Tuesday, August 9, 2011

गोळ्या झाडताना आणि त्या झाडण्याचे आदेश देताना यांना बाप कसा आठवला नाही

माज चढलाय शासनाला. केंद्रात आणि राज्यात ही. पुन्हा परकीयांचे राज्य आले असाच वाटत आहे. नसता आपल्याच मायबाप शेतकऱ्यांवर गोळ्या झाडताना आणि त्या झाडण्याचे आदेश देताना यांना बाप कसा आठवला नाही. बहुजन आणि शेतकऱ्यांच सरकार म्हणून घेता त्याची तरी लाज बाळगायला हवी होती. ज्यांना आपला म्हणाव त्यानीचगहाण ठेवली आहे त्यांच्या कडून कसल्या प्रगतीची, पुरोगामी विचारांची अपेक्षा. राजीनामे द्या सगळे आता. आणि याद राखा पुन्हा स्वतःला शेतकऱ्याची औलाद आणि सरकार म्हटलात तर. तशी ही मातीच्या लेकरांनी तुम्हा सगळ्यांना मातीत घालण्याची वेळ आलीच आहे.

सत्तेचा माज! पण महाराष्ट्रातील जनता पुन्हा यांच्याच लोटांगण घेईल असे वाटते. आज पर्यंत कोंग्रेस चे सरकार पुरोगामी वाटायचे. यांच्या शिवाय पर्याय नाही असे वाटायचे. पण आपल्याच शेतकऱ्याचा जीव घेण्याची ही हरामखोरी विश्वास घात करून गेली. पुन्हा जोडीला षंढ विरोधी पक्ष. आता का जनतेनेच निवडणुकांच्या रिंगणात उतरायचे?

No comments:

Post a Comment