Tuesday, July 20, 2010

पंढरपूर : आषाढी एकादशी

भक्तीचा उत्सव, भक्त आणि ईश्वर यांचा अनोखा मेळा म्हणजे पंढरपूरची आषाढी एकादशी यात्रा.

लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरची वाट धरता, विठ्ठल विठ्ठल च्या नामस्मरणाने अवघे पंढरपूर दणाणून जाते, जात, धर्म, भाषा, द्वेष, मत्सर या पलीकडे जाऊन सर्व लोक एकमेकांना "माउली-माउली" ची हाक देतात, हा अनोखा मेळावा बघणार्यांचे खरच पारणे फिटतात.

त्या तमाम वारकऱ्यांना आणि सर्व भक्तांना आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा !

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात !!
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें !!

- जिजाऊ.कॉम

Wednesday, July 14, 2010

छत्रपती संभाजी महाराज

ज्यांच्या इतिहासाची पाने उलटताना अंगावर काटा उभा राहतो .. ज्या युग पुरुषाने स्थापन केलेले स्वराज्य आपल्या खांद्यावर ज्यांनी अगदी लीलया पेलले .. वाढवले .. इतिहासामधील एक अदभूत व्यक्तिमत्व, म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.
ज्या माणसाने वर्षे तलवारीवर मरण पेलून धरल, जो माणूस वादळा सारखा ह्या सह्याद्रीच्या दऱ्या खोर्यात घोंगावत राहिला.
इतिहासामध्ये ज्यांची नोंद एक हि लढाई हरलेला राजा म्हणून आहे. १२० लढाया एक हि हार नाही, एक हि तह नाही .. एकाच वेळी - दुष्मनांसोबत निकराची लढाई देणारा राजा म्हणून संभाजी राजांची नोंद इतिहासाने घेतली
शिवरायांनी आरमाराचे महत्व ओळखले होते, अतिशय दूरदर्शी पणाने त्यांनी सागरी शक्तीचे महत्व ओळखून आरमारही स्थापना केली होती, पुढे याच सागरी आरमाराला चौपटीने वाढवण्याचे काम संभाजी महाराजांनी केले. चंगेखान नावाच्या अरबी सरदार कडून नाव नवीन युद्ध नौका तयार करण्याचे तंत्र त्यांनी अवगत केले, मराठा आरमार अतिशय प्रबळ आणि प्रभावी बनवले.

टोपीकर, आदिलशहा, गोव्याचे पोर्तुगीज , निजामशाही, मुगल अशा अनेक शत्रूंची एकाच वेळी लढा देण्याचे काम त्यांनी केले. संभाजी राजे स्वतः रणांगणात उतरत असत. त्यांच्या साडे आठ वर्षाच्या कालावधी मध्ये एक हि बंड झाले नाही . तमाम मराठा समाज त्यांच्या मागे एक दिलाने उभा राहिला. शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य चौपटीने वाढवण्याचे कार्य संभाजी राजांनी केले.

याच संभाजी ने वयाच्या चौदाव्या वर्षी एक संस्कृत मधून ग्रंथ लिहिला.. त्याचे नाव "सात-सतक" मानवी जीवन मुल्यांवर चर्चा करणारा हा महान ग्रंथ त्यांनी लिहिला .. बुध भूषणम् याच संभाजी ने लिहिला पण हे आम्हाला माहित नाही . भाषेचे प्रचंड प्रभुत्व असलेला हा राजा.

खुद्द औरंजेब दक्खन स्वारीवर आलेला असतांना त्या पापी औरंग्याला तब्बल ८ वर्षे सीमेवर हात चोळीत बसावयास भाग पाडीले, त्याला १ किल्ला सुध्दा जिंकता येऊ नये यातच संभाजी राजांचे राजकारणी, रणधुरंधर व्यक्तीमत्व सिध्द होते.केवळ एका जहागिरीपोटी नाराज झालेल्या गणोजी शिर्के नामक हरामजाद्याने स्वतःच्या बहिणीच्या कुंकुवाचा लिलाव मांडत मोगली सैन्याच्या तोंडात महाराजांच्या रुपाने आयता घास दिला.
स्वकीयांनीच विश्वास घात करून संभाजी महाराजांना औरांजेबाच्या तावडीत पकडून दिले , आणि आतिशय निर्दयपणे त्यांचा छळ करण्यात आला, त्यांचे डोळे काढले गेले, जीभ खेचून काढण्यार आली, नखे ओढून काढली, शरीरावर अमर्याद असे घाव केले .. त्यांचा मृत्यू येई पर्यंत औरंजेब त्यांच्यावर अत्याचार करताच राहिला, पण हा सह्याद्रीचा छावा जरा हि डगमगला नाही .. थोडा हि बिचकला नाही. खर तर जीवावर बेतल्यावर मानसे कसे स्वाभिमान शून्य होतात याची उदाहरणे बरीच आहेत पण संभाजी राजांनी स्वतः ला हा काळिमा लाऊन घेतला नाही, आपल्या शेवटच्या श्वास पर्यंत त्यांनी औरंजेबा पुढे आपली माण झुकवली नाही.

संभाजीराजांचा देह रंगजेबाच्या पाशवी वृत्तीला बळी पडला, पण त्याच बलिदानातून आणि हौतात्म्यातून मराठी राज्य बचावले आणि पुढे याच मराठी माती मधे औरंजेबाचा देह गाडला गेला हे मराठी मनाच्या बांधवांना कधीच विसरता येणार नाही.

याच संभाजीचा चारित्र्य हनन करण्याचे काम आमच्याच काही हरामखोर बखरकारांनी आणि इतिहास करांनी केले आहे, खरा संभाजी कधी लोकांसमोर येऊ दिलाच नाही. पण सूर्याचा प्रकाश किती काळ लपवून ठेवणार एक दिवस तरी आमच्या तमाम मराठी लोकांच्या डोक्या मध्ये हा उजेड पडल्याशिवाय राहणार नाही. सूर्य सारख्या तेजस्वी आणि ओजस्वी शिवाजी राजांचा राजांचा पुत्र म्हणजे सिंहाचा छावाच. आणि ज्या जिजाऊ ने शिवबा घडवला त्याच जीजौंच्या संस्कारात वाढलेला शंभू बाळ कसा काय रंगेल ठरवला जाऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराज हे या स्वराज्यचे संस्थापक तर याच महाराष्ट्राचा दुसरा छत्रपती म्हणजेच संभाजी महाराज हे या स्वराज्याचे संरक्षक म्हणून होते.

उगवणाऱ्या सूर्याचा प्रकाश जसा घरा घरा पर्यंत पोचतो त्याच प्रमाणे माझ्या या शूर शंभू राजांचा इतिहास आमच्या घरा घरा पर्यंत पोचावा असे आवाहन आपल्याला जिजाऊ.कॉम परिवार तर्फे करण्यात येत आहे.

जय जिजाऊ .. जय शिवराय .. जय संभाजी

अजून नवे येथे वाचा !

Tuesday, July 13, 2010

खरच लाज वाटत नाही का आम्हाला मराठी असल्याची ?

हे विचारण्याचे कारण म्हणजे, ६० वर्षापूर्वी महाराष्ट्राला दिलेली एक कठोर जखम महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद प्रश्नावरून पुन्हा एकदा ताजी झाली.

साडे नऊ कोटी मराठी जनतेचा हा माझा महाराष्ट्र! खरच अआपल्या पैकी कित्ती लोकांना या जखमेची जाणीव राहिली आहे. महाराष्ट्र सीमेवरील बेळगाव, कारवर सह इतर ८६५ गावातील माझे मराठी बांधव गेली ६० वर्षे या स्वतंत्र भारता मध्ये राहून गुलामगिरीचे आणि अन्यायाचे जीवन जगत आहेत. दिवसा ढवळ्या तेथील मराठी जणांवर तेथील कन्नडी पोलीस (नव्हे खाकी वर्दीतले गुंडेच ते ) लाठ्या काठ्यांनी बडवत आहेत. ६० वर्षे झाली ८० पेक्षा जास्त हुतात्मे हजारो लोकांचे रक्त सांडून देखील आपल्याच हक्कासाठी आपल्याला रोज रडावं लागत आहे. त्या साठी भिक मागावी लागत आहे. हा भिकारडे पण का आला ? याला कारण म्हणजे आमचे भिकारचोट राजकीय नेते? दिवस रात्र एकमेकांच्या विरोधात बोलणे हाच यांचा धर्म, पण महाराष्ट्राच्या या गंभीर प्रश्न बाबत कधीच कोणी एकत्र आले नाही. कधी कधी वाटते यांना हा प्रश्न सोडवायचा आहे कि नाही . कारण जो भाजप महाराष्ट्रामध्ये बेळगाव प्रश्नी रान उठवण्याची भाषा करतो त्याच भाजपची सत्ता सध्या कर्नाटक राज्यामध्ये आहे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष हे नितीन गडकरी म्हणजेच मराठी असून देखील त्यांच्याच पक्षाच्या एका मुख्यमंत्र्यांना त्यांना झालेल्या अत्याचाराबद्दल साधा जाब हि विचारावा वाटत नाही खरच हि खूप खेदाची बाब आहे. मी भाजपचे नाव घेतले म्हणजे बाकीचे काही त्यांच्या पेक्षा वेगळे नाहीयेत.. कधी काळी कॉंग्रेस च्या बाबतीत सुद्धा अशीच परिस्थती होती, त्यांनी हि काही केले नाही. ज्या महाराष्ट्रीय नेत्यांचे दिल्ली मध्ये थोडे थोडके वजन आहे ( म्हणजे शरद पवार साहेब) त्यांनी देखील या प्रश्न बाबत आपल्या कानावर हात ठेवले. शिवसेनेने आगदी सुरुवाती पासून सीमावासीयांच्या आंदोलना मध्ये आपला सहभाग नोंदवला पण आता कोणी दुसरे त्याचे श्रेय घेऊन जाईल म्हणून ते हि कधी कधी आपले हात राखूनच वागतात. म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांना आणि राजकीय पुढार्यांना कधी हि हा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र यावा असा कधी वाटलाच नाही.
आता हा प्रश्न खूपच चिघळला आहे, अन्यायाच्या सर्व सीमा त्यांनी ओलांडल्या आहेत, लोकशाहीचा जिथे रोज दिवसा ढवळ्या मुद्दा पडला जातो तिथे असलेल्या माझ्या मराठी बांधवांची काय परिस्थती असेल याची कल्पना न केलेलीच बरी. फ़क़्त मराठी म्हणून त्यांच्या मुलभूत अधिकारांवर जी गदा आणली जात आहे ती आम्ही गेली ६० वर्ष षंढा सारखे नुसते बघत बसलो आहोत. मराठी असल्यामुळे कित्येक मराठी युवकांचे शिक्षण, रोजगार हे या भागात अगदी मातीत मिळाले. मराठी माणसाला मिळणारी रोजची अपमानजनक वागणूक याला तेथील जनता आता कंटाळली आहे. त्यांना आस आहे ती त्यांच्या सर्व महाराष्ट्र वासीयांची .. त्यांचा सर्व राजकीय पक्षांवरील विश्वास हा उडाला आहे, रोजची आंदोलने, मोर्चे आणि लाठीचार हेच त्यांचे भाग्य बनले आहे. ज्या महाराष्ट्रात सामील होण्यासाठी त्यांची हि धडपड चालू आहे त्या महाराष्ट्रातील कित्ती लोकांना या प्रश्नाचा गांभीर्य आहे काय माहित. पण ते वेडे मराठे मात्र या शिवबाच्या महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी तळमळ करत आहेत.
पण सध्या आमचा हाच शिवबाचा महाराष्ट्र निश्चिंत झोपला आहे, सीमा वासियांचा प्रश्न असो कि पर प्रन्तियांचा आम्ही या सर्व प्रश्नाचे भवितव्य काही राजकीय पक्षांकडे किंवा पुढार्यांकडे देऊन गाढ झोपलो आहोत, नाही तर आप आपल्या जीवनात मग्न झालो आहोत. खरच का आम्ही एवढे स्वार्थी झालो आहोत, का आमच्या सर्व भावनाच मेल्या आहेत, का आमचा स्वाभिमान कुठे तरी हरवून गेला आहे .. नेमका काय झाला आहे. आमच्याच बांधवांच्या या दुखाची आम्हाला आज जाणीव होत नाहीये.

माहित नाही पण जे प्रतिनिधी आम्ही निवडून दिले आहेत मग ते कोणत्याही पक्षाचे का असेनात त्यांना आम्ही का जाब विचारात नाहीत, आमच्या बांधवांचे भवितव्य आज दुर्भाग्याने यांच्या हातामध्ये आहे, आणि हे जर हा प्रश्न गांभीर्याने घेणार नसतील तर त्यांना तिथे बसण्याचा अधिकार तरी काय आहे? लोकशाही आहे.. लोकांच्या मताची काही किंमत आहे कि नाही ? लोकशाही वर अजूनही विश्वास असणार्यांनो उठा ! तुमचा आवाज तुमच्या प्रत्येक लोक प्रतिनिधी पर्यंत जाऊ द्या, त्यांची कुंभकर्णाची झोप तुमच्या आवाजाने उडालीच पाहिजे नाहीतर ते २५ लाख मराठी बांधव आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्या ह्या महाराष्ट्राला कधीच माफ करणार नाहीत.. कधीच नाही ..

सर्व राजकीय पक्षातील लोकांनी आता तरी सर्व विसरून या मुद्द्यावर एकत्र या , अन्यथा महाराष्ट्राचे लचके तोडायला सुरुवात झाली आहे, या शिवबाचा हाच महाराष्ट्र अपंग झाल्या सारखा दिसत आहे.

ज्या शहाजी राजांनी बंगलोर शहर वसविले, तेच आज महाराष्ट्राच्या उरावर चालून येत आहे. दिल्लीची हि साथ त्यांना लाभली आहे.. पण हा माझा महाराष्ट्र आणि इथला मराठी माणूस अजूनही बेसावध आहे, सर्व जन आप आपल्या सोयीने आपली आपली भूमिका घेत आहेत. आता हे सर्व थांबले पाहिजे सर्वांची हो हो सर्वांची म्हणजे सर्व मराठी माणसाची मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना एकच भूमिका असली पाहिजे ती म्हणजे बेळगाव, कारवर, निपाणी सह ८६५ गावे हि महाराष्ट्रामध्ये सामील झालीच पाहिजे आणि तेथील मराठी लोकांवर होणारे अमानुष अत्याचार हे आता थांबलेच पाहिजेत.

या मराठी माणसाला रोज रोज जखमा देऊ नका .. दिल्ली लाही झुकवण्याची ताकद येथील मराठी मनगट मध्ये आहे. आजवर रक्त सांडले आहे अजून कित्ती दिवस आम्ही असेच बघत बसणार आहोत. का आमच्यातला माणूस आज गप्प आहे ! मराठी म्हणून नाही तर नाही पण एक माणूस म्हणून तरी सबंध मराठी मनाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचावा एवढी एकच अपेक्षा करतो

जय महाराष्ट्र !!!!!!!!!


अमोल सुरोशे

Saturday, July 10, 2010

शिवाजी महाराज, महाराष्ट्र, धर्म, जाती आणि देश

महाराष्ट्रासाठी एक खूप दुर्दैवी घटना, म्हणजे जेम्स लेन च्या पुस्तकावरील बंदी उठणे. महाराष्ट्र शासनाला साधे ते ही थांबवा आले नाही; ही शरमेची बाब आहे. आणि या बंदी उठण्याला कुणी भाषण स्वातंत्र्यचा विजय असे म्हणत आहे, तर अशा वाचाळांना आणि बोलबच्चन बुद्धिवाद्यांना माझ्या कडून चार थोबाडीत ( संदर्भ: टी.ओ.आय मधील या संधार्भातील बातमी). महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे आणि ते काही आज काल परवा झाले नाही; कितेक वर्षां पासून या ना त्या मार्गाने आणि छोट्या आणि मोठ्या स्वरुपात पुरोगामीवाद महाराष्ट्रात अस्तित्वात आहेच. खुद्द शिवाजी महाराजांचे पुरोगामीपण सिद्ध आहे. पण पुरोगामी पण म्हणजे नवे आणि कसे का असेना स्वीकारणे नव्हेच. म्हणून या निर्णयाला स्वीकारणे म्हणजे पुरोगामी असे कुणी म्हणत असेल तर, असे लोक कृपया पुढे काही वाचू नका, आणि पुन्हा येथे भेट ही देऊ नका. उद्याच काय, आजच आपल्या याच स्वभावामुळे आपल्या 'अस्तित्वावरच' बाहेरचे आणि काही घरचेच संशय घेत आहेत आणि टिंगल उडवायल ही मागे पाहत नाहीत. जेम्स लेन सारखा परदेशी येतो काय आणि इथे राहून लिहितो काय, पुस्तक सुद्धा प्रकाशित करतो काय आणि आमच्या .... ला सुद्धा पत्ता नाही लागत. तो माxx लिहून जातो आणि मग आम्ही जाती-पातींच्या  मुद्यांना उकरतो आणि राजकारण सुरु करतो. असेल यात काही लोकांचा जात्यंधपणा, पण सगळ्या जातीलाच दोष देणे योग्य ही नाही आणि देऊ ही नये. मग पुन्हा कुण्या एका जातीने शिवाजी फक्त आमचाच आहे असे ही बोंब मारत फिरू नये आणि त्याच प्रकारे भांडारकर फुटले तर कुण्या एकाच जातीने गळ ही काढू नये.
तुम्हा सर्वांना विनंती करतो  की, जेम्स लेनचे पुस्तक बाजारात कुठे ही दिसता कामा नये, कुणी ही वाचता कामा नये. कारण त्या ह.खो. ने मांडलेला इतिहास त्याच्या सडक्या दिमाकातून बाहेर पडलेले काल्पनिक खेळ आहेत. उगाच काल्पनिक खेळांना इतिहास म्हणून सामान्य जणांची फसवणूक करण्याचा जो प्रकार समस्त शिकलेल्या लोकांनी मांडला आहे त्याचा समाचार इतर शिकलेल्या 'सर्व जातींच्या' लोकांनी घेने फार गरजेचे आहे.
वर वरून पाहता जात गेली असली (शहरात तरी) तरी बऱ्याच लोकांच्या डोक्यातून जात अजून ही गेली नाही, म्हणूनच भांडारकर संस्थेचा सगळ्या ब्राम्हनांशी, संभाजी ब्रिगेडचा सर्व मराठ्यांशी अश्या प्रकारचे संबंध जोडले जातात. आज गावो गावी आणि गल्ली बोळात हजारो संघटना आहेत त्यांना 'अशी' राष्ट्रीय मान्यता देण्यात आणि समस्त लोकांशी सर्रास जोडण्यात काहीच अर्थ नाही! (या वाक्याने मी भांडारकर किंवा संभाजी ब्रिगेड ह्या मोठ्या किंवा लहान संघटना आहेत हे सांगत नाही) भांडारकर संस्थेने केले कार्य ही फार मोठे आहे आणि संभाजी ब्रिगेडने काही विषयांवर उठवलेला आवाज ही योग्य आहे, या दोन्ही गोष्टींना ना कुण्या ब्राम्हणाचा विरोध असावा ना कुण्या मराठ्याचा. छत्रपती 'फक्त' संभाजी ब्रिगेडचे, छावाचे, मराठा सेवा संघाचे किंवा एकाद्या विशिष्ट जातीचे कधीच होऊ शकत नाहीत आणि या पैकी कुण्या ही संस्थेच हा उदेश्या असावा असेही मला वाटत नाही, असेल तर त्यांनी स्वतःच  अस्तित्व पुन्हा एकदा तपासून पहाव. पण त्याच प्रकारे इतर कोणताही समाज या प्रकारे महापुरुषांना स्वतःचेच म्हणून ठेऊ शकत नाही किवा, सामान्यतः व्यक्तीवर, व्यवसायावर स्वतःची मक्तेदारी ही सांगू शकत नाही.
छत्रपती हे स्वयंप्रकाशित सूर्य होते, त्या सूर्याला कुणी आपल्या छत्राखाली घेण्याचा प्रयत्न करत असेल तर ते छत्र नक्कीच जाळून खाख होईल यात तीळ मात्र ही शंका नाही! कारण अजून ही विविध जातील प्रखर शिवप्रेमी जिवंत आहेत, आणि या शिव प्रेमींना शिवाजी महाराज  कोणत्या जातीचे होते त्या पेक्षा त्यांनी केलेले कार्य मोठे वाटते. या शिव प्रेमी मध्ये सर्व जातील लोक आहेत- माळी, कोळी, ब्राम्हण, मराठा,  सुतार, लोहार, कुंभार आणि अशा अनेक (जातींची आपल्याकडे कमी नाही :( ).
हा जो सगळा घोळ झालाय तो सगळा हा सगळा एकमेकांच्या जाती द्वेषामुळे आणि जात्यांधपणा मुळेच; याच अधिक स्पष्ट कारण मला देता येईल पण बऱ्याच भावनिक दुखापती होतील म्हणून नको.
महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मुद्यावर सुद्धा आमचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न चालाय, अगदी त्या यु. पी. च्या मायावती सारखा. आता हे जेम्स लेन प्रकरण का झालाय याच्या वर वाद करत बसण्या पेक्षा सगळ्या जातींनी एकत्र येऊन पुन्हा अशी पिल्लावळ जन्माला येऊ नये याची काळजी घ्यावी.
त्या सोबतच जातींच्या आणि धर्मांच्या कोशातून बाहेर येऊन मी महाराष्ट्रीय आहे, मी एक भारतीय आहे या भावनेला स्वतः मध्ये बळकट बनवूया.
जय जिजाऊ!                                                                        जय शिवराय!

अजून पोस्ट संपली नाही, कारण वाचत असताना बऱ्याच लोकांना काही प्रश्न आले असतील ते थोडे स्पष्ट करतो. आता मी 'जय जिजाऊ' म्हटलं  म्हणजे मी नक्कीच मराठा सेवा संघ किंवा संबंधित संघटनेचा भाग असेल असे कुणास वाटले असेल तर, या ब्लॉगशी वा जिजाऊ.कॉमशी संबंधित कुणाचाही ही कोणत्याही जातीय व धार्मिक, राजकीय संघटनेशी संबंध नाही. आणि पुढचे काही प्रश्न तुमच्या साठी, जय महराष्ट्र म्हटलं की शिवसेनेचाच का? आणि जय जिजाऊ म्हटलं की सेवा संघाचाच का? गुत्त घेतलाय का त्यांनी हे सगळ? इतरांना का नाही अभिमान या सगळ्या गोष्टींचा?

टीप:सदर पोस्ट मधून कुणाच्या जातीय भावना दुखवल्या गेली असतील तर  क्षमा. सर्व जातींच्या नावांचा उल्लेख फक्त गरजेपायी केला गेलेला आहे. कुणास ही काही गैर वाटत असेल तर कळवावे.
            

Thursday, July 1, 2010

नव्या ढंगातले वारकरी वारीत सहभागी व्हा पुणे

आय टी वारीत सहभागी व्हा. अधिक माहिती खालील मेल मध्ये आणि येथे [http://www.waari.org/Index.html]  वाचा.






// EMAIL PASTED

Namaskaar:

It gives us immense pleasure to inform you that  “The IT Dindi warkari’s” are going to participate in the “Sri Sant Dnyaneshwar Palkhi “Dindi” for the 4th year. The immense happiness and experience walking with millions of warkari’s from Alandi to Pune can’t be narrated in words.

Here is an opportunity for you to live with our age old tradition, experience it and help to carry it generations thru generations!

Our Schedule:
Date: Tuesday, 6th July 2010
Location 1: Aundh (Time 4.30 a.m)
Location 2: Kothroud (Time 4.30 a.m)
Distance: 21 KM from Sri Sai Mandir ( Near Alandi ) to Shivaji Nagar, Pune.
Duration: In general we reach Shivaji Nagar Pune around 5 p.m. There are lot of breaks to make sure everyone is comfortable to walk 21 KM. 

IT Dindee Warkari’s walk every year from Alandi to Pune. This distance is approximately 21 km. The group assembles at Sri Sai Mandir at the outskirts of Alandi. This assembly begins at around 5:30am as later it becomes difficult to reach to this spot. Last year we have done common bus to take the group to Sai Mandir.

Logistics: We are planning to arrange bus from Aundh and Kothroud to go to Sri Sai Mandir on 6th July.

Your confirmation:
We encourage you and all your friends\families to participate in the “IT Dindi” and enjoy an amazing experience in your life. Please confirm you participation with your name, contact number and location by replying to this email itdindee@gmail.com ( Don’t reply all ) by 2nd July EOD.

Please visit our website http://www.waari.org/Waari_Program.html

Why to participate in Waari?
·         - First of all, it brings a spiritual joy!!
·         - It makes you proud by holding the flag of our ancestors
·         - It teaches you an humbleness
·         - It gives a feeling of being a part of common Society
·         - It proves to be a very good stress buster
·         - It tests your physical fitness, remember this is a walk which stretches almost 21 km, but we are sure everyone enjoys this immensely
It will be great if you forward this email to all your friends working in IT industry so that they can also enjoy and experience Waari.

Look forward to your tremendous response.

In case of queries please contact following volunteers:
Rajesh Patil Mobile 9766353384
Girish Patil 9766353384
Sanjay Kulkarni 9860000128

Thanks and warm regards,
IT Dindi Warkaris