Monday, September 14, 2009

धर्मवीर संभाजी महाराज समाधी स्थळ - तुळापुर

ज्यांच्या इतिहासाची पाने उलटताना अंगावर काटा उभा राहतो .. ज्या युग पुरुषाने स्थापन केलेले स्वराज्य आपल्या खांद्यावर ज्यांनी अगदी लीलया पेलले .. वाढवले .. इतिहासामधील एक अदभूत व्यक्तिमत्व, म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.

ज्या माणसाने वर्षे तलवारीवर मरण पेलून धरल, जो माणूस वादळा सारखा ह्या सह्याद्रीच्या दऱ्या खोर्यात घोंगावत राहिला.

इतिहासामध्ये ज्यांची नोंद एक हि लढाई हरलेला राजा म्हणून आहे. १२० लढाया एक हि हार नाही, एक हि तह नाही .. एकाच वेळी - दुष्मनांसोबत निकराची लढाई देणारा राजा म्हणून संभाजी राजांची नोंद इतिहासाने घेतली आहे.

याच संभाजी ने वयाच्या चौदाव्या वर्षी एक संस्कृत मधून ग्रंथ लिहिला.. त्याचे नाव "सात-सतक" मानवी जीवन मुल्यांवर चर्चा करणारा हा महान ग्रंथ त्यांनी लिहिला .. बुध भूषणम् याच संभाजी ने लिहिला पण हे आम्हाला माहित नाही .. आरे गेली कित्येक वर्षे आमच्या या राजाची बदनामी चाललेली आम्ही काय झोपलो आहोत का?

खरा इतिहास जाणून घेण्यासाठी .. छत्रपती संभाजी राजांच्या त्या समाधी स्थळी आपले मस्तक टेकवण्यासाठी .. त्यांच्या अदम्य आणि विराट शक्तीला नमन करण्या साठीच आम्ही सर्व या तुलापुराला गेलो.

याच ठिकाणी स्वकीयांनीच विश्वास घात करून संभाजी महाराजांना औरांजेबाच्या तावडीत पकडून दिले , आणि आतिशय निर्दयपणे त्यांचा छळ करण्यात आला, त्यांचे डोळे काढले गेले, जीभ खेचून काढण्यार आली, नखे ओढून काढली, शरीरावर अमर्याद असे घाव केले .. त्यांचा मृत्यू येई पर्यंत औरंजेब त्यांच्यावर अत्याचार करताच राहिला, पण हा सह्याद्रीचा छावा जरा हि डगमगला नाही .. थोडा हि बिचकला नाही. खर तर जीवावर बेतल्यावर मानसे कसे स्वाभिमान शून्य होतात याची उदाहरणे बरीच आहेत पण संभाजी राजांनी स्वतः ला हा काळिमा लाऊन घेतला नाही, आपल्या शेवटच्या श्वास पर्यंत त्यांनी औरंजेबा पुढे आपली माण झुकवली नाही.
संभाजीराजांचा देह रंगजेबाच्या पाशवी वृत्तीला बळी पडला, पण त्याच बलिदानातून आणि हौतात्म्यातून मराठी राज्य बचावले आणि पुढे याच मराठी माती मधे औरंजेबाचा देह गाडला गेला हे मराठी मनाच्या बांधवांना कधीच विसरता येणार नाही.

आम्ही स्वतः ला भाग्यवान समजतो कि आम्ही त्यांच्या समाधी स्थळाशी असलेली माती आमच्या कपाळी लाऊ शकलो.

सर्वांनी जरूर जावे असे हे ठिकाण ... आपला स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी, खऱ्या संभाजी ची ओळख करून घेण्यासाठी तुळापुर ला एकदा तरी भेट द्यावी।

शेवटी
एकच घोष या उरातून निघतो .............

धर्मवीर संभाजी महाराज कि जय... छत्रपती शिवाजी महाराज कि जय .. राजमाता जिजाऊ माँ साहेब कि जय

आणखी कही फोटो इथे आहेत ....




अमोल सुरोशे

3 comments:

Amar said...

nuktich "SAMBHAJI" hi Vishwas patil yanchi kadambari vachnat aali, tevha pasun Tulapurla jayacha plan kartoy, ya May madhye nakki jain.
Sambhaji rajan baddal khup badnamikarak itihas aapan vatchat aalo aahot, thyanchya badday ativ aadar ani shraddha balgun aapan ya marathi rajas pranam karuya. Jay Sambhaji.

प्रकाश बा. पिंपळे said...

@Amar Nakki raje, nakki jaun ya ani sobat char don janana hi gheun ja!
punya jawalun far jawal ahe.

Nandkumar said...

Khar "SAMBHAJI" Kharach great aahet tyahcya sarakha swabhimani Raja Mahan ahe.Ewada Auragjebne chaal kela pna aapala marathi Dharm kay tyani sodala nahi...
Khar HATS off "SAMBHAJI" Raje tumhala koti koti Pranam Raje....

Post a Comment