Sunday, July 31, 2011

आरक्षणाचे राजकारण आणि व्यवसाय

आरक्षणाचे राजकारण आणि व्यवसाय केला जातोय. प्रकाश झा ही काही धुतल्या तांदळाचा नाही आणि भुजबळ साहेब ही काही बासमती नाहीत. इतरांच्या आरक्षणाला विरोध आणि स्वतःची घर भरतांना आंदो, असा यांचा भाव! असो. पण या मुले आपण सर्रास आरक्षणाला त्याचे सामजिक फायदे अभ्यासल्याशिवाय विरोध ही करू नये. आणि असतीलच काही खूप मोठे विरोध आणि चुका आरक्षण प्रक्रियेत तर त्यांचा विरोध करावा तो ही योग्य मार्गाने, अर्वाच्य भाषेत जातीय शब्द उच्चारून नको (संधर्भ: वरील काही कॉमेंट्स ). कारण या मार्गाच्या विरोधाने बदल तर घडताच नाही उलट खुल्या वर्गातील लोकांचे म्हणणे ऐकून घ्यायला कुणी येत नाही. आरक्षण ही भारतासारख्या विविधतेने नटलेल्या आणि जातीने बरबटलेल्या राष्ट्रासाठी एक क्रांती आहे. मनापासून विचार करा ह्या देशात ५०% पेक्षा अधिक लोक हे काही उच्च वर्नियात मोडत नाहीत आणि दुसरीकडे सत्तेत, शासनात आणि अनेक ठिकाणी अनेक क्षेत्रात ह्या समजतील लोकांचा वाटा तेंव्हाच नाही तर आता सुद्धा ३०% च्या वर नसेल. याचा कारण फक्त आर्थिक नाही ते सामाजिक आहे. आता राजकारणाचे उदाहरण घेऊ महाराष्ट्रात बहुसंख्य राजकारणी मराठाच का? ब्राम्हण का नाहीत, माळी, लोहार,दलित का नाहीत. उतार आर्थिक नाही तर सामाजिक (कौटुंबिक) आहे. अहो भारतात गांधी नाव असलं तरी तुमच्या राजकारणाची जन्मताच सुरुवात खाजादारकी पासून होते! इतका महत्व आहे आडनावाला. (कदाचित शेक्सपियर कदाचित भारताकडे पाहूनच 'नावात काय आहे' म्हणाला 'आडनावात काय आहे' अस नाही म्हणाला ;)). Being the new breed of pillars to this nation we should be more rational on this front. Our interpretation of the policies should be more of the social and broad nature than the personal one. Hope we all make it to the real change.

जय जिजाऊ http://www.jijau.com/


[फेसबुक वरील एका चर्चेत]

1 comment:

amol gade patil said...

aamhi marathe ghatnekade bhikh aarakhanachi bhikh magnar nahi jijauchi shikvan ekch , swatache rajya shthapan kara , jai jijau jai shivaji

Post a Comment