

थोड्याच कालावधीत मुख्यमंत्री हा ब्लॉग सर्वदूर पसरला याचीच पोच पावती म्हणून स्टार माझा आयोजित "ब्लॉग माझा" या स्पर्धे मध्ये "मुख्यमंत्री" ने सन्मानाचे स्थान मिळवले.

लहानपणी वाटायचा, राज्याचा मुख्यमंत्री सगळेच प्रश्न चुटकी सरशी सोडवत असेल, मुख्यमंत्र्याची खुर्ची नाही मिळाली पण मुख्यमंत्री या ब्लॉग द्वारे या राज्याचे / देशाचे प्रश्न इथे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो.

आपण नक्की बघा www.mukhyamantri.com


अतिशय प्रांजळपणे ब्लॉग बघण्याची केलेली निव्वळ विनंती ह्या मेल मध्ये होती, ब्लॉग वर अगदी ठळक अक्षरात माझे आणि माझ्या सहकाऱ्याचे नाव हि आहे, प्रत्येक लेखाखाली लिहिणाऱ्याचे नाव दिसते असे असतांना मी स्वतःचा उल्लेख करणे टाळतोय असे म्हणून माझ्या साध्या शिफारशी बद्दल एवढ्या शंका उपस्थित करून ह्यांचा नेमका उद्देश्य काय आहे? स्वतःचा मोठे पण सिद्ध करायचा आहे का आम्हाला लहान दाखवण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न.

ब्लॉग उभारतांना उद्देश खूप मोठा होता , आहे आणि तो राहणार हे फ़क़्त इथे नमूद केले ! पण भाषा नम्रतेचीच !

कुठे हि आमच्या ब्लॉग बद्दल छापा ! आमच्या बद्दल लिहाच .. असे नसतांना देखील हि नसती उठाठेव कशासाठी केली हेच नेमके उमगले नव्हते म्हणून एवढा लिहाव लागतंय.

आणि हे इथे मुद्दाम नमूद करतोय कि हा काही आमचा काही तरी लिहून काही तरी चार पैशे कमावण्याचा त्याच्यासारखा धंदा ही नाही, ना हि ह्यांच्यासारखे लिखाणावर आमचे पोट भरते.
खिशातले चार पैसे टाकून आणि शनिवार-रविवार आणि मोकळा वेळ उपयोगात आणून ही विचारांची छोटी का असेना चळवळ चालवतोय आम्ही. मनाला पडणारे प्रश्न मग ते सामाजिक असो व राजकीय ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
आपले विचार कुठेतरी व्यक्त करावेत या साठी हा ब्लॉग .. प्रसिद्धी ,पैसा ह्याची भूक भागवण्यासाठी एवढी निच पातळी आम्ही गाठणार नाहीत.

याच लेखातून आमच्या वयक्तिक प्रोफेशन बद्दल हि बोलण्याचे धाडस या महाशयांनी केलेले आहे त्यांना एवढेच सांगतो ती तुमची पायरी हि नाहीये म्हणून त्या बद्दल बोलण्याची तसदी घेऊ नका!

मान्य आहे आमचे लेख अतिशय साधारण भाषे मध्ये असतात, त्यात व्याकरणाच्या अनेक चुका असतील पण तो तसाच राहणार कारण तोच तर त्याचा आत्मा आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा 'शहाणपणा' किंवा 'खोडसाळपणा' तुमच्या पाशी जपून ठेवा, पुढे नक्की चार पैसे कमावण्यासाठी कामी येईल.

अमोल सुरोशे किंवा प्रकाश पिंपळे यांच्या आडून या ब्लॉग मधल्या विचारांवर काही बोलायचे असेल ना ते समोर समोर थेट बोलले असते तर जास्त आनंद झाला असता !
काही शहाणी लोक लोकसत्ता वाचतात या समजुतीतून मुख्यमंत्रीचा विचार चार लोकां पर्यंत पोहचेल आणि त्या विचारांवर लोक आमच्याशी बोलतील आणि भांडतील अशी अपेक्षा ठेवून तो ब्लॉग तुमच्याकडे पाठवला होता. असो, आणि अशा प्रकारच्या फुटकळ प्रसिद्धीचे मुख्यमंत्री.कॉम कधीच समर्थन करत नाही आणि किंमत ही देत नाही. म्हणून पोटदुखीचे कारण बदलून प्रसिद्धही/स्टंट वगैरे लेबले आम्हाला लावून जो प्रयत्न केला जात आहे तो, साहेब, आमच्यामते तरी सपशेल फसला आहे आणि तुमचाच खरा चेहरा समोर आला आहे.

शेवटी गांधीजींच्या काही ओळी आठवतात

"आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, मग ते तुमच्यावर हसतात, मग ते तुमच्यावर टीका करतात,तुमच्याशी भांडतात आणि मग तुम्ही विजयी होता... विजयी होता ".

अमोल सुरोशे आणि प्रकाश पिंपळे पाटील
मुख्यमंत्री - कार्यकर्ता

Monday, December 12, 2011

मुख्यमंत्री - कार्यकर्ता चे संस्थापक आणि सह-संपादक श्री. प्रकाशराव बा. पिंपळे (पाटील). उक्कलगावकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


महाराष्ट्राच्या ग्रामीण कुशीतून तयार झालेल्या आपल्या तेजस्वी विचारांची धार आणि समाजातील दुष्प्रवृत्ती विरुद्ध तुमच्या शब्दांचे वार दोन्ही हि वृद्धिंगत होवो हीच आई भवानी चरणी प्रार्थना.
आपल्या पुढील सामाजिक, कौटुंबिक आणि राजकीय जीवनास समस्त मुख्यमंत्री आणि जिजाऊ.कॉम परिवारातर्फे लाख लाख शुभेच्छा!

अमोल सुरोशे (नांदापूरकर)

Sunday, December 26, 2010

स्टार माझा : ब्लॉग विजेत्यांचा कौतुक सोहळा !! एक अविस्मरणीय अनुभव.


स्टार माझा ने केलेल्या या कौतुकाबद्दल त्यांचे मनापासून आभार,

राजकीय आणि सामाजिक संस्कारात वाढलेले आम्ही, लहानपणी नेहमी वाटायचा कि समाजासमोर उभ्या असलेल्या प्रत्येक प्रश्नाचे / समस्येचे उत्तर हे "मुख्यमंत्री" देऊ शकतात.. पण जसा मोठा होत गेलो .. तसा मुख्यमंत्री आणि सामान्य कार्यकर्ता यांच्यातील अंतर जाणवायला लागले.. मग ठरवले या दोघांना एकत्र आणायचा.. मनात आलेला प्रत्येक प्रश्न एक कार्यकर्ता म्हणून व्यक्त करायचा.. मग यातूनच "मुख्यमंत्री-कार्यकर्ता" ची निर्मिती झाली. मग मनात असलेले असंख्य प्रश्न मग ते सामाजिक असो, राजकीय असो किंवा ऐतिहासिक यांना एक मुक्त व्यासपीठ मिळाले.. मुख्यमंत्री कार्यकर्ता ब्लॉग.. इंटरनेट वरील स्वातंत्र्याचा आधार घेऊन आपले विचार कुठे तरी जतन करावे आणि ते लोकांपर्यंत पोचवावे या साठी मग मी आणि माझे सहकारी प्रकाश पिंपळे यांची सुरु झाली धडपड.

आपल्याच लिखाणातून आपल्यावर कसे संस्कार होऊ शकतात याचे जिवंत उदाहरण म्हणजे मी आणि प्रकाश. संस्कार या साठी म्हणाल कि कारण पुढे याच संस्कारातून जिजाऊ.कॉम ची संकल्पना उदयास आली. सामान्य माणसाच्या विचाराची कुठे तरी दाखल घेतली जाते याचा हि अनुभव आला. स्टार माझा च्या ब्लॉग माझा या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आणि आपण करीत असलेल्या कार्याची पावतीच मिळाल्या सारखे वाटले.

हि कौतुकाची थाप नक्कीच आम्हाला एक नवे प्रोत्साहन देईल कारण आमचा असा ठाम विश्वास आहे कि ज्या प्रमाणे मागची पिढी हि वर्तमानपत्रे किंवा मासिक वाचून घडली.. त्याच प्रमाणे सध्याची पिढी किंवा येणारी पिढी हि वेब वरील ब्लॉग/ फोरम वाचून घडणार. आपण उद्या असू किंवा नसू.. पण आपले विचार हे जिवंत असले पाहिजेत.. पुढच्या पिढीला हि विचार करायला लावणारे लिखाण मुख्यमंत्री - कार्याकार्ताच्या माध्यमातून सतत चालू ठेवू असा विश्वास आम्हाला आहे.

तमाम वाचकांचे शतश: आभार .. आपल्या प्रतिक्रिया / मत नेहमीच कळवत राहा ..

जय हिंद .. जय महाराष्ट्र

अमोल सुरोशे व प्रकाश पिंपळे
(व जिजाऊ.काम कार्यकर्ते )

Sunday, November 21, 2010

"मुख्यमंत्री" आत्ता थेट स्टार माझा वर- ब्लॉग माझा स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक

मराठी ब्लॉग विश्वात अतिशय मानांकित अशा स्टार माझा च्या ब्लॉग स्पर्धे चा अंतिम निकाल घोषित झाला आहे, सर्व प्रथम अत्यंत आनंदाची बाब म्हणजे, आपला हा "मुख्यमंत्री - कार्यकर्ता " ब्लॉग या स्पर्धे मध्ये आपली विशेष छाप पाडून गेला, ब्लॉग माझा स्पर्धेतील उत्तेजनार्थ ब्लॉग म्हणून आपल्या या ब्लॉग ची निवड झाली आहे, त्या बद्दल स्टार माझा चे, आणि तमाम मुख्यमंत्री वाचकांचे कोटी कोटी धन्यवाद.

तसेच या स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे तसेच सर्व सहभागी स्पर्धकांचे देखील खूप खूप अभिनंदन !

आपल्या सर्वांसाठी हि यादी इथे प्रकाशित करीत आहे, आपण हि यादी स्टार माझा च्या संकेत स्थळावर वर देखील बघू शकता !
http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1669

विजेते ब्लॉग्ज

. रोहन जगताप http://www.2know.in
. प्रभाकर फडणीस www.mymahabharat.blogspot.com
. सुनील तांबे http://moklik.blogspot.com/
. नरेंद्र गोळे http://nvgole.blogspot.com/
. मधुकर रामटेके http://mdramteke.blogspot.com/
. तन्वी अमित देवडे www.sahajach.wordpress.com

उत्तेजनार्थ ब्लॉग्ज

. अनघा निगावेकर http://restiscrime.blogspot.com/
. विशाल कुलकर्णी http://magevalunpahtana.wordpress.com
3. गंगाधर मुटे http://gangadharmute.wordpress.com
. सुहास झेले http://suhasonline.wordpress.com/
. विवेक वसंत तवटे http://vivektavate.blogspot.com
. एकनाथ जनार्दन मराठे http://ejmarathe.blogspot.com
. सौरभ सुरेश वैशंपायन http://sahajsuchalamhanun.blogspot.com
. रोहन कमळाकर चौधरी. http://mazisahyabhramanti.blogspot.com/
. श्रद्धा भोवड www.shabd-pat.blogspot.com
१०. ओंकार सुनील देशमुख http://pune-marathi-blog.blogspot.com/
११. विठ्ठलराजे बबनराव निंबाळकर http://vitthalraje.blogspot.com/
१२. हेरंब ओक http://www.harkatnay.com/
१३. विनायक पंडित http://vinayak-pandit.blogspot.com
१४. मंदार शिंदे http://aisiakshare.blogspot.com
१५. आशिष अरविंद चांदोरकर http://ashishchandorkar.blogspot.com
१६. शंकर पु. देव http://www.shankardeo.blogspot.com/
१७. अमोल सुरोशे http://www.mukhyamantri.blogspot.com/
१८. नचिकेत गद्रे http://gnachiket.wordpress.com
१९. पंकज झरेकर http://www.pankajz.com/
२०. रणजीत शांताराम फरांदे http://zampya.wordpress.com/
२१. श्रेया देवेंद्र रत्नपारखी http://majhimarathi.wordpress.com
२२. जगदीश अशोक भावसार http://chehare.blogspot.com/
२३. मीनल गद्रे. http://www.pankajz.com/
२४. शंतनू देव http://maplechipaane.blogspot.com/
२५. विद्याधर नीलकंठ भिसे. http://thebabaprophet.blogspot.com
२६. प्रवीण कुलकर्णी http://gandhchaphyacha.blogspot.com
२७. नचिकेत कर्वे http://www.muktafale.com
२८. जयश्री अंबासकर http://jayavi.wordpress.com/
२९. कविता दिपक शिंदे http://beautifulblogtemplates.blogspot.com
३०. परेश प्रभु http://www.marathipatrakar.blogspot.com


मुख्यमंत्री मुख्य उद्दिष्ट्य म्हणजे विचारांची एक चळवळ उभी करून सर्व सामाजिक, ऐतिहासिक तथा राजकीय मुद्द्यांवर सर्वाना सामावून घेणे आणि आपले विचार मुक्तपणे प्रकट करने ... तथा सामान्य माणसा मधला तो महाराष्ट्र घडवणारा "कार्यकर्त्ता" सतत जिवंत ठेवणे. या साठी मी आणि माझे सहकारी प्रकाश बा पिंपळे पाटील हे कायम प्रयत्नशील राहू,
या ब्लॉग ला घडवण्यात, उभा करण्यात आमच्या मागे राहणाऱ्या त्या प्रत्येकाचे आभार !
शेवटी सर्वांना
" हि मायभूमी - हि कर्मभूमी हि जन्मभूमी आमुची, महा वंदनीय, अति प्राणप्रिय हि माय मराठी आमुची "
जय महाराष्ट्र - जय जिजाऊ

आपलेच
अमोल सुरोशे आणि प्रकाश पिंपळे

Tuesday, March 9, 2010

प्रवास: कार्यकर्ता ते मुख्यमंत्री कार्यकर्ता !

सदर पोस्ट ही आमच्या ह्या ब्लॉग बद्दल आहे. या ब्लॉगने आम्हाला विचार करायला शिकवले खूप काही छोटे मोठे अनुभव दिले. आपल्याच लिखाणातून आपल्यावर कसे चांगले संस्कार होऊ शकतात याचे आम्ही दोघे म्हणजे अमोल सुरोशे आणि मी ज्वलंत उदाहरण. विचार, लिखाण आणि भाषणे तसं आधी पासूनच करत, पण कधी इतक्या पब्लिक फोरमवर लिहिले नव्हते. २००७ साली शेवटी शेवटी  हा ब्लॉग सुरु केला. ब्लॉग साठी नाव शोधत होतो- 'कार्यकर्ता'. कारण नांदेडला असताना बरेचजन कार्यकर्ता म्हणून बोलावत. कॉलेज मध्ये शिवजयंती, भीम जयंती, शेतकऱ्यांसाठी कृषी प्रज्ञा असे काही उपक्रम करत म्हणून! शिवजयंतीचा वारसा मला अमोल कडूनच मिळाला. अमोला आम्ही सगळे राजे म्हणत आणि आज ही त्याच नावाने  बोलावतो. आम्ही तिथूनच समविचारी! तसं 'कार्यकर्ता' ही  टर्म मला फार आवडायची. एकदा माझ्या मित्राला, विशाल चौहानला, मनवत मध्ये म्हंटला सुद्धा कि मला एक 'कार्यकर्ता' नावाचं मासिक काढायचं (;-)). कारण अस वाटायचं- की सगळे जे राष्ट्रनिर्मिती साठी झटले ते सगळे कार्यकर्तेच. आणि अशा कार्यकर्त्यांचा आपण समजा समोर, युवकांसमोर आदर्श ठेवायला हवा आणि एक कार्यकर्ता निर्मितीचे मध्यम व्हयला हवे. लीडरशिप तर सगळेच शिकवतात पण कार्यकर्तेपण कुणीच नाही! आणि सगळेच नेते होवून करणार काय? असो! तर मग मला ब्लोगस्पॉट कडून 'कार्यकर्ता' हे नाव मिळाले नाही. आता मात्र थोडा हिरमुसलो. मग पुन्हा थोडा लहानपनाकडे गेलो, मित्रांसोबत केलेल्या चर्चा आठवल्या आणि पुन्हा लक्षात आला की प्रत्येक जन कार्यकर्ता असतोच, मग तो नेता का असेना. पण आजकाल तो आपाल्यातील कार्यकर्तापण हरवतो आणि म्हणून संघटनांचा ह्रास होतो आणि राष्ट्रानिर्मितीत बाधा येते. मग 'मुख्यमंत्री' हा शब्द समोर आला. त्याला ही विचारांचा पाठींबा. कारण लहान पाणी वाटायचे सगळेच प्रश्न मुख्यमंत्री सोडवू शकतो. मग मुख्यमंत्रीच का नको. आणि शेवटी 'मुख्यमंत्री' हे नाव (युआरएल) मिळाले.[आता गुगलनेच आम्हाला मुख्यमंत्री करायचे ठरवल्यावर आम्ही तरी का नको म्हणायचे :-) ]. एकंदर ब्लॉग सुरु झाला. वेब २.० मध्ये आमचा यशस्वी प्रवेश [या पूर्वी काही ब्लॉग होते पण चालत नव्हते :-(] आणि एका लोकशाही माध्यमाचे आम्ही भागीदार झालो!
पहिली पोस्ट टाकली (थोडीशी मस्करी भाषेत) पण मनातली खरी तळमळ बाहेर आली. आणि ब्लॉगला पहिली कॉमेंट अमोल राजेंची! (तेंव्हा चुकून ही वाटले नाही की हा प्रवास इतका लांब असणार!) काही लोकांनी याच्या प्रिंट काढून वाचल्या! छान प्रतिसाद पहिल्याच पोस्ट ला! 
पुढे २००८ लाच अमोल राजे ब्लॉगवर पूर्ण सक्रीय झाले. 


                               
ब्लॉगचे जुने हेडर असे होते. [हात दाखवत आहेत ते अमोल राजे (रायगडावरील होळी चौकात उभे आहेत) आणि घडी घालून तो मी. मागे विधान भवन ;-)]


पुढे विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा झाल्या रंगल्या. श्याम वाढेकर, मयूर चिटणीस, सुधाकर पाटील, प्रशांत मिसळ, सुदर्शन जगदाळे असे अनेक मित्र या ब्लॉगवरील राजकीय आणि सामाजिक विषयावरील चर्चांवर भाग घेत होते. आणि वाचक वर्ग ही फार होता त्यांना आणि अजूनही आहे  (गुगल सांगतेच ते!). मग तेंव्हा कळाले अरे  सगळ्यांना एकच वाटतेय पण बोलायचे कुठे आणि कोण बोलू देणार? हे प्रश्न. पण कुणी तरी बोलायला सुरवात केली की मग सगळेच बोलायला लागतात. त्यामुळे आधी काहीच न करण्यापेक्षा कमीत कमी बोलला तरी पाहिजे. कारण वैचारिक बैठक होते आणि प्रगल्भता येते. प्रश्नांचे मूळ कळते. आणि सरळ काही तरी करायलाच लागत असाल तर ते खूपच चांगले. पण जे करत आहात ते सुद्धा बोलायलाच पाहिजे [पण म्हणून फक्त बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी होऊ नये]. आमच्या सगळ्या तरुण मित्रांना एक अनुभवाची शिकवण सांगतो. जे वाटते ते बोला, कारण त्यानेच तुमचे अस्तित्व दिसून येते, कळून येते. कारण एक दिवस मी काही तरी करेल की जगच बदलेल अस म्हणत वाट पाहत बघण्यात काहीच अर्थ नाही. खूप उशीर झालेला असतो! समाज तो पर्यंत तुमच्या अस्तित्वाला नाकारून आपले वैचारिक संस्कार येणाऱ्या समाज मनावर करून मोकळा झालेला असतो. म्हणून बोला आणि लिहा. अमोल नेहमीच म्हणतो 'मागची पिढी वर्तमानपत्र वाचून घडली, ही आणि या पुढच्या पिढ्या नेट सर्फ करून घडतील'. खरं लोकशाही-स्वातंत्र्य मिळवण्याच एक मध्यम म्हणून इंटरनेटचा उपयोग व्हायला हवा. समानता आणि निरपेक्ष माहितीच मध्यम म्हणून या माध्यमाचा उपयोग व्हायला हवा. वेब २.० च तेच उदेष्य. खरी लोकशाही ती इथेच. विकीपेडिया आणि तत्सम माहिती माध्यमात निरपेक्ष माहिती असण्याची शक्यता असते कारण तिच्यावर हजारो लोकांच्या नजरा असतात (ओपन सोर्सचा हाच फायदा) आणि ती सार्वजनिक मालमत्ते सारखी असते. तुम्हाला ती ताकद दिली गेलेली आहे तिचा पूर्ण उपयोग करा नसता उद्या तुमच्या मुलाने काही गुगल सर्च केले आणि त्याला काही चूक माहिती मिळाली तर त्याचे खरे जबाबदार तुम्हीच! तुमचा इतिहासच उद्या तुमच्या वेब वर नसल्याने  चुकीचा मांडला गेला तर आश्चर्य करू नका! म्हणून बोला आणि वेब वर रहा! आज मराठी मुद्दा या विषयावर इंग्रजीत शोधा जास्त अँटी मराठी मिळेल. कारण मराठी माणूस इंटरनेट वर तुलनेने कमी आहे. (आता उगाच कुणी यावर  वाद करू नये). कारण एक निरीक्षण केलय मी, 'मराठी माणूस आपल्या न्युनगंडाला अहंगंडाचे पांघरून घालून गोंजारतो'. असो. तर राजकीय-सामाजिक(२०-८०) विषय चर्चिले गेले आणि ब्लॉग थोडा नियमित लिहिला जाऊ लागला.
अमोल ने मागील वर्षी ब्लॉगला खूप समर्पक रूप दिले. ब्लॉगची थीम आणि हेडर सगळेच त्याच्या विचार सारणी ला साजेशे झाले; ब्लॉगचे नाव 'मुख्यमंत्री कार्यकर्ता' आणि तो प्रतिक सत्तेतील सामान्य माणसाचा असे.  म्हणजेच "मुख्यमंत्री कार्यकर्ता- एक सामान्य माणूस सामान्य माणसाकरिता". हेडर मधील आर. के. लक्ष्मण काकांचा कॉमन मॅन, आधी विचार करताना, मग चालताना आणि मग रूपाच बदलून राष्ट्राच प्रतिक होवून धावतांना, ब्लॉगच्या ध्येयाचे पूर्ण चित्रीकरण करतो. अमोल राजेंच्या ह्या कल्पकतेला त्रिवार प्रणाम [:-)]! शेवटी हा ब्लॉग एक नवे स्वरूप घेवून तयार झाला.
आता अमोल आणि मी,  दोघे ही, वेळ मिळेल तेंव्हा काही ना काही लिहित असतो. ब्लॉग लिहायचा म्हंटल की संध्याकाळची वेळ हीच चांगली आणि शनीवार रवीवार ही चांगला वापरता येतो. आता आम्ही दोघांनी  जिजाऊ.कॉम ही सुरु केले आहे. ते ही चालवण्यात आणि मेंटेन करण्यात शनिवार रविवार जातो. या सगळ्यात खूप जणांचे  सहकार्य लाभले आणि पाठीवर खूप जणांची शबासकी ही पडली. बर वाटतं! मधेच आम्ही पाहुणे ब्लॉगर हा प्रकार सुरु करून सुधाकर पाटील, श्याम वाढेकर आणि रवींद्र पवार यांना ब्लॉगवर आमंत्रित केले, आणि त्यांच्या लिखाणाला ही खूप प्रतिसाद मिळाला. रोहन पाटील ह्यांच्या नटरंग आणि झेंडा ह्या रीव्हीवला मिळालेला  प्रतिसाद तर खूप प्रचंड आहे. आता ई -कार्यकर्ता या नावाने एक अनियतकालिक ही काढत आहोत त्याचा दुसरा अंक इथे मिळेल.
प्रवास खूप झालाय, अनुभव ही खूप आलेत. अजून खूप काही गाठायचय आणि लिहायचय.
वाचकांचा असाच प्रतिसाद मिळत राहो आणि आमच्या लिखाणाच निर्मितीमूल्य वाढत राहो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना. शेवटी वाचकांना ही विनंती- काही करा/बोला, कुठे ही करा/बोला पण काही तरी करा/बोला (चांगल)!
आमचे प्रयत्न तर चालूच आहेत आणि असणार आहेत कारण, आम्हाला माहित नाही आम्ही जग बदलू शकतो की नाही, पण ते बदलण्याची तीव्र इच्छा मात्र आम्ही हृदयात बाळगतो!


 जय महाराष्ट्र!