Saturday, January 11, 2014

जिजाऊ जयंती २०१४


महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज  हे एक म्हत्वाचे सुवर्ण पान. पण ते पण घडण्यासाठी त्या आधी परिश्रम घेणारे व्यक्तित्व म्हणजे राजमाता जिजाऊ. तसेच महात्मा फुले आणि सावित्री माई बद्दल ही म्हणता येईल. 

भारतीय संस्कृतीत स्त्रियांचे महत्व आणि कार्य सदैव दुय्यमच ठेवले गेलेले आहे. स्त्री मग ती दलित असो कि सवर्ण सदैव दुय्यमच जगत  आलीये किंवा  तिला तसे जगायला भाग पाडले गेलेले आहे. पण सुदैवाने का  होईना जिजाऊ साहेब आणि सावित्री माई यांच्या स्मृती विविध  चळवळीनी जाग्या ठेवल्या. 

आज स्त्री चळवळ ही चार संघटीत स्त्रियांच्या पलीकडे जाऊन प्रत्येक स्त्रीचे काम झालीये, हि चळवळ आज घराघरात पोहाचालीये. पण हि चळवळ त्यांच्या काही  शतका पूर्वीच्या या प्रेरणांना विसरलीये किंवा त्या पासून अनभिज्ञ तरी आहे. आज जिजाऊ आणि सावित्री जयंती विविध स्थरातून साजरी केलीये जातेय. पण स्त्रियांचा सहभाग काही अंशी कमीच आहे. 

या प्रेरणेला पुन्हा समाजाच्या  मुख्य  पटलावर आणणे अतिशय महत्वाचे आहे. कारण त्यात असलेली उर्जा ही प्रचंड आहे. त्या उर्जेच्या साह्याने स्त्री चळवळ आणि स्त्रीचे समाजातील स्थान वाढवायला नक्कीच मदत होईल. 

पुन्हा एकदा  सर्वांना जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!    

आपलेच  कार्यकर्ते,
जिजाऊ.कॉम 
www.jijau.com

No comments:

Post a Comment