Sunday, August 14, 2011

झा चे अयशस्वी 'आरक्षण' आणि यशस्वी 'मनिरक्षण'

खूप चर्चा आणि वादळ उठवले आरक्षण या चित्रपटाने. खरतर त्या चित्रपटाची तितकी लायकी नाही. 'कला' वगैरे जी मला कळत नाही :( सोडली तर चित्रपट भरकटलेला आणि ताळमेळ नसलेला असा फसलेलाच प्रयोग आहे. चित्रपट खरे तर आरक्षण या विषयावर नाहीच! चित्रपटाचा खरा विषय शिक्षणाचा दर्जा असे आहे. पण बेरकी 'झा' साहेबांनी चित्रपटला आरक्षण नाव देऊन उगाच काही माकडांच्या हातात कोलीते दिली आणि उगाच काही चांगल्या लोकांना चिंतेत टाकले. 'माकड' आणि 'चांगली लोके' या मुळे की कारण चित्रपटाला विरोध करणाऱ्या काही जणांचा विरोध हा फक्त राजकीय हेतूने प्रेरित आणि काही जणांचा चांगल्या आणि सामजिक हेतूने प्रेरीत होता. जर आरक्षण चित्रपटाचा मूळ गाभाच नसल्याने त्याला आरक्षण नाव देणे आणि फुकटात प्रसिद्धी मिळवणे हे सगळे ठरवून होते असे वाटते. आणि कदाचित चित्रपट विरोधाला उत्तर न देणे आणि तो त्यांना दाखवण्यास नकार देणे हे ही एक व्यावसायिक समीकरण. आता भीती याचीच उद्या कुणी ही काही ज्वलंत विषय उचलून त्यावर चित्रपट काढायला उठेल. आणि सगळ्यात मोठी भीती याची की त्या विषयाचे गांभीर्य नसणारींनी ते करावे. मराठी चित्रपटांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर काही चित्रपट आले, विषयाचा बराच योग्य गाभा निर्मिती प्रक्रियेतील लोकांना कळला होता असे वाटते. तसे या आरक्षण या चित्रपटात होताच नाही (जरी आरक्षण ह्या चित्रपटाचा विषय नसला तरी). चित्रपटात आरक्षणाचा संदर्भ आहे पण त्याला उलट २ नायकांचे समर्थनच आहे, पण ते ही अमिताभ बच्चन च्या बाबतीत चांगले दाखवता आले असते. एकंदर चित्रपट खिचडी आहे. Looks naming it as Aarakshan is just a commercial strategy, but too cheap.

No comments:

Post a Comment