Tuesday, April 30, 2013

जय महाराष्ट्र !!!!!!!

महाराष्ट्राला महान राष्ट्र म्हणून घडवणाऱ्या प्रत्येकाला आज च्या या 

दिवशी वंदन !!!



गौरवशाली, ऐतिहासिक महाराष्ट्राच्या ५ ४  व्या महाराष्ट्र दिनी सर्वांना 

हार्दिक शुभेच्छा !!!

Sunday, April 14, 2013

आनंद याचाच आहे कि वेळेत बाबासाहेब कळले!

समानतेच्या दीपाला, जाती आणि धर्मात विभागलेल्या राष्ट्राला 'भारत' हीच एक ओळख देणाराला आणि इथून पुढे घडणाऱ्या क्रांतीची मशाल अनेक वर्षे आधीच पेटवून जाणाऱ्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम. अस म्हणून बाबासाहेबंवरील एका लेखाची एक दोन वर्षान पूर्वी सुरवात केली होती. म्हणून आजच्या भीम जयंतीच्या शुभेच्यांचे टायटल हि तेच. यातला सगळ्यात महत्वाचा वाक्य:  "इथून पुढे घडणाऱ्या क्रांतीची मशाल अनेक वर्षे आधीच पेटवून जाणाऱ्या....". खरच इथून पुढचा काळ हा बाबासाहेबांच्या विचाराचा आहे. आज अनेक पुरोगामी जे आर्थिक आणि सामाजिक विचार मांडत आहेत ते अनेक वर्षा पूर्वी बाबासाहेबांनी मांडून ठेवले. चूक आपलीच झाली कि आपण त्यांना इतकी वर्ष झाकूनच ठेवले. तर, ग्लोबलाइज्ड जगात आपण सध्या जो स्टेट कंट्रोल असावा असा म्हणत आहोत तेच बाबासाहेब अनेक वर्षान पूर्वी म्हणून गेले. मुंबईतील पावसा सारख्या येणाऱ्या ग्लोबल रीसेशनला हे एक चांगले उत्तर राहील. सध्या पहिले गेल्यास बाबासाहेबांचे साम्यावादशी पटले नाही. पण ते अनिर्बंध भांडवलशाहीचे सुधा समर्थक नव्हते. मुळात त्यांचा पिंडच समाजवाद्याचा. पण त्यात हि त्यांनी हवे तिथे बदल स्वीकारून पैसा आणि व्यापार हे समाज उत्थानाचे मोठे साधन आहे हे दाखवून दिले. म्हणूनच तर त्यांच्या 'स्टेट कंट्रोलच्या' भाषेने ते समाजवादी वाटतात आणि कधी "प्रोब्लेम ऑफ रुपी..." मुळे ते फ्री मार्केटचे समर्थक वाटत. पण माझ्या सारख्या सामान्याला या सगळ्यांच्या वादाच्या पलीकडे जाऊन बाबासाहेब आपले वाटत. खरच त्यांच्या चळवळीचा हेतू फक्त एक किंवा दोन समाजाची प्रगती नव्हताच, किंवा फक्त समाजवाद किंवा भांवालशाही हा हि नव्हता. प्रत्येक भारतीयाच जीवन कस सुखकर होईल याच हेतूने त्यांची चळवळ आयुष्यभर चालत राहिली. आता त्याच्या चळवळीचा हेतू आतापर्यंत झाकून ठेवला गेला या बद्दल मी रडणार नाही. कारण आनंद याचाच आहे कि वेळेत बाबासाहेब कळले!
जय भीम! जय महाराष्ट्र!

Saturday, April 13, 2013

राष्ट्राच्या प्रगतीचे पहिल्या फळीतील शिलेदार : बाबासाहेब आंबेडकर



भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
१४ एप्रिल १८९१ -- ६ डिसेंबर १९५६

समानतेच्या दीपाला, जाती आणि धर्मात विभागलेल्या राष्ट्राला 'भारत' हीच एक ओळख देणाराला आणि इथून पुढे घडणाऱ्या क्रांतीची मशाल अनेक वर्षे आधीच पेटवून जाणाऱ्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम. भारताच्या प्रगतीला सर्व समावेशक स्वरूप देवून गतिमान करणाऱ्या महापुरुषाची आज जयंती.   
                            भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

जय भीम. जय हिंद.

Wednesday, April 10, 2013

११ एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती

आज ११ एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती.     
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्य हार्दिक शुभेच्छा 


खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले , भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य, भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती ...
सामान्य माणसांसाठी .. दुर्लक्षित समाजासाठी लढणारे एक असामान्य व्यक्तिमत्व. केवळ आपल्या कर्माने ज्यांनी महात्मा हि पदवी मिळवली असे महात्मा ज्योतिबा फुले.

याच महात्म्याने रायगडावर शिवरायांच्या समाधीचा शोध लावला, त्या समाधीची रीतसर पूजा करून शिव जयंतीची सुरुवात केली. हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना "कुळवाडी भूषण" म्हणून संबोधिले . त्यांनी "शेतकऱ्यांचा आसूड " या पुस्तकातून आमच्या बळीराजाचा आवाज उठवला. समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा यांच्या विरुद्ध त्यांनी उभारलेला लढा हा खरोखरच जगासाठी एक प्रेरणा आहे. शिक्षणाची गंगा सामान्य अति-सामन्यांच्या पर्यंत पोचवणारा हा भगीरथ .. ज्याने केवळ आणि केवळ सत्याची कास धरून आपल्या या महाराष्ट्राचा वैचारिक, सामाजिक कायापालट केला.

सामाजिक समतेचा संदेश देणारे आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खर खुरा स्वतंत्र मिळवून देणारा हा महात्मा.

ज्यांचा वैचारिक वारसा घेउन अगदी कणखर पणे आपली वाटचाल करणार्या महाराष्ट्राचा त्यांच्या त्या अफाट कर्तुत्वास कोटी कोटी प्रणाम! आणि महाराष्ट्रातील तरुण पिढीकडून त्यांचा वसा चालवला जावा ही अपेक्षा!

जय हिंद .. जय महाराष्ट्र ....!

Tuesday, April 9, 2013

शिक्षण क्षेत्रात संधी

नौकरीची संधी


अधिक माहिती : http://mkf.org.in/

Sunday, April 7, 2013

पुढच्या इलेक्शनला लोक मुतणारच आहेत ... पण तुमच्यावर

अजित पवारांनी केलेले वक्तव्य हे शरद पवारांच्या गोटात घडलेल्या व्यक्तीचे नाहीच. अतिशय असंवेदनशील आणि बेजबाबदार असे पाणी टंचाई आणि भारनियमन याबद्दल केलेले वक्तव्य आहे. तुम्हाला एक फुकटचा सल्ला. आता तुम्ही सुद्धा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी एक ऑर्केस्ट्रा काढा.


आजपर्यंत जनता सहन करत आहेच पण अशीच बेजजबाबदारी आणि उथळपण हे सरकार करत राहिले तर सेनेचे दिवस परत यायला वेळ लागणार नाही. असो. आता कदाचित बदल हवाच आहे. सत्ताधर्यांच्या दुसर्या टर्मचा उन्माद खरच राग आणणारा आहे. सुजान जनता यांच्या मुताचे ओघळ घरात येण्या पूर्वीच यांना सत्तेतून बाजूला करेल ही अपेक्षा.