Monday, October 3, 2016

'मोदी-विरोध' आणि 'देश-विरोध' यातला फरक

असंख्य अशा स्वातंत्रता सैनिकांच्या बलिदानाने मिळालेलं हे स्वातंत्ऱ्य. कालच या स्वातंत्र्याच्या शिखराला ज्यांनी कळस चढवला त्या महात्मा गांधींची जयंती झाली. निर्विवाद गांधीजींशिवाय असंख्य अशा अनेकांचा या स्वातंत्र्य चळवळीत भाग होता. असो. पण त्या सगळ्या आहुत्यांनंतर स्वातंत्र्य भारत आता किती काळ स्वातंत्र्य आणि अखंड राहील याची सगळ्यांनाच तेंव्हा चिंता होती. मधल्या काही काळात ती चिंता फौल होती असं म्हणण्याजोगी परिस्थिती होती. पण अशात, पुन्हा दुही माजते कि काय, याची चिंता नाही वाटल्यास नवल.

काही धर्मांध मुस्लिमांनी त्या काळी पाकिस्तान वेगळा मागितला आणि घेतलाही. समजूतदार इथे राहिले. धर्मांध सगळ्या धर्मात असतात. पाकिस्तानचं पुढे काय झालं हे सगळ्या जगाला माहित आहे. अमेरिकेच्या फंडिंगवर सरकार आणि आखातांच्या फंडिंगवर अतिरेकी जगतायेत या पलीकडे त्यांची प्रगती नाही. आणि होणारही नाही. इतक्या आत्मविश्वासाची अनेक करणे आहेत. शोध घ्यावीशी वाटणारांना सापडतील.

अशातच झालेल्या पाकिस्तानी अतिरेकी हल्ल्यांना भारताने, भारताच्याच पाकिस्तानने बळकावलेल्या जमिनीवर जाऊन कारवाई केली. अशा कारवाया होत राहिल्या पाहिजेत. आणि त्या आधीपासून गरजेनुसार होतही आलेल्या आहेत. याने त्या भागातून पाकिस्तान स्पॉन्सर्ड टेररिजम आटोक्यात आणायला मदत होईल.

युद्ध आणि हिंसा हे कुठल्याच प्रश्नांची उत्तरे नसतात. पण ते कॉन्फ्लिक्ट मध्ये असणाऱ्या दोन्ही बाजूंना कळायला हवं. नसता गरजेनुसार हिंसा आणि युद्ध नक्कीच जस्टिफाईड आहे.  

तर, राहिला मुद्दा भारतीयांनी याचं अंतर्गत राजकारण करण्याचा. देश कधीही सगळ्यात आधी असायला हवा. कारण देश आहे तर तुम्ही आहात आणि सीमाविरहित जग निर्माण होईस्तर, सीमा आहेत तरच देश आहे. नस्ता उद्या सीमेवरचा गोळीबार आपल्या नाकासमोर झाल्यावर आपल्याला जाग येऊन फायदा नाही. म्हणून, आर्मी लोक नियुक्त सरकारच्या सहमतीने जे करेल ते तुम्ही मी निर्विवाद मान्य करायला हवं. त्याचा उहा-पोह झालाच तर तो संवेदनशीलपणे आणि आततायीपणा न करता व्हावा.

एका गोष्टीचे अत्यंत हसू आले. 'सर्जिकल स्ट्राईक' चे फोटोज काही 'भारतात राहणाऱ्यांचीच' मागितले म्हणे. तर मित्रहो मान्य आहे 'मोदी' या व्यक्तीवर अनेकांचा विश्वास नाही. पण 'मोदी' म्हणजे 'देश' नाही. म्हणून 'मोदी-विरोध' आणि 'देश-विरोध' यातला फरक समजून प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात. आणि मोदी भक्त्तांनी ही सरळ सरळ मोदींनीच सीमेवर जाऊन ५६ इंचांची आडवी धरली या अविर्भावात 'सोशल मेडिया सेल'चे "२०१४ का वोट काम आया, १५ लाख वसूल" हे असले फालतू मेसेजेस फरवर्ड करू नये. 

सीमेवरची सुरक्षा तुमच्या-माझ्या सारख्या बोटे चालवानरांमुळे होत नाही किंवा बॉर्डर सेक्युरिटी स्ट्रॅटेजी सोशल मीडिया स्ट्रॅटेजीसारखी उथळ नसते. म्हणून ती आपल्याला सहजा सहजी कळणार नाही ;). आणि मुळात ती तुमच्या माझ्या भल्यासाठीच आहे. त्या कारणानेच तुम्ही 'न्यूज-रूम' मध्ये आणि काही जण 'वॉश रूम' मध्ये आपले अत्यंत महत्वपूर्ण विचार व्यक्त करू शकता.

जय हिंद.

No comments:

Post a Comment