Thursday, January 19, 2012

पाटलांचा केवढा रुबाबा होता नाही पंचक्रोशीत

सुंबरान या चीत्रापातील शेवटचा हा प्रसंग आणि त्यातली पहिली काही वाक्य राष्ट्रा बद्दल आणि येथील शिक्षणाने केलेल्या क्रांती बद्दल खूप काही सांगून जातात. ज्यांनी चित्रपट पहिला नसेल त्यांच्या साठी - आधी तर त्यांनी तो नक्की पहावा; तूर्तास थोडा संदर्भ देतो - मुक्त बर्वे म्हणजे कल्याणी (कल्ली) ही एक मेंढपाळाची मुलगी असते. तिच्या मोठ्या बहिणीच आणि पाटलाच्या मोठ्या मुलाच म्हणजे वसंतच एक मेकांवर खूप प्रेम. पण जात आणि पत अडवी येते. लग्न होत नाही दोन आयुष्य जवळ पास उध्वस्त होतात. पण तिथेच या दोघांच म्हणजे पाटलाच्या लहान्या मुलाच आणि मुक्त बर्वे (कल्ली) जी नंतर शिकून कलेक्टर होते तिचा सहज जमत. पूर्ण चित्रपट भर एकांगी सत्ता शेवटी अशी बदलते आणि त्या बदलाच वर्णन मला तरी वाटते या काहीच वाक्यात खूप समर्पकपणे होते.
‎   
"पाटलांचा केवढा रुबाबा होता नाही पंचक्रोशीत. माझे आजोबा पणजोबा आणि तोच रुबाब तुझ्याकडे किती सहजपणे आला ..... शिक्षण दुसरं काही ही नाही.... हं शिक्षण!"       


No comments:

Post a Comment