Showing posts with label loksatta. Show all posts
Showing posts with label loksatta. Show all posts

Thursday, December 19, 2013

लोकसत्तेत मुंजे पुन्हा पिंपळावरून उतरले

जातीय द्वेषातून लिहिलेले हे  लोकसत्तेतील संपादकीय 'लोकसत्तेत मुंजे पुन्हा  पिंपळावरून उतरले' याचेच उदाहरण आहे. हे जातीय मुंजे चान्स भेटला कि उतरून डान्स करतात.

इथाची जातीय व्यवस्था टिकावी म्हणून बाहेरच्यांचे तळवे चाटायला ही कमी करणार नाहीत याचे हे नमुनेदार उदाहरण आहे. वैचारिक भिकारी!
(आदर्श असो किंवा इतर घोटाळे त्यांची न्यायिक चौकशी व्हावीच. पण ते मुद्दे वेगळेच!)

"मीरा शंकर, हरदीप सिंग हे ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी असोत वा माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, यांनाही अमेरिकेने अपमानास्पद वागणूक दिली होती. त्यावेळी आपला राष्ट्रवाद कधी इतका उफाळून आल्याचे दिसले नाही. खोब्रागडेबाईंनी केलेले काम कोणते 'आदर्श' की, आपण त्यांच्या अटकेचा एवढा गहजब करावा?"

पूर्ण : http://www.loksatta.com/sampadkiya-news/us-shameful-behaviour-towards-indian-deputy-consul-general-devyani-khobragade-310542/2/


अजूनही रक्त गरम होत नसेल तर ऐका :

रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो:

Tuesday, March 6, 2012

लोकसत्ताला ही 'पोटदुखी' चा विकार !

अनेक वर्षांची लेखणीची चळवळ अर्ध्या हळकुंडानि पिवळ्या झालेल्या काही विशिष्ट पत्रकारांच्या हाती गेल्यावर त्याचा स्तर कुठल्या पातळीपर्यंत खाली येतो ह्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला आला.
निमित्य होते "लोकसत्ता" मधील 'वाचावे नेट-के' या नवीन सदराचे.
मागे एकदा एक मित्राद्वारे या लोकसत्ताच्या नवीन उपक्रमाची माहिती समजली, निव्वळ 'वरण-भात' लेखांचा भरणा असलेल्या या सदराखाली एखादी विचारांची झणझणीत मेजवानी लोकसत्ताच्या असंख्य वाचकांपर्यंत जाईल अशी त्याने अपेक्षा व्यक्त केली. अतिशय प्रांजळपणे कुठलाही जास्त विचार न करता केवळ ब्लॉग ची यु आर एल थोडक्यात माहितीसह नेटके च्या महाशयांना पाठवली, आणि खरच विसरून सुद्धा गेलो.
काल अचानक लोकसत्ता हाती पडल्यावर या महाशयांनी अमोल 'सुरोशे' , प्रकाश 'पिंपळे-पाटील' आणि मुख्यमंत्री कार्यकर्ता या ब्लॉग चा केलेला पोस्ट-मोंर्टम वाचला आणि अनेक वर्षान पासून ज्या चेहऱ्याचा आम्ही शोध घेत होतो तो सापडला. कारण ही प्रवृत्ती/व्यक्ती आम्हाला या पूर्वी अनेक ठिकाणी भेटली पण आम्ही लक्ष दिले नाही, किंवा त्याची फारशी दाखल घेतली नाही.

अगदी सुरुवातीलाच मोठ्या अविर्भावात 'आम्ही म्हणजे काही ब्लॉग माझा वाले नाहीयेत, उपलब्ध एंट्रय़ांमधूनच विजेते निवडणारं... प्रसिद्धी देणारं ' वैगेरे छापून उरलेला सबंध लेख केवळ आणि केवळ आमच्या ब्लॉग चे, त्या मध्ये व्यक्त केलेल्या विचारांचे आणि ग्रामीण, बहुजन पार्श्वभूमी असणाऱ्या योगदान कर्त्यांची जाणीवपूर्वक आणि निव्वळ आकसापोटी केलेली केलेली निरर्थक ओरड म्हणावी लागेल.

हातात वृत्तपत्राची सत्ता आणि डोक्यात जात आणि अंगावर पुरोगामित्वाच्या शाली पांघरून पिंपळा वर वर्षानुवर्षे बसलेले हे मुंजे. जास्त स्पष्टीकरण नकोच द्यायचे असे वाटते पण, नाही बोलले तर गैरसमज, तो हि हार मानल्याचा.
म्हणून खालील प्रपंच, नसता या 'नेटके' ची किंमत त्याच्या वृत्तपत्रा च्या किमती पेक्षा देखील जास्त नाहीये.

मी म्हणालो आकसापोटी, होय ! कारण ज्या ब्लॉग वर शंभराच्या वर एन्ट्रीज आहेत, २०१० पासून लिखाण आहे त्या ब्लॉग च्या पहिल्या पानावरच्या चार लेखांना वाचून ह्या विचारवंत महाशयांनी ब्लॉग आणि ब्लॉगर्स च्या आडून एका विचार धारेवरच हल्ला चढवला ! हे असले हल्ले आम्ही नेहमीच पचवत आलोय पण आम्हाला "प्रसिद्धीचे छुपे उमेदवार" म्हणणारे स्वतः ला कुठेतरी लपवून हे असले फुटकळ शाब्दिक वार करतात याचीच कीव येते.

आता यांनी ज्या चार लेखांबद्दल आक्षेप नोंदवला, त्या लेखांच्या गाभ्यात विचार होता तो महाराष्ट्राचे आराध्य असलेल्या शिवरायांचा, सर्वांना पोटभर अन्न मिळाव म्हणून राब राब राबणाऱ्या त्या माझ्या शेतकऱ्याचा, आणि साहित्याला गेली कित्येक वर्ष घुबडासारखे चिटकून बसलेल्यांवर जोरदार आसूड ओढणारा.. असा काहीसा विचार आणि नेमके इथेच ह्यांचा पोटशूळ !

शिवजयंतीच्या लेखात शिवरायांची थोरवी सांगण्याला आमचा मोह ठरवून सबंध लेखाला एका क्षणात निष्प्रभ ठरवेले !
महाशय, मुख्यमंत्री ब्लॉग च्या दर्शनी भागावरच अगदी ठळक अक्षरात लिहिले आहे, "आमचे श्रद्धास्थान" डोळे फाडून बघा नीट ! होय सबंध लेखच काय अख्खा ब्लॉग जरी महाराजांची थोरवी गाण्यासाठी वापरला ना तरी ते थोडेच! पण इथे तुमच्या पोटात का दुखतंय ? शिवजयंती च्या दिनी या महाराष्ट्रातील एक सर्व सामान्य तरुण सार्वजनिक शिवजयंतीची मिरवणूक सोडून आत्ता विचार करायला लागला कि काय, हि भीती तर नाही ना !

दलित - ग्रामीण साहित्याबद्दल प्रस्थापितांची असलेली भूमिका अतिशय हलक्या-फुलक्या स्वरुपात, कुणाचेही मन नं दुखावता इथे मांडली त्याबद्दल हि खालच्या पातळीवर भाष्य ते वाचून तर यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते ! यांचे निदान वाचन कौशल्य कमी कि मुद्दाम ठरवून नेमका उलटा अर्थ काढायचा हे समजायला मार्ग नाही.

एका शेतकऱ्याच्या पोराने, शेतकर्यांबद्दल एखादा प्रखर विचार मांडला तर ह्यांना तिथे फ़क़्त शैली दिसते ! विचारांना झाकण्याचा कित्ती हा केविलवाणा प्रयत्न !

'शिवराय','दलित-ग्रामीण','शेतकरी' या शब्दांचीच ज्यांना मुळात एलर्जी आहे त्यांच्या कडून निराळी अपेक्षा हि नाहीये.

एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल एका विचारवंताने एवढ्या पब्लीकली एवढ्या मोठ्या प्रमाणावर लिखाण केल्याबद्दल त्यांचे मनापसून आभार !

मला "प्रसिद्धीचा छुपा उमेदवार" म्हणून ज्या अनेक शंका ह्यांनी उपस्थित केल्या त्याबद्दल थोडक्यात ;

'नेटके" ला पाठवलेला मेल हा सरळ सरळ अमोल सुरोशे म्हणजे मी स्वतः च म्हणूनच थेट पाठवलाय, तो मेल हि इथे वाचकांसाठी प्रसिद्ध करतो.. तुम्हीच बघा काही चुकल असेल तर !

amol suroshe Mon, Feb 27, 2012 at 3:53 PM
To: wachawe.netake@expressindia.com
मागील पिढी हि वर्तमान पत्र वाचून घडली, इंग्रजी सत्तेविरुद्धाचा असंतोष लेखणी द्वारे उभा राहायचा आता काळ बदललाय ! सध्याची आणि येणारी युवा पिढी त्यांचा जास्त काळ हा या इंटरनेट वर घालवते, विविध विषयांची माहिती एका क्लिक वर उपलब्ध होते.
हीच काळाची पाऊले ओळखून महाराष्ट्रातील प्रत्येक जिवंत कार्यकर्त्याची सामाजिक आणि राजकीय जडण घडण व्हावी, त्याच्या विचारांवर आपल्या सोनेरी इतिहासातील संस्कार व्हावेत या उद्देशाने "मुख्यमंत्री " या ब्लॉग ची स्थापना केली.

महाराष्ट्राच्या तरुण मनातील राजकीय / सामाजिक / ऐतिहासिक प्रश्नांवर अगदी रोख ठोक पाने लिखाण करण्याचा इथे प्रयत्न केला जातो.

थोड्याच कालावधीत मुख्यमंत्री हा ब्लॉग सर्वदूर पसरला याचीच पोच पावती म्हणून स्टार माझा आयोजित "ब्लॉग माझा" या स्पर्धे मध्ये "मुख्यमंत्री" ने सन्मानाचे स्थान मिळवले.

लहानपणी वाटायचा, राज्याचा मुख्यमंत्री सगळेच प्रश्न चुटकी सरशी सोडवत असेल, मुख्यमंत्र्याची खुर्ची नाही मिळाली पण मुख्यमंत्री या ब्लॉग द्वारे या राज्याचे / देशाचे प्रश्न इथे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो.

आपण नक्की बघा www.mukhyamantri.com


अतिशय प्रांजळपणे ब्लॉग बघण्याची केलेली निव्वळ विनंती ह्या मेल मध्ये होती, ब्लॉग वर अगदी ठळक अक्षरात माझे आणि माझ्या सहकाऱ्याचे नाव हि आहे, प्रत्येक लेखाखाली लिहिणाऱ्याचे नाव दिसते असे असतांना मी स्वतःचा उल्लेख करणे टाळतोय असे म्हणून माझ्या साध्या शिफारशी बद्दल एवढ्या शंका उपस्थित करून ह्यांचा नेमका उद्देश्य काय आहे? स्वतःचा मोठे पण सिद्ध करायचा आहे का आम्हाला लहान दाखवण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न.

ब्लॉग उभारतांना उद्देश खूप मोठा होता , आहे आणि तो राहणार हे फ़क़्त इथे नमूद केले ! पण भाषा नम्रतेचीच !

कुठे हि आमच्या ब्लॉग बद्दल छापा ! आमच्या बद्दल लिहाच .. असे नसतांना देखील हि नसती उठाठेव कशासाठी केली हेच नेमके उमगले नव्हते म्हणून एवढा लिहाव लागतंय.

आणि हे इथे मुद्दाम नमूद करतोय कि हा काही आमचा काही तरी लिहून काही तरी चार पैशे कमावण्याचा त्याच्यासारखा धंदा ही नाही, ना हि ह्यांच्यासारखे लिखाणावर आमचे पोट भरते.
खिशातले चार पैसे टाकून आणि शनिवार-रविवार आणि मोकळा वेळ उपयोगात आणून ही विचारांची छोटी का असेना चळवळ चालवतोय आम्ही. मनाला पडणारे प्रश्न मग ते सामाजिक असो व राजकीय ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
आपले विचार कुठेतरी व्यक्त करावेत या साठी हा ब्लॉग .. प्रसिद्धी ,पैसा ह्याची भूक भागवण्यासाठी एवढी निच पातळी आम्ही गाठणार नाहीत.

याच लेखातून आमच्या वयक्तिक प्रोफेशन बद्दल हि बोलण्याचे धाडस या महाशयांनी केलेले आहे त्यांना एवढेच सांगतो ती तुमची पायरी हि नाहीये म्हणून त्या बद्दल बोलण्याची तसदी घेऊ नका!

मान्य आहे आमचे लेख अतिशय साधारण भाषे मध्ये असतात, त्यात व्याकरणाच्या अनेक चुका असतील पण तो तसाच राहणार कारण तोच तर त्याचा आत्मा आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा 'शहाणपणा' किंवा 'खोडसाळपणा' तुमच्या पाशी जपून ठेवा, पुढे नक्की चार पैसे कमावण्यासाठी कामी येईल.

अमोल सुरोशे किंवा प्रकाश पिंपळे यांच्या आडून या ब्लॉग मधल्या विचारांवर काही बोलायचे असेल ना ते समोर समोर थेट बोलले असते तर जास्त आनंद झाला असता !
काही शहाणी लोक लोकसत्ता वाचतात या समजुतीतून मुख्यमंत्रीचा विचार चार लोकां पर्यंत पोहचेल आणि त्या विचारांवर लोक आमच्याशी बोलतील आणि भांडतील अशी अपेक्षा ठेवून तो ब्लॉग तुमच्याकडे पाठवला होता. असो, आणि अशा प्रकारच्या फुटकळ प्रसिद्धीचे मुख्यमंत्री.कॉम कधीच समर्थन करत नाही आणि किंमत ही देत नाही. म्हणून पोटदुखीचे कारण बदलून प्रसिद्धही/स्टंट वगैरे लेबले आम्हाला लावून जो प्रयत्न केला जात आहे तो, साहेब, आमच्यामते तरी सपशेल फसला आहे आणि तुमचाच खरा चेहरा समोर आला आहे.

शेवटी गांधीजींच्या काही ओळी आठवतात

"आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, मग ते तुमच्यावर हसतात, मग ते तुमच्यावर टीका करतात,तुमच्याशी भांडतात आणि मग तुम्ही विजयी होता... विजयी होता ".

अमोल सुरोशे आणि प्रकाश पिंपळे पाटील
मुख्यमंत्री - कार्यकर्ता

Monday, March 5, 2012

मुंजे पिंपळा वरून लोकसत्तात उतरले

काल संध्याकाळी असच हातात लोकसत्ता घेतला आणि वाचावे नेटके या संपादकीय पानावरील (पण ७) मुख्यमंत्री.कॉम लिंक वर नजर गेली. वाचायला सुरुवात केली तर अनेक वर्षान पासून ज्या चेहऱ्याचा आम्ही शोध घेत होतो तो सापडला. कारण ही प्रवृत्ती/व्यक्ती आम्हाला या पूर्वी अनेक ठिकाणी भेटली पण आम्ही लक्ष दिले नाही. असो. पण आता हा लोकसत्ता मधील मुख्यमंत्री बद्दलचा लेख वाचून फारच कीव आली यांची. आणि नकळतच डोळ्यासमोर समोर हे खालील चित्र आले.गांधीजींच्या वाक्याचे - "आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, मग ते तुमच्यावर हसतात, मग ते तुमच्याशी भांडतात आणि मग तुम्ही विजयी होता". 



तर घडले असे की एका मित्राने लोकसत्ताच्या वाचावे नेटके या ब्लॉग बद्दलच्या सदरा बद्दल सांगितले आणि मुख्यमंत्री कार्यकर्ता ही पाठवा असे सुचवले. तेंव्हा खालील ई-मेल त्यांना पाठवला 


आणि मग लोकसत्तातील कुणी तरी हे खालील वर्णन म्हणजे 'प्रसिद्धीचा छुपा उमेदवार...' वगैरे मुख्यमंत्रीचे केले.




वरील ई-मेल हा सरळ सरळ अमोल सुरोशे या नावाने पाठवला गेला होता आणि वरील पिक्चर मध्ये 'अमोल सुरोशे' यांचे ठळक अक्षरात एकदम वरती असे नाव 'ब्लॉगर्स' म्हणून आहे. याचा अर्थ ते हा ब्लॉग चालवतात असा होतो आणि कुणाची ही त्यावर नजर पडेलच. तसेच अनेक लेखांच्या खाली ही सरळ सरळ अमोल सुरोशे हे नाव ही आहे. मराठी वाचणारा कुणी ही ते सहज वाचू शकतो. आणि पाठवलेल्या ई-मेल मधील हिरव्या रंगाने स्पष्ट केलेल्या ओळी अमोल सुरोशे या ब्लॉगच्या लेखकांपैकी एक आहेत हे ही ठीक ठीक मराठी वाचणारा आमच्या सारखा खेड्यातला माणूस ही सांगू शकेल राव. बर तिथे नीट समजले नसेल तर ब्लॉग वाचल्यावर  तर कुण्याही शहाण्या माणसाला ते समजेल.

म्हणजे याचा अर्थ  लोकसत्ताच्या त्या लेखाचा प्रॉब्लेम अमोल सुरोशे हे या ब्लॉग चे लेखक आहेत हा नव्हे तर अमोल 'सुरोशे' या ब्लॉग चे लेखक कसे, हा आहे का? ही पोट दुखी वेगळ्याच कारणाने आहे हे अगदी स्पष्ट होते. लोकसत्ता काही शहाणी (?) लोके लिहितात आणि काही शहाणी लोके वाचतात या समजुतीतून मुख्यमंत्रीचा विचार चार लोकां पर्यंत पोहचेल आणि त्या विचारांवर लोक आमच्याशी बोलतील आणि भांडतील अशी अपेक्षा ठेवून तो ब्लॉग त्यांच्याकडे पाठवला होता. असो, आणि अशा प्रकारच्या फुटकळ प्रसिद्धीचे मुख्यमंत्री आणि जिजाऊ.कॉम ही कधीच समर्थन करत नाही आणि किमत ही देत नाही. म्हणून पोटदुखीचे कारण बदलून प्रसिद्धही/स्टंट वगैरे लेबले आम्हाला लावून जो प्रयत्न केला जात आहे तो, साहेब, आमच्यामते तरी सपशेल फसला आहे. दुसरा काही तरी ट्राय करा. हा हा. कारण या असल्या टीकेने किंवा केलेल्या हशा ने फष्ट्रेत होणारांपैकी आम्ही नाहीच. दु:ख याचेच वाटते की अतिशय खालच्या पातळीवर येवून हीन अशा भाषेत लोकसत्ताच्या हुशार महोदयांनी हे लिखाण केलाय आणि हे कमीत कमी लोकसत्ता कडून  तरी अपेक्षित नव्हते. पण जेंव्हा जात आणि विशिष्ट वर्गाचा द्वेष डोळ्यात असते तेंव्हा मात्र हे होतेच. आणि या हुशार लेखकाचे तेच झाले.
हातात वृत्तपत्राची सत्ता आणि डोक्यात जात आणि अंगावर पुरोगामित्वाच्या शाली पांघरून निघालेले हे पिंपळा वरचे मुंजे. जास्त स्पष्टीकरण नको द्यायचे असे वाटते पण, न बोललेले शब्द म्हणजे गैरसमज आणि तो ही हार मानल्याचा म्हणून पुढील प्रपंच. नसता खरच मुख्यमंत्री समोर लोकसत्तातील हा लेख म्हणजे शुल्लक, आमच्यासाठी तरी. कारण आमचे ९०% पेक्षा अधिक वाचक कधीच डायरेक्ट डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू. मुख्यमंत्री.कॉम टाकून ब्लॉग वर येत नाहीत ते येतात गुगल सर्च वरून. त्या मुळे त्या मुंज्याला अपेक्षित जाहिरात बाजी आम्हाला अपेक्षित नाहीच. आणि हा काही आमचा काही तरी लिहून काही तरी चार पैशे कमावण्याचा त्याच्यासारखा धंदा ही नाही. खिशातले चार पैसे टाकून आणि शनिवार-रविवार आणि मोकळा वेळ उपयोगात आणून ही विचारांची छोटी का असेना चळवळ चालवतोय आम्ही. पण त्याच ही आम्हाला स्वतःलाच अप्रूप नाही. कारण मुख्यमंत्री.कॉम आणि जिजाऊ.कॉम  या विचारांसमोर अमोल सुरोशे किंवा प्रकाश पिंपळे कुणीच नाहीत. असो. 

तर आम्ही या मुंजाच्या लेखनाचा निषेध वगैरे नोंदवणार नाहीत, सरळ समाचार घेणार आहोत आणि पोटदुखीची करणे ही दाखवणार आहोत. तर या महोदयांचे म्हणणे आले की 'हा एक अतिशय सामान्य ब्लॉग आहे.' अहो आहेच हा ब्लॉग सामान्य, आणि तो सामान्यांसाठीच आहे. तरी एक हुशार व्यक्ती आमच्या ब्लॉगला सामान्य म्हणते यातही आमचे मोठेपणाच. यात फार आक्षेप नाही. पुढे शिवजयंतीच्या लेखा बद्दल ते म्हणतात की 'शिवरायांबद्दल अधिक लिहल गेलय आणि सध्य प्रश्ना बद्दल कमी.' अरे मुंज्या तो लेख शिवजयंतीचा आहे तिथे शिवरायाच केंद्र असणार. आणि तो लेखच नव्हे तर सगळा ब्लॉग आणि तुमचा सगळा पेपर ही त्या दिवशी शिवरायंचे गीत गाण्यात घालवला तरी ही त्यांचे उपकार फिटणार नाहीत. आणि त्यांच्या पुढे आपण सगळेच निष्प्रभ. तो तर एकच लेख होता. ओके ओके तर पोटदुखी याची का - की शिवजयंतीच्या दिवशी हे लोक 'विचार' करायला लागलेत. कारण समस्त मुंजांना वाटते की या समाज घटकाने फक्त रस्त्यावर फिरावे, धिंगाणा घालावा, आक्रमक व्हावे, ढोल ताशे बदडून जयंत्या साजऱ्या कराव्यात पण 'विचार' करू नये. कारण यांची खरी हार आम्ही विचारा करायला लागण्यात आहे. असो. आता तर अधिक पटीने विचार करणार.
पुढे आम्ही दलित ग्रामीण साहित्याच्या व्याखेची टर उडवली असे त्यांचे म्हणणे आहे आणि पुन्हा हे आमच्या 'हीन अभिरुचीच' उदाहरण अशी जी खालच्या पातळीची भाषा त्या मुंज्याने वापरली आहे ती वाचून त्यांचा पोटशूळ किती मोठा आहे ते कळाले. होय आम्ही ग्रामीण आणि दलित साहित्यिक अभिरुचीहिणच तुमच्या नजरेत. अरे बाबा ती व्याख्या पुन्हा एकदा वाच. ती आमची किंवा आमच्या मित्राची नसून, टेबलाच्या पलीकडचे म्हणजे आम्ही ज्या बाजूला आहोत त्याच्या विरोधी बाजूचे लोक (म्हणजे तुमच्या बाजूचे) दलित आणि ग्रामीण साहित्याकडे कसे बघतात हे सांगणारी आहे. आणि दलित आणि ग्रामीण साहित्याचा एकच शब्दखंड की काय तुमच्या सारख्यांनी एकाच पुस्तकात का केला याच कारण सांगते. तुम्ही दोन्ही साहित्य प्रकारांना थोड्या बहोत प्रकारांने चुकाच समजता. असो, तुम्ही आम्हाला आता पर्यंत अभिरुची हीन म्हणतच आलात, तुमच्यात फार फरक होणार नाही, तुम्ही लुप्त होई पर्यंत तरी. आणि हे ही पोट दुखीचे करणाच ना की शेतकरी, खेड्यातले अमच्यासाखे चार शब्द लिहायला शिकले. हो की नाही. :). असो. 
तुमचे विश्लेषण की काय ते आमच्या शैलीच्या पलीकडे विचारानं पर्यंत जाऊच शकले नाहीत. ते अधिक आवडले असते. चार शिव्या जरी दिल्या असत्या विचारांना तरी. कारण तिथे सरळ मुकाबला करता आला असता विचारांचा. पण इथे तुम्ही शैलीत अडकवून शालीतून जे निशाने साधायचा प्रयत्न करताय तो तुमच्या सारख्या प्रतिभावंताला (?) अशोभनीय आणि तुमचीच संकोचित विचार वृत्ती दाखवतो.
तसा लोकसत्ताचा आम्ही फार आदर करायचो पण जात्यंध आणि वर्गान्ध्या झालेले तुम्ही त्या नावाला एक दिवस काळिमा फसणार आणि तुमच्या मुळे नव्हे तर, गर्वाने सांगतो शिवरायांच्या विचारानं मुळेच, येणारा पुरोगामी महाराष्ट्र तुमच्या सारख्या पुरोगामित्वाच्या शाली पांघर्लेल्यांना कधीच माफ करणार  नाही. कारण तुम्ही अनेकांना दाबून दडपून, हीन लेखून निहीसे करण्याचा प्रयत्न करत आहात, हातात मेडीयाची ताकद असल्याने. पण बहुजन समाज आणि सामान्य माणूस हे सगळं आता तरी समजलाय. आणि तुम्ही चुकीच्यान वर वार केलाय, एकटे आम्ही कधीच नाहीसे होणारण नाहीत! जर आयोग्यच वाटत होता ब्लॉग तर अर्ध पण वाया घालवल नसतं तुम्ही. पण हीनवण्याची संधी सोडली तर ते मुंजे कसले! आम्ही म्हंटला ना तुम्ही आम्हाला बऱ्याच जागी भेटलात. पुण्यात ब्लॉगर्स मिट ला भेटलात. तेथे आमच्या सोबत आलेल्या कांबळे नावाच्या मित्राला त्याचे नाव माहित नसल्याने आनंदाच्या आवेगात जेंव्हा साहित्य संमलेनाच्या अध्यक्षान विषयी काही तरी बातमी आली तेंव्हा म्हणालात 'बरं झाल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कुणी शिंदे, जाधव, कांबळे झाले नाहीत'. त्या साहितीकाच्या विरोधात आम्हाला अस काहीच नाही. पण माननीय मुंजे तुम्ही आम्हाला अनेक ठिकाणी भेटता. तुम्हाला हा आत्मविश्वास झालाय की जिथे तुम्ही असता तिथे आम्ही पोहोचायची लायकीच नाही. पण तो तुमचा निव्वळ गैरसमज आहे. तुमच्या शालीच्या वरून तुम्ही कोण हे अनेकांना दिसले आहे आणि ज्यांना दिसले नाही त्यांना ही एक दिवस दिसेलच. तुम्ही व्यक्ती नाहीत तुम्ही एक प्रवृत्ती आहात - पिंपळावरील मुंजे - नावाची.                             
तुमच्या त्या द्वेष पूर्ण लेखाने आमच फार काही बिघडत नाही पण आमच्या वाचकांचा गैरसमज होऊ नये आणि तुमच्या सारख्यांचे जातीय विचार जास्त पसरून आमच्या या सामजिक क्रांतीच्या प्रवाहाला अडसर होवून नये ही काळजी म्हणून हा प्रपंच. आणि तस ही तुम्ही आता थांबवू शकत नाहीत आम्हाला. आता तर नक्कीच नाही! कारण आधी कधी कधी वाटायचे  आमचे विचार योग्य आहेत का? पण तुमच्या सारख्या कडून विरोध झालाय म्हंटल्यावर तर आत्मविश्वासच आला की नक्कीच आम्ही योग्य दिशेने जातोय. तो फुटकळ जातीय द्वेष पूर्ण लेख लिहून तुमच्या विचारांची किंमत तुम्ही अगदी तुमच्या पेपरच्या रद्दीच्या किमती इतकीच केलीत, अजून जास्त घसरू नका, वेळे आधीच नाहीसे व्हाल. 
आमचे विचार भले ही सामाजिक असोत,पण ते आमचे व्यक्तिगत विचार आहेत. ज्यांना पटतील त्यांनी जरूर वाचावेत, टीका कराव्यात, पण उद्देश्य स्पष्ट असावा. आमच्या या जिजाऊ, शिवराय, फुले, आंबेडकर, तुकडोजी, गाडगेबाबा यांच्या नावाने चालणाऱ्या चळवळीला तुमच्या शुभेच्छा नसल्या तरी ही चालतील. आमचे मोजकेच का असेनात पण  हितचिंतक फार खंबीर आहेत.

जय जिजाऊ!                                                                                                                    जय शिवराय!
जय महाराष्ट्र!

अमोल सुरोशे आणि प्रकाश पिंपळे पाटील
मुख्यमंत्री - कार्यकर्ता