Sunday, May 27, 2012

बेगडी चाळवली वाल्यांना विनंती


मित्रहो, कुणी ही कुणाच्या धार्मिक भावना दुखवू नये. जाती विरहित समाज निर्मिती हे आपण सर्वांच एक उदिष्ट आहे. कुणा एका जातीला टार्गेट करून जातीवाद जाणार नसतो आणि जाणार ही नाही. आता कुणाला काय कंटेंट टाकू द्यायचे आणि काय नाही यावर बंधन घालणे मला व्यक्तिगत पटत नाही. कुणाचे काही विचार असतील तर त्या विचारांना विचारांनी उत्तर देऊन किंवा त्याच पद्धतीने उत्तर देवून त्याचा विचार बदलण्याचा प्रयातना करावा, किंवा मग कुणी झोपेचे सोंग घेतल्यास मग त्याकडे दुर्लक्षच करावे. पण एकाद्या राग प्रश्न विचारू नका आणि मांडू नका असा म्हणून कधीच शांत होणार नसतो. तो आज नाही तर उद्या आणि इथे नाही तर अजून कुठे बाहेर पडणारच आहे. तरी एक स्पष्ट करतो जिजाऊ.कॉम हे कुण्या ही जातीय वा धार्मिक संघटनेशी संबंधित नसून, कुण्याही जातीचा द्वेष करणे वा कुण्याही धर्माचा द्वेष करणे या यास लाजीवनी बाबा मानते. अजून थोडा स्पष्टच बोलतो. सध्या काही एका विशिष्ट जातीला. जाऊद्या ना सरळच बोलतो, ब्राम्हणांना शिव्या घालण्यात अग्रेसर म्हणजे काही मराठे आहेत. नीट पहिला तर एकेकाळी ब्राम्हण जातीव्यवस्थेचे मार्गदर्शक होते आणि त्याच व्यवस्थेचे संरक्षक महाराष्ट्रात मराठे होते. आजही जातीय तंट्यात गोर गरिबांची घरे जाळण्यात आणि त्यांच्या लेकी बळींना अपमानित करण्यात महराष्ट्रात तरी अग्रेसर मराठेच आहेत. ज्या प्रकारे आरएसएस १०० ठीक चांगले काम करेल पण एकाद्या गावात जावून दलितांना मंदिरात प्रवेश करवून द्यावा (काढ्याने तो कधीच दिलेला आहे, पण समाजाने दिल्या का नाही ते बघा एकदा) किंवा त्या पेक्षा ही चांगले ग्राम व्यवस्थेत त्यांना मनाची पदे देवून अंतर जातीय विवाहाची चळवळ निर्माण करावी. ते नाहीच जमले तर कमीत कमी कधी जातीय भांडणे झालीच एकाद्या गावात तर गायब तरी राहू नये, असे कधी ही करत नाही. कमीत कमी मला किंवा माझ्या अनेक मित्रांना तरी दिसलेली नाही. तसेच या नव्या जातीय संघटनांचे. अनेक ठिकाणी मराठा समाजातील लोक जातोय द्वेषातून भांडणे करतात आणि तिथे या संघटना पब्लिकली समजवून सांगायला कधी जाणार नाहीत किंवा जात ही नाहीत. जातीविरहित समाज फक्त पुस्तकात सांगून तयार होताच नसतो आणि होणार ही नाही.
त्यामुळे बेगडी जातीय विरहित समाजाचे नेतृत्व आहोत असे दाखवून पुन्हा नव्या पाटीलक्या आणि देशमुख्या बळकावण्या पलीकडे अनेकांच इतर काही उदेश्य दिसत नाही. अशा हे बेगडी चाळवली वाल्यांना कळकळीची विनंती राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी किंवा मग संभाजी महाराजाच्या नावाने तरी ही सगळी कामे करून नयेत. बाकी समाज सुज्ञ आहे.
जय जिजाऊ!
www.jijau.com

 
  

No comments:

Post a Comment