skip to main |
skip to sidebar
जय महाराष्ट्र !! असे म्हणतात की "इतिहास घडवनारी माणसे इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसे कधीच इतिहास घडवू शकत नाहीत !!" जगाच्या पाठीवर कुठेही जा ,ज्यानी कुणाच ना कुणाचा आभिमान बाळगला आणि प्रेरणा घेतली तीच माणसे पुढे यशस्वी झाली. आमच्या कडे शिवाजी महाराजा सारखा इतका मोठा दिव्य स्त्रोत आसताना देखिल आम्ही आपयाशी ठरत आहोत ,तीच तीच संकटे येऊन सुद्धा का आम्ही त्याच्यावर मात करू शक्त नाहीत ? कारण आम्ही ईतिहसातून काही शिकत तर नाहीत उलट आमचा इतिहास आम्हीच विसरत चाललोय. थेट प्रश्न विचारतो येत्या २४ नोव्हेंबर 2009 ला काय आहे ? तुम्हा किती लोकाना ठावुक आहे ? आरे आम्हालाच माहीत नाही तर मग आम्ही पुढच्या पिढीला काय सांगणार ? आज महाराष्ट्रावर , देशावर पुन्हा पुन्हा आतेरेकी हल्ले होत आहेत...तरीही आम्ही मात्र ग्लानी आल्या सारखे शांत पडून आहोत निंचित निपचित. माझे घर , माझी गाडी आणि माझ्या बायकोची गोल गोल साडी यातच आम्ही मग्न. कुणाला काही देणे घेणे नाही. ३५० वर्षा पूर्वी 'अफझल खान' नावाचा एक आतेरेकी आला होता ( त्याची जात धर्म बाबत मी बोलत नाही. तो या मातीचा वैरी म्हणून आम्ह्चा वैरी) तेव्हाच सगळ संपले आसते. पण शिवरायानी ज्या हिमतीने त्याचा सामना केला त्यामुळे कुठे ते हिंदवी स्वराज्य टिकले. आम्हाला ही तसाच लढा द्यावा लागणार आहे. पण त्यासाठी आधी इतिहास आठवा आणि त्यातून काही शिका..."इतिहासाचे खच खळगे चाचपुनच आम्ही भविष्याची यशश्वी वाटचाल करू शकतो !!"
येत्या २४ नोव्हेंबर 2009 ला त्या प्रताप गडाच्या "अफझल खान" वध घटनेला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत....म्हणजे ३५० वा
"शिवप्रताप दिन". पण आमुक आमुक लोकांच्या भावना दुखातिल म्हणत आमचे सरकार त्याची आठवण देखिल काढनार नाही. पण तुम्ही आम्ही सर्व सामान्य माणसाने ते विसरून चालणार नाही.आपल्याला 'धर्मआंधपणा' आणि 'स्वाभीमान' यातला फरक समजून घेता आला पाहिजे. अन्यथा ते रक्त सांडलेले, जिव गमावलेले आपले पूर्वज आम्हाला कधी माफ़ करणार नाहित...!!

आता मी काही तुम्हाला "याचा द्वेष , त्याचा द्वेष करा हे म्हणत नाही.चिथावान्या द्या म्हणत नाही" उगी टी.व्ही. चैनल वाल्या सारखे कहिचे काही अर्थ काढू नका. पण निदान क्षण भर शिवराय आणि त्यांच्या त्या विरांच्या पराक्रमाची आठवण तरी करा. तेवढा तरी त्यांचा हक्क आहे ना तुमच्यावर ? जय शिवराय !!!
- श्याम वाढेकर
(खास आपना सर्वांसाठी आपल्या या ब्लॉग वर प्रकाशित करीत आहोत, आता तुम्हीच विचार करा ॥ आणि क्षणभर स्मरण करा त्या युग्पुरुशाला ॥ माझ्या त्या शिवबाला ..... अमोल आणि प्रकाश )
No comments:
Post a Comment