Thursday, November 24, 2011

चांगल्या लोकांना राजकारणाच्या बाहेर पाठवून पुन्हा लोकशाहीच्या नावाने शिमगा

देश आणि लोकशाही कुठे चालली आहे. अहिंसा आणि बौधीकातेची माळा जपणारे असा करायला लागल्यावर देश अजून कुठेच जाणार नाही. महागाई असो किंवा इतर काहीही हे मात्र कुठे ही मान्य नाही. कोण कसा वागते ते समजणे जनतेला जास्त अवघड नाही. आणि अण्णांनी ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिली ते सुध्धा खूप खूप चुकीचे आहे. आता अन्नाच्या दोन प्रतिक्रिया म्हणजे जनतेला अण्णांनी मुर्खातच काढले की किंवा दुध खुळे समजले. 
देश एक दिवस चांगल्या लोकांना राजकारणाच्या बाहेर पाठवून पुन्हा लोकशाहीच्या नावाने शिमगा करेल आणि हुकुमशाहीला उद्या मार्ग मोकळा. ही भीती स्पष्ट पाने दाखवता येत नाही पण मनपासून वाटते साजुत्सर नागरिकांनी यावर विचार करावा.
स्वतःला शिकलेले म्हणणारे आणि मेणबत्त्या घेवून राष्ट्रवाद करायला निघणारे जसे काय या देशात राहातच नाहीत अशा प्रकारे वागत आहेत. उद्या देश चालवणे ही आउटसोर्स करतील ही मंडळी. आधीच गरीब आणि पिचलेली जनता खूप काही सहन करत आहे, गरीब श्रीमंत दरी वाढत आहे आणि त्यात पुन्हा राजकारण्यान बद्दल इतका अनादर म्हणजे लोकशाही वरचा विश्वास उडणे आहे आणि हुकुमशाहीला आमंत्रण आहे. आता हुकुम शाही कुणा पैश वाल्यांची आणि जात धर्माची येईल ते ही थोडा सुजाण नागरिक विचार करतील तर खूप चांगले. 
एकंदर असा दिसत आहे की कामे करा तरी ही अनादर आणि नका करू तरी ही अनादर. आता ज्यांना पोटातून आनंद झाला आहे ते उद्या भविष्यातला भारत पाहून रडतील असाच वाटतेय. असो असा ही जनतेने डोळे आणि विचार करणे बंद केले आहे.      
आणि  हे सोली सोराबजी भांडारकर, पुणे, मादर. जेम्स लेन बद्दल का बोलत आहेत? काय झालाय यांना. काय गोधळ आहे हा? किती वेळ चर्चाच करणार का? हे मान्य आहे का आता?  तिथे तुम्हाला चर्चा हवी आणि इथे जनता अस करतच असते म्हणे. अरे काय हे .......

No comments:

Post a Comment